शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांचीच सभेला दांडी

By admin | Updated: April 2, 2015 00:46 IST

राजापूर पंचायत समिती : शुक्लकाष्टच्या धास्तीने फिरकलेच नाहीत

राजापूर : येथील तालुका कषी कार्यालयातील कथित लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण चांगलेच गाजत असून, आता चौकशीचे शुक्लकाष्ट आपल्या पाठीशी लागेल, या भीतीने हादरलेले कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच दांडी मारली. हा सारा प्रकार घडत असतानाच पंचायत समिती सदस्यांपैकी कुणीच त्या विषयावर ब्र न काढल्याने आता सदस्यदेखील त्या प्रकाराला पाठीशी घालीत तर नाहीत ना? या शंकेला बळकटी मिळाली आहे.दोन दिवसांपूर्वी तालुका कृषी कार्यालयांतर्गत लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण उघडकीस आले. एका कृषी सहाय्यकाने कार्यालयीन कामकाजाचा लॅपटॉप कुणाला न सांगता तेथून अन्यत्र पळवून नेल्याची लेखी तक्रार राजापूर कृषी मंडल विभाग १चे मंडल अधिकारी ए. आर. कावतकर यांनी तालुका कृषी विभागाचे अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांच्याकडे केली. त्यानंतर या प्रकरणात पुढे रंगत वाढत गेली व त्यातूनच लॅपटॉपवरुन चांगलीच जुंपली होती. आता या प्रकरणाचे पडसाद राजापूर पंचायत समितीच्या बैठकीत नक्की उमटतील व प्रकरण आपल्यावरच शेकेल शिवाय सर्वांसमक्ष जाबदेखील द्यावा लागेल, याची जाणीव असलेल्या कृषी विभागाच्या तालुका अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हता.लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण गाजत असताना उपस्थित पंचायत समिती सदस्यांपैकी याबाबत कुणीही हा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता सदस्यदेखील त्या प्रकरणी कुणाला पाठीशी तर घालीत नाहीत ना? अशी चर्चा सुरु होती.दरवेळेप्रमाणे राजापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला अनेक खात्यांचे प्रमुख काही ना काही कारणे पुढे करत अनुपस्थित राहिले. त्यामध्ये शिक्षण, सार्वजनिक, बांधकाम, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांचा समावेश होता. काही शाळांतील वर्गाची संख्या वाढवण्याबाबतचा मुद्दा उपस्थित होताच प्रथम परिपूर्ण शिक्षक द्या, मगच वर्ग वाढवा, अशी भूमिका माजी सभापती कमलाकर कदम यांनी घेतली. त्याला सत्ताधारी सेनेचे सदस्य दीपक नागले यांनी आक्षेप घेतला. यावरुन त्या दोघांत जुगलबंदी पाहावयास मिळाली तर ठेकेदार मिळाल्याशिवाय कामाचे बिल काढू नका, असे गटविकास अधिकारी सांगतात, असा आरोप माजी उपसभापती भाग्यश्री लाड यांनी केल्याने गटविकास अधिकाऱ्यांसमवेत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. बैठकीनंतरही त्या दोघांत पुन्हा याच विषयावर जुंपली होती.तालुक्यात पाणीपट्टी, घरपट्टी यांसह आता विभागातील वसुली १०० टक्के झाली आहे, तर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा, तळगाव क्र.२ व कोंढेतड क्र.२ यांना आदर्श शाळा म्हणून निवडण्यात आल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. शिक्षण विभागाच्या कोलमडलेल्या कारभारावर चिंता व्यक्त करण्यात आली. शाळेतील किचन शेडचा विषयही चांगलाच चर्चेत आला. किचन शेडचे काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे पैसे देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. तालुक्यात ताम्हाने धनगरवाडी व मोरोशी या गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. (प्रतिनिधी)