शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आबलोलीत बारशीला तरुण बनतात वाघ अन्...

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

गुहागर तालुका : ग्रामीण भागात प्राचीन परंपरांचे जतन; बच्चे कंपनीसह तरुणांचाही सहभाग

अमोल पवार ल्ल आबलोली२१व्या शतकात जग चंद्रावर, मंगळावर पोहोचले असले तरी ग्रामीण भागात आजही आपल्या प्राचीन परंपरांचे जतन केले जात आहे. त्यातीलच एक परंपरेने साजरा होणारा सण म्हणजे वाघबारशी. गुहागर तालुक्यातील आबलोली येथील ग्रामस्थांनी वाघबारशी सण साजरा केला. या सणामध्ये बालदोस्तही सहभागी झाले होते.दरवर्षी कार्तिक द्वादशीला गावातील शेतकरी-गुराखी बांधव हा उत्सव एकत्रितपणे साजरा करतात. या उत्सवात अबालवृद्धांसह तरुणांचा मोठा सहभाग असतो. कडेकपारीत वसलेले आपले शेतकरी - गुराखी रानावनातून शेती करतात, जनावरे चारतात. अशावेळी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी जंगलातील जांगलदेवाकडे असते. शेतकऱ्यांकडे असणारी दुभती जनावरे, शेती कामाकरिता लागणारे बैल, रेडे हे चरून झाल्यावर एका विशिष्ट ठिकाणी थांबतात, त्यांच्यामागून फिरणारे गुराखी त्या ठिकाणी विश्रांती घेतात. सोबत आणलेली चटणी-भाकरी खातात. या ठिकाणच्या मोकळ्या मैदानाला गोठण असे म्हणतात. गुरेढोरे निवांतपणे रवंथ करतात. जणूकाही हे सारे जांगलदेवाच्या कृपेनेच सुरळीत सुरु असल्याची त्यांची धारणा असते. म्हणूनच आजच्या दिवशी अशा ठिकाणी गोड खिरीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि सर्वजण एकत्रितपणे हा खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्ष्यण करतात.वाघबारशीच्या दिवशी काही तरुणांना शेपटी लावली जाते. अंगावर रंगीबेरंगी पट्टे काढले जातात. मुखवटे परिधान केले जातात आणि प्रतिकात्मक वाघ म्हणून वाडी-वस्ती गावातून पिटाळत गावाबाहेर नेले जाते. त्याच्यावर शेण-मातीचे गोळे फेकले जातात. गावाबाहेर पिटाळताना वाघरु वाघरु असे ओरडतात. नंतर गावाच्या वेशीजवळ नदीवर सर्वजण आंघोळ करतात. नैवेद्य देवाला दाखवून स्वत: भक्ष्यण करतात. जांगलदेवाला सर्वांच्या रक्षणाचे साकडे घालतात. संध्याकाळी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आबलोलीतील या प्रथेला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते आणि ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने गावात जपली जात आहे. विशेष म्हणजे या उत्सवात लहान मुले, तरुण, वयोवृद्ध यांचा सहभाग असतो. त्यामुळे दोन-तीन पिढ्यांच्या एकत्रित समन्वयातून हा उत्सव साजरा होताना दिसतो. काळ कितीही बदलला तरी अजूनही आपले सण-उत्सव, प्रथा परंपरा सहजीवनासाठी नक्कीच पूरक ठरत आहेत.