शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी

By admin | Updated: October 2, 2016 00:12 IST

जिल्हा परिषद कृषी समितीची सभा : शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील कुर्ली धरणाचे दरवाजे अचानक उघडल्याने लगतच्या परिसरात पाण्याचा लोट जावून झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने अद्याप कृषी विभागाला दिलेले नाहीत. त्यामुळे या घटनेबाबत शासन व प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप समिती सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती एकनाथ नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य रणजित देसाई, मधुसूदन बांदिवडेकर, रेश्मा जोशी, प्रमोद सावंत, समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या धुवाँधार पावसामुळे कुर्ली धरण तुडुंब भरले. त्यामुळे त्या धरणाचे तीन दरवाजे तेथील स्थानिक नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता उघडण्यात आले होते. त्यामुळे शिवगंगा पुलावरून सुमारे १३ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे लगतच असणाऱ्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना कृषी विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. शासनस्तरावरून ते पंचनामे होण्याचे आदेश अपेक्षित होते. शासनाला शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत गांभिर्य नसल्याचे सांगून सदस्य मधुसुदन बांदिवडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. पंचनामे करण्याचे आदेश शासनस्तरावरून निर्गमित व्हावेत असा एकमुखी ठराव यावेळी घेण्यात आला. भातशेतीवर करपा रोगाची तर सुपारीवर कोळा रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे याबाबतचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी या सभेत कृषी समितीचे सभापती एकनाथ नाडकर्णी यांनी केली. (प्रतिनिधी) गोडाऊन जबरदस्तीने रिकामे करु सावंतवाडी पंचायत समितीच्या कृषी विभागाने काही वर्षांपूर्वी खरेदी केलेले ५ अश्वशक्तीच्या ६७ पंपांपैकी ३७ पंप पंचायत समितीच्या गोडाऊनमध्ये पडून आहेत. हे पंप बाजूला करून गोडाऊन रिकामे करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. असे असले तरीही जिल्हा कृषी कार्यालयामार्फत याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे याबाबतचे पत्र आयुक्तांना पाठवावे व हे गोडाऊन रिकामे करावे, अन्यथा ते जबरदस्तीने रिकामे केले जाईल, असा इशारा बांदिवडेकर यांनी यावेळी दिला. बायोगॅससाठी ९० लाख प्राप्त सिंधुदुर्गातील बायोगॅस उद्दीष्टपूर्तीसाठी शासनाकडून ८९ लाख ६९ हजार ६७५ रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पशुपक्षी मेळाव्यात तांदुळ महोत्सवाबरोबरच अन्य स्थानिक उत्पादनेही ठेवली जाणार आहेत.