शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

कृषी अधिकाऱ्यांचीच सभेला दांडी

By admin | Updated: April 2, 2015 00:46 IST

राजापूर पंचायत समिती : शुक्लकाष्टच्या धास्तीने फिरकलेच नाहीत

राजापूर : येथील तालुका कषी कार्यालयातील कथित लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण चांगलेच गाजत असून, आता चौकशीचे शुक्लकाष्ट आपल्या पाठीशी लागेल, या भीतीने हादरलेले कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच दांडी मारली. हा सारा प्रकार घडत असतानाच पंचायत समिती सदस्यांपैकी कुणीच त्या विषयावर ब्र न काढल्याने आता सदस्यदेखील त्या प्रकाराला पाठीशी घालीत तर नाहीत ना? या शंकेला बळकटी मिळाली आहे.दोन दिवसांपूर्वी तालुका कृषी कार्यालयांतर्गत लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण उघडकीस आले. एका कृषी सहाय्यकाने कार्यालयीन कामकाजाचा लॅपटॉप कुणाला न सांगता तेथून अन्यत्र पळवून नेल्याची लेखी तक्रार राजापूर कृषी मंडल विभाग १चे मंडल अधिकारी ए. आर. कावतकर यांनी तालुका कृषी विभागाचे अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांच्याकडे केली. त्यानंतर या प्रकरणात पुढे रंगत वाढत गेली व त्यातूनच लॅपटॉपवरुन चांगलीच जुंपली होती. आता या प्रकरणाचे पडसाद राजापूर पंचायत समितीच्या बैठकीत नक्की उमटतील व प्रकरण आपल्यावरच शेकेल शिवाय सर्वांसमक्ष जाबदेखील द्यावा लागेल, याची जाणीव असलेल्या कृषी विभागाच्या तालुका अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हता.लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण गाजत असताना उपस्थित पंचायत समिती सदस्यांपैकी याबाबत कुणीही हा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता सदस्यदेखील त्या प्रकरणी कुणाला पाठीशी तर घालीत नाहीत ना? अशी चर्चा सुरु होती.दरवेळेप्रमाणे राजापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला अनेक खात्यांचे प्रमुख काही ना काही कारणे पुढे करत अनुपस्थित राहिले. त्यामध्ये शिक्षण, सार्वजनिक, बांधकाम, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांचा समावेश होता. काही शाळांतील वर्गाची संख्या वाढवण्याबाबतचा मुद्दा उपस्थित होताच प्रथम परिपूर्ण शिक्षक द्या, मगच वर्ग वाढवा, अशी भूमिका माजी सभापती कमलाकर कदम यांनी घेतली. त्याला सत्ताधारी सेनेचे सदस्य दीपक नागले यांनी आक्षेप घेतला. यावरुन त्या दोघांत जुगलबंदी पाहावयास मिळाली तर ठेकेदार मिळाल्याशिवाय कामाचे बिल काढू नका, असे गटविकास अधिकारी सांगतात, असा आरोप माजी उपसभापती भाग्यश्री लाड यांनी केल्याने गटविकास अधिकाऱ्यांसमवेत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. बैठकीनंतरही त्या दोघांत पुन्हा याच विषयावर जुंपली होती.तालुक्यात पाणीपट्टी, घरपट्टी यांसह आता विभागातील वसुली १०० टक्के झाली आहे, तर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा, तळगाव क्र.२ व कोंढेतड क्र.२ यांना आदर्श शाळा म्हणून निवडण्यात आल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. शिक्षण विभागाच्या कोलमडलेल्या कारभारावर चिंता व्यक्त करण्यात आली. शाळेतील किचन शेडचा विषयही चांगलाच चर्चेत आला. किचन शेडचे काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे पैसे देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. तालुक्यात ताम्हाने धनगरवाडी व मोरोशी या गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. (प्रतिनिधी)