शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बंधारे बांधण्यात कृषी विभाग बॅकफुटवर

By admin | Updated: March 25, 2016 23:38 IST

६२४६ बंधारे पूर्ण : दहा हजारांचे होते उद्दिष्ट, तालुक्यांची आकडेवारी समाधानकारक

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी -भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व मे अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठरवून दिलेल्या कच्चे व वनराईच्या १० हजार बंधाऱ्यांपैकी ६२४६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. उद्दिष्टाच्या ६२ टक्केच बंधारे घातल्याने आगामी काळात पाणी प्रश्न हा गंभीर होणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभाग मात्र बंधारे बांधण्यात अपयशी ठरला असून २२०० पैकी केवळ ५०६ बंधारे बांधले आहेत.गेल्या पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा शेकडोपटीने पाऊस कमी झाल्याने मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पोहोचणार ही शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने १० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य तालुकास्तरावर, कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभागाला विभागून दिले होते. त्यानुसार आजअखेरपर्यंत यापैकी केवळ ६२४६ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उद्दिष्टपूर्ती केवळ ६२ टक्केच असल्याने मे अखेरीस जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. सामाजिक वनीकरण विभागाला ३०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. मात्र, या विभागानेही केवळ ९५ बंधारे बांधण्यात समाधान मानले. उद्दिष्टाच्या केवळ ३१.६७ टक्के काम पूर्ण केले. त्यामुळे या विभागाची अनास्था दिसून आली.कणकवली१२७५८८२कुडाळ१२००८५४दोडामार्ग४५०४१३वेंगुर्ला६००४१९मालवण१२००८११देवगड१०५०९५८सावंतवाडी१२७५१००८वैभववाडी४५०३००एकूण७५००५६४५बंधाऱ्यांचे काम समाधानकारक७५०० बंधाऱ्यांपैकी ५६४५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. याची ७५.२७ टक्केवारी आहे. बंधाऱ्यांची एकूण टक्केवारी पाहता ६२.४६ टक्के आहे. सामाजिक वनीकरण व कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळेही टक्केवारी कमी झाली आहे. या दोन विभागांनी बंधाऱ्याच्या कामात प्रगती केली असली तर या टक्केवारीत वाढ होण्यास मदत होणार होती. आता ओहोळ, नदी या ठिकाणचा पाण्याचा प्रवाह थांबला असून आता बंधारे घालणे थांबले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्यात कृषी विभाग बॅकफुटवर गेला आहे.राज्य शासनाचा कृषी विभाग कोणत्या ना कोणत्या विषयामुळे नेहमीच चर्चेत असतो. जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागाला २२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. जेणेकरून पाण्याची पातळी वाढावी व फळ पीक व शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध व्हावा.मात्र, या उद्दिष्टापैकी केवळ ५०६ बंधारेच या विभागाने बांधून पूर्ण केले आहेत.