शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 17, 2022 18:49 IST

पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ४५ वाव पाण्यात पार्थ हे १०१ मी. लांबीचे तेल वाहू जहाज १६ सप्टेंबर रोजी अपघातग्रत झाले आहे. अपघातात जहाजावरील १९ खलाशी यांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेच्या अनुषंगाने कमाडंट कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या जहाजावर कोस्ट गार्डची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. अद्याप जहाजातून कोणत्याही प्रकारे तेल गळती सुरु झालेली नाही. अशी माहिती कोस्ट गार्ड रत्नागिरीचे कमांडट यांनी दिली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२३६२-२२८८४७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.घटनेच्या अनुषंगाने प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मालवण, तहसिलदार देवगड, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देवगड यांना संयुक्तरित्या स्थळ पाहणी करुन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना सादर करण्याच्या तसेच घटनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये कोणत्याही अफवा पसरणार नाहीत याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडून देण्यात आली आहे.आवश्यक खबरदारीहे तेलवाहू जहाज असल्याने या जहाजातून तेल गळती झाल्यास विजयदूर्ग ते मालवण भागात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे. मात्र अशी तेल गळती झाल्यास त्यावर त्वरीत उपाययोजना करता यावीत. या करीता कोस्ट गार्डचे एक जहाज चोवीस तास परिस्थितीचे निरीक्षण करीत आहे. तेल गळती होऊन तेल समुद्र किनाऱ्यावर येवू नये याकरीता आवश्यक ती खबरदारी कोस्ट गार्ड करुन घेण्यात येत आहे.जहाजात मोठा डांबर साठाया घटनेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय मालवण यांनी आवश्यक त्या सूचना मच्छिमार सोसायट्यांना निर्गमित केलेल्या असून परवाना अधिकारी देवगड, मालवण व वेंगुर्ला यांना मुख्यालय न सोडणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांच्याकडून जहाजाच्या मालकाला याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. जहाजात सद्यस्थितीत डांबर साठा असून हा साठा पाण्याच्या तळाशी जावून बसणार आहे. त्यामुळे तेल गळतीचा धोका कमी असल्याचे प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांनी सांगितले आहे.पाण्याची तपासणी करण्याच्या सूचनातेल गळती झाली किंवा कसे याची पाहणी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी यांना कळविण्यात आलेले असून समुद्राच्या पाण्याची तपासणी करून या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग