शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

आपत्ती व्यवस्थापनात सर्व विभागानी समन्वयाने काम करावे : उदय चौधरी

By admin | Updated: May 22, 2017 16:53 IST

सिंधुदुर्गनगरीत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. २२ : आपत्ती व्यवस्थापन केवळ एका विभागापुरती मर्यादित नसते. महसूल, विद्युत वितरण, कृषी, पाटबंधारे, ग्राम विकास, पोलीस, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचा यामध्ये समावेश होतो. आपत्ती काळात सर्व विभागानी समन्वयाने काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी येथे केले.

यंदाच्या पावसाळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी तसेच विविध शासकीय विभागाचे खातेप्रमुख सर्व तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या पावसाळ्यात महसूल, पाटबंधारे, वन, सार्वजनिक बांधकाम, राज्य विद्यूत वितरण, बी. एस. एन. एल, उप प्रादेशिक परिवहन, पशुसंवर्धन मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत आदी विभागानी समन्वय राखून तसेच प्राधान्याने कोणत्या बाबींवर लक्ष द्यावे याबाबत जिल्हाधिकारी चौधरी यांनी सविस्तर आढावा घेतला तसेच विविध सूचना या बैठकीत केल्या.

संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होणा-या गावांची पाहणी तहसिलदार यांनी करावी, जोखिमग्रस्त गावांना भेटी देऊन विस्थापितांची निवा-याची सुविधा तयार ठेवावी, तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करावा, पावसाळा कालावधीत गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक यांनी मुख्यालय सोडू नये, बचाव व शोध पथके स्थापन करुन त्यांची माहिती अद्यावत करावी, नगरपालिका हद्दीतील गटारांची स्वच्छता, अनावश्यक झाडे किंवा झाडांची छाटणी करावी, बी.एस. एन. एल. केबल टाकण्याची कामे ज्या ठिकाणी सुरु आहेत सदर खोदाई केलेले रस्त्यांची दुरुस्ती ५ जूनपूर्वी पूर्ण करुन रस्ते सुव्यवस्थित ठेवावित, धोकादायक साकव असतील त्या ठिकाणी फलक लावावेत, राज्य व जिल्हा मार्गावर आप्त्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा याची माहिती देणारे फलक ठिक-ठिकाणी उभारावेत, तालुकास्तरावर तसेच ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या साधन- सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी पोहचवावी, आरोग्य विभागाने आरोग्य सेवेसाठी पथक तयार ठेवावीत, पशुसंवर्धन विभागाने पावसाळ्यापूर्वी पशुधनाचे लसीकरण पूर्ण करावे. आदी सूचना या बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिल्या.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पॉवर पॉईंट प्रेन्झेटेशनच्या माध्यमातून जिल्ह्याचा आप्त्कालीन आराखडा विशद केला. कक्षप्रमुख राजश्री सामंत यांनी आभार मानले.