शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आबलोलीत बारशीला तरुण बनतात वाघ अन्...

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

गुहागर तालुका : ग्रामीण भागात प्राचीन परंपरांचे जतन; बच्चे कंपनीसह तरुणांचाही सहभाग

अमोल पवार ल्ल आबलोली२१व्या शतकात जग चंद्रावर, मंगळावर पोहोचले असले तरी ग्रामीण भागात आजही आपल्या प्राचीन परंपरांचे जतन केले जात आहे. त्यातीलच एक परंपरेने साजरा होणारा सण म्हणजे वाघबारशी. गुहागर तालुक्यातील आबलोली येथील ग्रामस्थांनी वाघबारशी सण साजरा केला. या सणामध्ये बालदोस्तही सहभागी झाले होते.दरवर्षी कार्तिक द्वादशीला गावातील शेतकरी-गुराखी बांधव हा उत्सव एकत्रितपणे साजरा करतात. या उत्सवात अबालवृद्धांसह तरुणांचा मोठा सहभाग असतो. कडेकपारीत वसलेले आपले शेतकरी - गुराखी रानावनातून शेती करतात, जनावरे चारतात. अशावेळी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी जंगलातील जांगलदेवाकडे असते. शेतकऱ्यांकडे असणारी दुभती जनावरे, शेती कामाकरिता लागणारे बैल, रेडे हे चरून झाल्यावर एका विशिष्ट ठिकाणी थांबतात, त्यांच्यामागून फिरणारे गुराखी त्या ठिकाणी विश्रांती घेतात. सोबत आणलेली चटणी-भाकरी खातात. या ठिकाणच्या मोकळ्या मैदानाला गोठण असे म्हणतात. गुरेढोरे निवांतपणे रवंथ करतात. जणूकाही हे सारे जांगलदेवाच्या कृपेनेच सुरळीत सुरु असल्याची त्यांची धारणा असते. म्हणूनच आजच्या दिवशी अशा ठिकाणी गोड खिरीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि सर्वजण एकत्रितपणे हा खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्ष्यण करतात.वाघबारशीच्या दिवशी काही तरुणांना शेपटी लावली जाते. अंगावर रंगीबेरंगी पट्टे काढले जातात. मुखवटे परिधान केले जातात आणि प्रतिकात्मक वाघ म्हणून वाडी-वस्ती गावातून पिटाळत गावाबाहेर नेले जाते. त्याच्यावर शेण-मातीचे गोळे फेकले जातात. गावाबाहेर पिटाळताना वाघरु वाघरु असे ओरडतात. नंतर गावाच्या वेशीजवळ नदीवर सर्वजण आंघोळ करतात. नैवेद्य देवाला दाखवून स्वत: भक्ष्यण करतात. जांगलदेवाला सर्वांच्या रक्षणाचे साकडे घालतात. संध्याकाळी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आबलोलीतील या प्रथेला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते आणि ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने गावात जपली जात आहे. विशेष म्हणजे या उत्सवात लहान मुले, तरुण, वयोवृद्ध यांचा सहभाग असतो. त्यामुळे दोन-तीन पिढ्यांच्या एकत्रित समन्वयातून हा उत्सव साजरा होताना दिसतो. काळ कितीही बदलला तरी अजूनही आपले सण-उत्सव, प्रथा परंपरा सहजीवनासाठी नक्कीच पूरक ठरत आहेत.