शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

अलोरे-शिरगाव पोलिसांची सतत होतेय परवड

By admin | Updated: December 12, 2014 23:40 IST

प्रचंड ओढाताण : ३१ गावांची कायदा सुव्यवस्था सांभाळताना जीव येतो मेटाकुटीस ...

शिरगाव : पश्चिम घाटातून कोकणात प्रवेश करतानाच कर्तव्यावर हजर असलेल्या बारा किलोमीटर कुंभार्ली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्र परिसराकडे लक्ष ठेवून सतर्क असणाऱ्या अलोरे शिरगाव पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांची कर्तव्य बजावताना प्रचंड ओढाताण होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ३१ गावांची कायदा सुव्यवस्था सांभाळताना त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. इंग्रज राजवटीपासून शिरगावला पोलीस ठाणे होते, तथापि १९६५ सालापासून कोयना प्रकल्पामुळे कोळकेवाडीला महत्त्व आल्याने अलोरे येथे मुख्य ठाणे व पोफळीत विशेष सुरक्षा म्हणून ठाणे उभारण्यात आले. आजअखेर या ठाण्यात ३८ पुरुष-महिला कर्मचारी कार्यरत आहेत. प्रतिदिन पाच कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी, तीन पोफळी वीजगृह सुरक्षा, तीन कुंभार्ली घाट चेकनाका, २ डीवायएसपी कार्यालय, कोर्ट कामे, सहा महिला कर्मचारी, एक कर्मचारी रिफ्रेशर कोर्ससाठी गेल्यानंतर प्रत्यक्ष अपघात, चोरी, विशेष सुरक्षा या तातडीच्या कामांसाठी ३१ गावांसाठी केवळ १८ ते २० कर्मचारी कार्यरत असतात. विशेष कामगिरीवगळता पुरुष कर्मचाऱ्यांसोबत महिला पोलीस असून, कार्यालयीन कामकाज व वायरलेस यासाठीच कर्तव्यावर नेमले जाते. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कोर्टाचे समन्स, तंटामुक्ती यासाठी कर्तव्यावर जाताना भ्रमणध्वनी यंत्रणाही कार्यान्वित नसते आणि दुर्गम भागात आपत्कालीन स्थितीत संपर्कही होत नाही, अशी स्थिती आहे. ५० वर्षे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकाच ठिकाणी निवासव्यवस्था असायला हवी, अशी मागणी १९८५ सालापासून करण्यात येत आहे. तत्कालीन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या आदेशाने गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव गेले. मात्र, आजअखेर शासन पोलिसांना निवासस्थाने बांधून देऊ शकले नाही. तथापि कोयना प्रकल्पाने आपल्या वसाहतीतही त्यांना सरकारी भाड्याने निवासस्थाने दिली होती. शिरगावात पोलीस ठाणे गेल्यानंतर मोडकळीस आलेली पोलीस वसाहत बांधण्याऐवजी तोडण्यात आली. चार निवासस्थाने पोलिसांनी वापरात ठेवली. मात्र, ७ मे २०१४ रोजी त्या इमारतीवर जांभळाचे झाड पडले आणि तेथे असणारे कर्मचारी उरला संसार घेऊन निघून गेले.कोयना प्रकल्पाकडे बँका, पतपेढ्या, पोस्ट खात्याला अत्यावश्यक सेवा म्हणून देण्यास जागा व निधी आहे. मात्र, महत्त्वाची सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांसाठी मात्र काहीच उपाययोजना का नाही ? असा पाठपुरावा करण्यातही पोलीस यंत्रणा उदासीन दिसत आहे. एकूणच मोठ्या क्षेत्राची सुरक्षा ठेवणारे पोलीस त्रासदायक स्थितीत कार्यरत आहेत. (वार्ताहर)तत्कालिन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या आदेशाने घरांसाठीचे प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे गेले. मात्र, आजअखेर कोणतेही शासन पोलिसांना घरे बांधून देऊ शकले नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.भौगोलिक प्रतिकूलता ठरणार महत्त्वाची. विद्युत प्रकल्पाची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची. ३१ दुर्गम भागातील गावे कार्यक्षेत्रात.३० वर्षांपासून निवासस्थानांची केवळ चर्चा. अलोरे पोलीस वसाहत वास्तव्याविना.