शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बंधारे बांधण्यात कृषी विभाग बॅकफुटवर

By admin | Updated: March 25, 2016 23:38 IST

६२४६ बंधारे पूर्ण : दहा हजारांचे होते उद्दिष्ट, तालुक्यांची आकडेवारी समाधानकारक

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी -भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व मे अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठरवून दिलेल्या कच्चे व वनराईच्या १० हजार बंधाऱ्यांपैकी ६२४६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. उद्दिष्टाच्या ६२ टक्केच बंधारे घातल्याने आगामी काळात पाणी प्रश्न हा गंभीर होणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभाग मात्र बंधारे बांधण्यात अपयशी ठरला असून २२०० पैकी केवळ ५०६ बंधारे बांधले आहेत.गेल्या पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा शेकडोपटीने पाऊस कमी झाल्याने मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पोहोचणार ही शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने १० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य तालुकास्तरावर, कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभागाला विभागून दिले होते. त्यानुसार आजअखेरपर्यंत यापैकी केवळ ६२४६ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उद्दिष्टपूर्ती केवळ ६२ टक्केच असल्याने मे अखेरीस जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. सामाजिक वनीकरण विभागाला ३०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. मात्र, या विभागानेही केवळ ९५ बंधारे बांधण्यात समाधान मानले. उद्दिष्टाच्या केवळ ३१.६७ टक्के काम पूर्ण केले. त्यामुळे या विभागाची अनास्था दिसून आली.कणकवली१२७५८८२कुडाळ१२००८५४दोडामार्ग४५०४१३वेंगुर्ला६००४१९मालवण१२००८११देवगड१०५०९५८सावंतवाडी१२७५१००८वैभववाडी४५०३००एकूण७५००५६४५बंधाऱ्यांचे काम समाधानकारक७५०० बंधाऱ्यांपैकी ५६४५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. याची ७५.२७ टक्केवारी आहे. बंधाऱ्यांची एकूण टक्केवारी पाहता ६२.४६ टक्के आहे. सामाजिक वनीकरण व कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळेही टक्केवारी कमी झाली आहे. या दोन विभागांनी बंधाऱ्याच्या कामात प्रगती केली असली तर या टक्केवारीत वाढ होण्यास मदत होणार होती. आता ओहोळ, नदी या ठिकाणचा पाण्याचा प्रवाह थांबला असून आता बंधारे घालणे थांबले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्यात कृषी विभाग बॅकफुटवर गेला आहे.राज्य शासनाचा कृषी विभाग कोणत्या ना कोणत्या विषयामुळे नेहमीच चर्चेत असतो. जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागाला २२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. जेणेकरून पाण्याची पातळी वाढावी व फळ पीक व शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध व्हावा.मात्र, या उद्दिष्टापैकी केवळ ५०६ बंधारेच या विभागाने बांधून पूर्ण केले आहेत.