शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वनसंज्ञेचा अडसर दूर करण्याची ग्वाही

By admin | Updated: May 14, 2015 00:34 IST

टाळंबा प्रकल्प : मुंबईतील बैठकीत गिरीश महाजन यांचे आश्वासन

माणगाव : केंद्रीय पर्यावरण वनमंत्रालय यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करून टाळंबा प्रकल्पातील मुख्य अडसर असणारी वनसंज्ञा व इको-सेन्सिटिव्ह प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. टाळंबा लाभक्षेत्र विकास परिषद व भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या मागणीनुसार (पाटबंधारे कार्यक्रमात) जलसंपदामंत्री महाजन यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, माधव भांडारी, माजी आमदार राजन तेली, विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर शिरोडकर, दीपक शिरोडकर, सचिव प्रमोद धुरी, गजानन केसरकर, अजित परब, प्रमोद म्हाडगूत, वैभव नाईक यांचे प्रतिनिधी प्रशांत लाड, जलसंपदा प्रधान सचिव मालिनी शंकर, उपसचिव अधीक्षक अभियंता ए. एस. अंसारी, उपसचिव उपासनी, मुख्य अभियंता कुंजी, कार्यकारी अभियंता एम. गिरासे, आदी अधिकारी उपस्थित होते. सन १९५१ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेला टाळंबा प्रकल्प गेली ३४ वर्षे रखडला आहे. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आतापर्यंत केवळ २६ टक्के काम झाले असून, ४२.७० कोटी इतका खर्च झाला आहे. उर्वरित काम सुरू करण्यासाठी वन खात्याचा मुख्य अडसर आहे. वनसंज्ञा, इको-सेन्सिटिव्हमधून हा भाग वगळण्याबाबत केंद्रीय मंत्रालय पातळीवरच बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रकल्पाला वेळ लागत असेल, तर कोल्हापूर टाईप बंधारे बांधून पाण्याची समस्या दूर करण्याची सूचना केली. वनखात्याच्या व वनसंज्ञेत गेलेल्या एकूण ६२३ हेक्टर क्षेत्रात टाळंबा प्रकल्प होणे आवश्यक असून, वनमंत्रालय पातळीवर प्रयत्न करून हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा, यासाठी येत्या २० मेपर्यंत धरणाबरोबर केनॉलचेही काम सुरू करण्याच्या सूचनाही महाजन यांनी दिल्या. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. (प्रतिनिधी)सन १९५१ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेला टाळंबा प्रकल्प गेली ३४ वर्षे रखडला आहे. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आतापर्यंत केवळ २६ टक्के काम झाले असून, ४२.७० कोटी इतका खर्च झाला आहे. उर्वरित काम सुरू करण्यासाठी वनखात्याचा मुख्य अडसर आहे. वनसंज्ञा, इको सेन्सिटिव्हमधून हा भाग वगळण्याबाबत केंद्रीय मंत्रालय पातळीवर बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचे स्पष्ट केले.