शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा निधी करपला, बांधकाम मात्र मजबूत

By admin | Updated: December 30, 2015 00:46 IST

जिल्हा परिषद : २३ कोटींचे सुधारित अंदाजपत्रक मंजूर

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सन २०१५-१६च्या २३ कोटी ११ लाख ५६ हजार ८२२ रुपये इतक्या रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र, या अंदाजपत्रकामध्ये पशुसंवर्धन व कृषी विभागासाठी गतवर्षीपेक्षा कमी तरतूद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. पाणी, बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता आहे. हे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे वित्त सभापती व अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर सादर केले. सन २०१५-१६च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये १ एप्रिल २०१५ रोजीच्या आरंभीची शिल्लक ८१ लाख ८५१ रुपये होती. परंतु, २०१४-१५ मध्ये प्रत्यक्ष जमा रक्कम व खर्चाचा विचार करता आरंभीची शिल्लक ११ कोटी १३ लाख १५ हजार ४७६ एवढी रक्कम विचारात घेऊन २३ कोटी ११ लाख ५६ हजार ९२२ रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये शिक्षण विभागासाठी १ कोटी ४ लाख ५ हजार, बांधकामसाठी २ कोटी ५ लाख २० हजार रुपये, आरोग्यासाठी ९ लाख २० हजार रुपये, कृषी विभाग १ कोटी ३४ लाख ४०० रुपये, पशुसंवर्धन विभाग ७६ लाख ७० हजार रुपये, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या २० टक्के मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी अनुशेषासह ५ कोटी ८६ लाख ८१ हजार ९२८ रुपये, पाणी व देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी ५३ लाख ९० हजार रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी १० टक्के अनुशेषासह १ कोटी ७४ लाख, अपंग कल्याणकारी योजनेसाठी ३ टक्केप्रमाणे ६६ लाख ९ हजार रुपये, अध्यक्ष या लेखाशीर्षकाखाली ८५ लाख ५२ हजार रुपये असे विविध विभागांसाठी अंदाजपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)भरीव तरतुदीची आवश्यकताया अंदाजपत्रकामध्ये टंचाई आणि सेससाठी जास्तची तरतूद केलेली नाही. तसेच बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद होणे आवश्यक आहे. बांधकाम विभागाचे २ कोटी ३ लाख रुपयांचे दायित्व आहे. त्यामुळे या तरतूद केलेल्या रकमेनुसार एकही काम नव्याने घेता येणार नाही. त्यामुळे पाणी, बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता होती, असे उदय बने यांनी सभागृहात स्पष्ट केले. तरतूद कमी : कृषी विभागाच्या सर्व योजना शासनाकडे वर्गजिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभागावर अवकृपा दाखवण्यात आली आहे. यामध्ये कृषी विभाग १ कोटी ३४ लाख ४०० रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी ती मागील तरतूदीपेक्षा ३४ लाख ४०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. तसेच पशुसंवर्धन विभाग ७६ लाख ७० हजार रुपये ही तरतूद कमीच आहे. मागील अंदाजपत्रकाच्या तरतुदीपेक्षा २६ लाख ७० हजारांनी ती कमी केल्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाने कसे चालविणार, असा प्रश्न शेवडे यांनी उपस्थित केला. कृषी विभागाच्या सर्वच योजना शासनाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे करण्यात आलेली तरतूद कमी असून, त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे पशुसंवर्धन, कृषी समिती सभापती व उपाध्यक्ष सतीश शेवडे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.