शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कृषी अधिकाऱ्यांचीच सभेला दांडी

By admin | Updated: April 2, 2015 00:46 IST

राजापूर पंचायत समिती : शुक्लकाष्टच्या धास्तीने फिरकलेच नाहीत

राजापूर : येथील तालुका कषी कार्यालयातील कथित लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण चांगलेच गाजत असून, आता चौकशीचे शुक्लकाष्ट आपल्या पाठीशी लागेल, या भीतीने हादरलेले कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच दांडी मारली. हा सारा प्रकार घडत असतानाच पंचायत समिती सदस्यांपैकी कुणीच त्या विषयावर ब्र न काढल्याने आता सदस्यदेखील त्या प्रकाराला पाठीशी घालीत तर नाहीत ना? या शंकेला बळकटी मिळाली आहे.दोन दिवसांपूर्वी तालुका कृषी कार्यालयांतर्गत लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण उघडकीस आले. एका कृषी सहाय्यकाने कार्यालयीन कामकाजाचा लॅपटॉप कुणाला न सांगता तेथून अन्यत्र पळवून नेल्याची लेखी तक्रार राजापूर कृषी मंडल विभाग १चे मंडल अधिकारी ए. आर. कावतकर यांनी तालुका कृषी विभागाचे अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांच्याकडे केली. त्यानंतर या प्रकरणात पुढे रंगत वाढत गेली व त्यातूनच लॅपटॉपवरुन चांगलीच जुंपली होती. आता या प्रकरणाचे पडसाद राजापूर पंचायत समितीच्या बैठकीत नक्की उमटतील व प्रकरण आपल्यावरच शेकेल शिवाय सर्वांसमक्ष जाबदेखील द्यावा लागेल, याची जाणीव असलेल्या कृषी विभागाच्या तालुका अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हता.लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण गाजत असताना उपस्थित पंचायत समिती सदस्यांपैकी याबाबत कुणीही हा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता सदस्यदेखील त्या प्रकरणी कुणाला पाठीशी तर घालीत नाहीत ना? अशी चर्चा सुरु होती.दरवेळेप्रमाणे राजापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला अनेक खात्यांचे प्रमुख काही ना काही कारणे पुढे करत अनुपस्थित राहिले. त्यामध्ये शिक्षण, सार्वजनिक, बांधकाम, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांचा समावेश होता. काही शाळांतील वर्गाची संख्या वाढवण्याबाबतचा मुद्दा उपस्थित होताच प्रथम परिपूर्ण शिक्षक द्या, मगच वर्ग वाढवा, अशी भूमिका माजी सभापती कमलाकर कदम यांनी घेतली. त्याला सत्ताधारी सेनेचे सदस्य दीपक नागले यांनी आक्षेप घेतला. यावरुन त्या दोघांत जुगलबंदी पाहावयास मिळाली तर ठेकेदार मिळाल्याशिवाय कामाचे बिल काढू नका, असे गटविकास अधिकारी सांगतात, असा आरोप माजी उपसभापती भाग्यश्री लाड यांनी केल्याने गटविकास अधिकाऱ्यांसमवेत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. बैठकीनंतरही त्या दोघांत पुन्हा याच विषयावर जुंपली होती.तालुक्यात पाणीपट्टी, घरपट्टी यांसह आता विभागातील वसुली १०० टक्के झाली आहे, तर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा, तळगाव क्र.२ व कोंढेतड क्र.२ यांना आदर्श शाळा म्हणून निवडण्यात आल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. शिक्षण विभागाच्या कोलमडलेल्या कारभारावर चिंता व्यक्त करण्यात आली. शाळेतील किचन शेडचा विषयही चांगलाच चर्चेत आला. किचन शेडचे काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे पैसे देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. तालुक्यात ताम्हाने धनगरवाडी व मोरोशी या गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. (प्रतिनिधी)