शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समाजस्वास्थ्यासाठी सर्वत्र ‘आप्पा’ तयार व्हावेत

By admin | Updated: February 10, 2015 00:26 IST

राजदत्त : आप्पासाहेब पटवर्धन यांच्यावर चित्रपट, शासनाच्या माध्यमातून निर्मिती

कणकवली : लोकांना नुसत्या सवलती देऊन समाजस्वास्थ्य निर्माण होणार नाही. त्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणारे ‘आप्पा’ तयार व्हावे लागतात. आप्पांनी दाखवलेल्या विचारांच्या दिशेने मने चेतवण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करावीशी वाटली, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त यांनी वागदेतील गोपुरी आश्रमात व्यक्त केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, विजय गावकर आदी उपस्थित होते. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. त्यासंदर्भात विचारविनीमय करण्यासाठी राजदत्त हे गोपुरी आश्रमात सोमवारी आले. शासनाच्या माध्यमातून हा चित्रपट तयार व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार जठार यांनी सांगितले. राज दत्त म्हणाले की, आप्पांचे चरित्र चित्रपटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे. यातून समाज बदलेल अशी अपेक्षा नाही.परंतु समाजमन किमान अस्वस्थ व्हावे, असा उद्देश आहे. समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल ओरड मारणाऱ्यांचा आवाज मोठा होतो आणि त्यातून कार्य काही होत नाही. आप्पांनी शांतपणे आपल्याला शक्य होईल ते सर्वसामान्य माणसाने करावे, हा संदेश आपल्या कृतीतून दिला. प्रत्येकाने आपला सांदीकोपरा उजळ करावा, असे प्रत्येकाने ठरवले असते तर देशाची आजची जी स्थिती आहे ती दिसली नसती. नुसते कायदे बदलून, आदेश देऊन समाजस्थिती बदलणार नाही. प्रत्येकाला समर्पित काम करावे लागेल. आपल्या सोबत काम करणाऱ्यांची मने चेतवता आली पाहिजेत. ते काम आप्पांनी केले. स्वच्छतेचा डंका आज वाजतो आहे. त्या काळी आप्पांनी बोलत न राहता करून दाखवले. लोकांची मने स्वच्छ करण्याकडे आजच्या काळात लक्ष दिले पाहिजे. आपल्याकडील अब्जोवधी रूपये स्विसबॅँकेत ठेवून लोकांना कोणता आनंद मिळतो, हे समजत नाही. आप्पांनी चलनशुद्धीचा विचार त्या काळात केला. ही प्रक्रिया राबवली असती तर आज स्विस बॅँकेतून काळा पैसा आणण्याचा विचारही करावा लागला नसता, असे राज दत्त म्हणाले. सर्वसामान्यत्वातून असामान्य व्यक्तिमत्त्वापर्यंतचा आप्पांचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहाचला तर प्रत्येक सामान्याला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा त्यांनी राजदत्त यांनी केली. (प्रतिनिधी)राजदत्त दोन दिवस आश्रमातआप्पांच्या संदर्भातील आठवणी किंवा चित्रपट निर्मितीसंदर्भात सूचना करायच्या असल्यास गोपुरी आश्रमात लिखित स्वरूपात आणून द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राजदत्त दोन दिवस गोपुरी आश्रमात वास्तव्य करणार आहेत.