शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आंबोलीत आणखी एक तपासणी नाका; सांगलीतील घटनेनंतर जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:32 IST

आंबोली : सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी ...

आंबोली : सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यात आले असून सीसीटीव्हीही सुरू करण्यात आला आहे.सांगली येथील पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोलीतील महादेवगड पॉर्इंटवर आणून जाळण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच सांगलीतील घटनेच्या तिसºया दिवशीच आंबोलीतीलच कावळेसाद पॉर्इंटवर आणखी एक मृतदेह सापडला.हा मृतदेह गडहिंग्लज येथील शिक्षकाचा होता. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी होत असल्याचे दिसून येत होते. राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली होती.मंत्री केसरकर यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रावर अतिरिक्त पोलीस बळ वाढविण्यात येणार आहे. तसेच दूरक्षेत्राची जागा चुकीची असून दूरक्षेत्र अन्यत्र हलविण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. तर तात्पुरत्या स्वरुपात आणखी एक तपासणी नाका लावण्यात येणार आहे, असे जाहीर केले होते. त्यानुसार आंबोलीच्या दिशेने येणाºया कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर हा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या तपासणी नाक्यावर दिवसा चार, तर रात्रीच्यावेळी चार असे पोलीस ठेवण्यात आले आहेत. हा तपासणी नाका सोमवारी रात्रीपासून कार्यरत झाला आहे.तर आंबोली दूरक्षेत्रावर आणखी पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच दूरक्षेत्राचे बंद असलेले सीसीटीव्हीही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगलीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असल्याचे यातून दिसून येत आहे.एखादी घटना घडल्यानंतर पोलीस दल जागे होते. त्याचा प्रत्यय आंबोलीला मंगळवारी आला. दीड वर्षापासून आंबोलीतील दूरक्षेत्राचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. याबाबत दूरक्षेत्राने पत्रव्यवहार करूनही त्याची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली नव्हती. त्यामुळे हे सीसीटीव्ही बंद अवस्थेत होते. मात्र सांगलीच्या घटनेनंतर पोलीस दल जागे झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही पुन्हा सुरू केले आहेत.