शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

विघ्नसंतोषी लोक गैरसमज पसरवितात

By admin | Updated: December 1, 2014 00:12 IST

राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांचा आरोप

सावंतवाडी : गेले चार दिवस दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या वादाप्रकरणी शांत असलेल्या संस्थेच्या कार्याध्यक्षा तथा राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी प्रथमच जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. काही विघ्नसंतोषी लोक द्वेषापोटी आमच्याबद्दल गैरसमज पसरवीत असून, त्यांना वेळीच बाजूला केल्याने ते दुखावले आहेत, अशी टीका करीत आपली भूमिका स्पष्ट केली.दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचा ताबा मिळविण्यासाठी व नवीन नियामक मंडळ स्थापन करण्याच्या प्रकाराचा निषेध म्हणून आज, रविवारी पंचम खेमराज महाविद्यालयात नागरिक तसेच माजी विद्यार्थ्यांची सभा झाली. यावेळी राजमाता सत्त्वशीलादेवी यांनी आपली भूमिका पत्रकाद्वारे विषद केली.या पत्रकाद्वारे राजमाता यांनी सांगितले की, ही वास्तू राजघराण्याचे स्वप्न होते. सावंतवाडी परिसरातील खेड्यातील सर्व विद्यार्थ्यांनी येऊन शिकावे, हा यामागचा उद्देश होता. बुद्धिमता असूनही शिक्षण घेणे ज्यांना शक्य नाही, अशांना या संस्थेतून शिक्षण दिले जात असे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणात अव्वल होईल आणि राजघराण्याचा नावलौकिक होईल, असे नेहमी श्रीमंत शिवरामराजे भोसले यांना वाटत असे. हा शिक्षणाचा वारसा आम्ही नेहमीच निभावला आणि यापुढे निभावत नेऊ, तो येथील सुज्ञ जनतेमुळेच.मात्र, आज काही विघ्नसंतोषी, स्वार्थी आणि हितसंबंध दुखावलेले, आमच्या हेतूबद्दल गैरसमज पसरवीत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडचणी निर्माण करू पाहत आहेत. त्यांची ही बुद्धी विकृत अशीच आहे. त्यांनी शिक्षणात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र समाजातील सर्व नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि या प्रवृत्तीचा निषेध केला. या जोरावरच आम्ही शिक्षणाची वेगवेगळी दालने उभी करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. असाच पाठिंबा यापुढच्या काळातही द्या, असे आवाहनही त्यांनी या निवेदनातून केले आहे. (प्रतिनिधी)