शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कृती; राजन तेली, अतुल काळसेकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:03 IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे भासवत आहेत. तसेच जिल्हा बँकेने यापूर्वीच घेतलेले निर्णय आताच घेतले असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांची एकप्रकारे दिशाभूल करीत आहेत. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते अशी कृती करीत आहेत, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी केली आहे.

ठळक मुद्दे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कृती; राजन तेली, अतुल काळसेकर यांचा आरोप जुन्याच योजना नवीन भासविण्याचा प्रयत्न, जिल्हा बँक अध्यक्षांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे भासवत आहेत. तसेच जिल्हा बँकेने यापूर्वीच घेतलेले निर्णय आताच घेतले असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांची एकप्रकारे दिशाभूल करीत आहेत. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते अशी कृती करीत आहेत, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी केली आहे.कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित संयुक पत्रकार परिषदेत राजन तेली व अतुल काळसेकर यांनी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जिल्हा बँकेने घेतलेल्या निर्णयाची नव्याने अंमलबजावणी करत असल्याचे सांगत सतीश सावंत हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत.

जिल्ह्यातील २६६ विविध कार्यकारी सोसायट्यांंपैकी ५० ते ५२ सोसायट्यांनीच कर्ज माफीच्या थकबाकीची अंमलबजावणी केली आहे. तर उर्वरीत सोसायट्या अडचणींचा सामना करत आहेत. जिल्ह्यातील सोसायट्या व खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून खत किंवा फवारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन देत असतानाच अतिरिक्त २० टक्के रक्कम देण्याच्या योजनेचे आम्ही समर्थन करतो.

सावंत हे शेतकऱ्यांना १२० रुपये किलो दराने काजु बी खरेदी करण्यास सांगत आहेत. वास्तविक काजू बी साठवून ठेवल्यानंतर ती सुकल्याने ६ ते ९ टक्के येणारी तूट सोसायट्या कशा प्रकारे सहन करणार आहेत? याउलट जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थेट पैसे कसे देता येतील? याचा विचार करावा. काजू बी एक वर्षभर ठेवली तरी त्यांना विना व्याज कोणतेही तारण न घेता रक्कम देता येईल का? याचा विचार करावा.

जिल्ह्यातील शेतकरी हे प्रामाणिक आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांचा विचार करण्यात यावा. याचप्रमाणे पणन महामंडळ वर्षाला कोट्यवधी रुपये बागायतदारांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करते. हा कर्ज पुरवठा या शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे वापरता येईल? याबाबतही विचार करावा.

अतुल काळसेकर यांनी शासनाकडे काजू बागायतदारांसाठी निधीची मागणी केली आहे. शासनाने १०० कोटींच्या निधीची तरतुद करुन ठेवली आहे. गोवा राज्याने तेथील बागायतदार संघाच्या माध्यमातून १०५ रुपये किलो दराने काजू बी खरेदी केली असून गोवा सरकार प्रतिकिलो २० रुपये अनुदान या शेतकऱ्यांना देणार आहे. तशाच प्रकारची योजना महाराष्ट्र शासनाने राबवावी आणि शेतकऱ्यांना प्रतिकिलो २० रुपये अनुदान द्यावे. यातून सोसायट्यांनाही लाभ मिळू शकेल.

आज जिल्ह्यातील काजू व्यापारी ८५ ते ९० रुपयांच्या पुढे जाण्यास तयार नाही. तर जिल्हा बँक १२० रुपये दरावर ठाम आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अभ्यास करुनच याबाबत निर्णय घ्यावा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण फसवणूक करत असाल तर भाजपा हे सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांना भाजपा पाठिंबा देईल. मात्र, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध करेल. जिल्ह्यातील सोसायटयांची अवस्था काजू बी खरेदी करण्याइतपत चांगली नाही.मोरगाव सोसायटीने ५ लाखांच्या कर्जाची मागणी केली आहे. उर्वरीत सोसायट्या का धजावत नाही? याचा विचार करावा. मच्छिमार व अन्य प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून चर्चा केली असल्याचे यावेळी राजन तेली यानी सांगितले.उज्ज्वला गँस योजनेचा लाभ घ्यासिंधुदुर्गात उज्ज्वला गॅस योजनेचे जवळपास ५० हजार ४६३ लाभार्थी आहेत. यातील आतापर्यंत १९ हजार ७४ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेताना सिलिंडरची नोंदणी केली आहे. ३० एप्रिलपर्यंत उज्ज्वला गॅस लाभार्थ्यांनी सिलिंडर घ्यावयाचा आहे. अन्यथा या योजनेचे पुढील अनुदान बँक खात्यात जमा होणार नाही. याची नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी. तसेच या योजनेचा लाभ उठवावा, असे आवाहन यावेळी अतुल काळसेकर यानी केले.

उज्ज्वला गॅस योजनेसाठी ३० दिवसांची असलेली मुदत ४५ ते ६० दिवसांपर्यंत करण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे यावेळी अतुल काळसेकर यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRajan Teliराजन तेली Atul Kalasekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग