शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अळंबी प्रकल्पांना मदतीची गरज-युवा उद्योजकांचे लॉकडाऊनच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 16:07 IST

सिंधुदुर्गातील अनेकजण सध्या आर्थिक संकटात आहेत. जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अळंबी शेतीसाठी व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने  आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अळंबी व्यावसायिकांनी  शासनाकडे   केली आहे. 

ठळक मुद्देकोरोनाचा फटका :  तयार माल जाग्यावरच खराब झाला.

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -फणसवाडी येथील युवा उद्योजक  योगेश कृष्णा देसाई  यांनी   नोकरीच्या मागे न लागता अळंबी शेती   गावात सुरू केली आहे. योेगेश हे उच्चशिक्षित आहेत. मुंबईतील धकाधकीच्या जीवनाला कंटाळून आपली नोकरी सोडून ते गेली ४ ते ५ वर्षे गावात अळंबी व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात अनेक चढउतार त्यांनी पाहिले. व्यवसायात त्यांचा जम बसला होता. पण  गेले दोन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यान अळंबीचा  तयार माल जाग्यावरच खराब झाला. यामुळे हा  व्यवसाय  डबघाईला आला आहे. देसाई यांचे मोठे नुकसान झाले.    

सिंधुदुर्गातील अनेकजण सध्या आर्थिक संकटात आहेत. जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अळंबी शेतीसाठी व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने  आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अळंबी व्यावसायिकांनी  शासनाकडे   केली आहे. 

सध्या सिंधुदुर्गात दहाहून  अधिक उद्योजक अळंबी शेती करतात. लॉकडाऊनच्या काळात माल तयार असूनही तो जाग्यावरच खराब झाल्याने युवा उद्योजक मोठ्या आर्थिक संकटात सापडले. यामुळे त्यांचे  लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गात सध्या १० अळंबी प्रकल्प उभे आहेत. त्यात सरासरी महिन्याकाठी एकूण   ३ ते ३.५ टन मशरुम (अळंबी)चे उत्पादन होते. यातून महिन्याची एकूण अंदाजे उलाढाल ९ ते १० लाखांच्या आसपास होती. सर्व अळंबीची  स्थानिक बाजारपेठेतील हॉटेल तसेच शेजारच्या  गोवा राज्यातील बाजारपेठ येथे मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.

पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. सर्व हॉटेल, सुपर मार्केट हे बंद असल्यामुळे युवा उद्योजकांना अळंबी व्यवसाय बंद करण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या काळात या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तरुणांना न्याय द्यावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. मात्र, जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांना राज्यशासनाने काही प्रमाणात अर्थसहाय्य केले तर अळंबी (मशरूम) व्यावसायीक लॉकडाऊनंतर पुन्हा नव्या जिद्दीने हा व्यवसाय सुरू करू शकतील. याशिवाय कोकणातील सुशिक्षित तरुणांना पुन्हा योग्य ती दिशा मिळेल. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या  इतर लोकांनाही नवीन रोजगार मिळू शकेल. तरी शासन व प्रशासनाने या व्यवसायाला चालना देऊन होतकरू तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी युवा उद्योजक योगेश देसाई यांनी केली आहे.

 

लॉकडाऊन काळात डेगवे येथे अळंबी माल जाग्यावरच खराब झाल्याने युवा उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय