शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कृती; राजन तेली, अतुल काळसेकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:03 IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे भासवत आहेत. तसेच जिल्हा बँकेने यापूर्वीच घेतलेले निर्णय आताच घेतले असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांची एकप्रकारे दिशाभूल करीत आहेत. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते अशी कृती करीत आहेत, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी केली आहे.

ठळक मुद्दे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कृती; राजन तेली, अतुल काळसेकर यांचा आरोप जुन्याच योजना नवीन भासविण्याचा प्रयत्न, जिल्हा बँक अध्यक्षांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे भासवत आहेत. तसेच जिल्हा बँकेने यापूर्वीच घेतलेले निर्णय आताच घेतले असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांची एकप्रकारे दिशाभूल करीत आहेत. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते अशी कृती करीत आहेत, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी केली आहे.कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित संयुक पत्रकार परिषदेत राजन तेली व अतुल काळसेकर यांनी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जिल्हा बँकेने घेतलेल्या निर्णयाची नव्याने अंमलबजावणी करत असल्याचे सांगत सतीश सावंत हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत.

जिल्ह्यातील २६६ विविध कार्यकारी सोसायट्यांंपैकी ५० ते ५२ सोसायट्यांनीच कर्ज माफीच्या थकबाकीची अंमलबजावणी केली आहे. तर उर्वरीत सोसायट्या अडचणींचा सामना करत आहेत. जिल्ह्यातील सोसायट्या व खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून खत किंवा फवारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन देत असतानाच अतिरिक्त २० टक्के रक्कम देण्याच्या योजनेचे आम्ही समर्थन करतो.

सावंत हे शेतकऱ्यांना १२० रुपये किलो दराने काजु बी खरेदी करण्यास सांगत आहेत. वास्तविक काजू बी साठवून ठेवल्यानंतर ती सुकल्याने ६ ते ९ टक्के येणारी तूट सोसायट्या कशा प्रकारे सहन करणार आहेत? याउलट जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थेट पैसे कसे देता येतील? याचा विचार करावा. काजू बी एक वर्षभर ठेवली तरी त्यांना विना व्याज कोणतेही तारण न घेता रक्कम देता येईल का? याचा विचार करावा.

जिल्ह्यातील शेतकरी हे प्रामाणिक आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांचा विचार करण्यात यावा. याचप्रमाणे पणन महामंडळ वर्षाला कोट्यवधी रुपये बागायतदारांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करते. हा कर्ज पुरवठा या शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे वापरता येईल? याबाबतही विचार करावा.

अतुल काळसेकर यांनी शासनाकडे काजू बागायतदारांसाठी निधीची मागणी केली आहे. शासनाने १०० कोटींच्या निधीची तरतुद करुन ठेवली आहे. गोवा राज्याने तेथील बागायतदार संघाच्या माध्यमातून १०५ रुपये किलो दराने काजू बी खरेदी केली असून गोवा सरकार प्रतिकिलो २० रुपये अनुदान या शेतकऱ्यांना देणार आहे. तशाच प्रकारची योजना महाराष्ट्र शासनाने राबवावी आणि शेतकऱ्यांना प्रतिकिलो २० रुपये अनुदान द्यावे. यातून सोसायट्यांनाही लाभ मिळू शकेल.

आज जिल्ह्यातील काजू व्यापारी ८५ ते ९० रुपयांच्या पुढे जाण्यास तयार नाही. तर जिल्हा बँक १२० रुपये दरावर ठाम आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अभ्यास करुनच याबाबत निर्णय घ्यावा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण फसवणूक करत असाल तर भाजपा हे सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांना भाजपा पाठिंबा देईल. मात्र, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध करेल. जिल्ह्यातील सोसायटयांची अवस्था काजू बी खरेदी करण्याइतपत चांगली नाही.मोरगाव सोसायटीने ५ लाखांच्या कर्जाची मागणी केली आहे. उर्वरीत सोसायट्या का धजावत नाही? याचा विचार करावा. मच्छिमार व अन्य प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून चर्चा केली असल्याचे यावेळी राजन तेली यानी सांगितले.उज्ज्वला गँस योजनेचा लाभ घ्यासिंधुदुर्गात उज्ज्वला गॅस योजनेचे जवळपास ५० हजार ४६३ लाभार्थी आहेत. यातील आतापर्यंत १९ हजार ७४ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेताना सिलिंडरची नोंदणी केली आहे. ३० एप्रिलपर्यंत उज्ज्वला गॅस लाभार्थ्यांनी सिलिंडर घ्यावयाचा आहे. अन्यथा या योजनेचे पुढील अनुदान बँक खात्यात जमा होणार नाही. याची नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी. तसेच या योजनेचा लाभ उठवावा, असे आवाहन यावेळी अतुल काळसेकर यानी केले.

उज्ज्वला गॅस योजनेसाठी ३० दिवसांची असलेली मुदत ४५ ते ६० दिवसांपर्यंत करण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे यावेळी अतुल काळसेकर यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRajan Teliराजन तेली Atul Kalasekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग