शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sindhudurg: मोर्लेत हत्तींकडून बागायती उद्ध्वस्त, लाखोंचे नुकसान 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 22, 2024 17:03 IST

२००० हून अधिक सुपारी, केळी, ५० हून अधिक माडांचा समावेश

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : मोर्ले येथे चार हत्तींच्या कळपाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. तेथील शेतकऱ्यांचे २००० हून अधिक केळी, २०० हून अधिक सुपारी व ५० हून अधिक माड उद्ध्वस्त केले. याखेरीज शेतीच्या पाण्याची पाइपलाइन, कुंपण उद्ध्वस्त केले. यात शेतकरी संतोष मोर्ये, सरस्वती मसुरकर, चंद्रकांत बेर्डे व सत्यवान बेर्डे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.मागील काही दिवसांपासून टस्कर व पिल्लाच्या एका कळपाचा केर, मोर्ले परिसरात वावर होता. तर टस्कर, मादा हत्ती व दोन पिल्ले अशा चार हत्तींचा कळप बांबर्डे परिसरात वास्तव्यास होता. तस्कर व पिल्लू अन्नाच्या शोधात भ्रमंती करत हेवाळे गावात पोहोचला. मात्र तेथे दोन्ही कळपातील टस्कर आमने-सामने आले व एकमेकांना भिडले. चार हत्तींच्या कळपातील टस्कर हा मोठा असल्याने दोन हत्तींच्या कळपातील टस्कराला त्याने पिटाळून लावले व मोठा टस्कर ही त्यांच्या मागे धावला. तेव्हापासून त्याचा केर, मोर्ले परिसरातच वावर आहे.

तिलारी खोऱ्यात एकूण सहा हत्तींचा वावर असून त्यापैकी चार हत्तींनी मोर्ले येथील केळी, सुपारी व नारळाच्या बागायती उद्ध्वस्त केल्या आहेत. मोर्ले गावचे उपसरपंच असलेले शेतकरी संतोष मोरया यांच्या फळबागायतीत घुसून हत्तींनी सुमारे दोन हजार केळींचा फडशा पाडला. तसेच दोनशे सुपारी व ५० माड उद्ध्वस्त केले. शिवाय त्यांनी शेतीसाठी केलेली पाण्याची पाइपलाइन, शेतीसाठी बांधलेले संरक्षक कुंपण ही उद्ध्वस्त केले आहे. याखेरीज शेतकरी सरस्वती मसूरकर यांची सुपारींची मोठी झाडे जमीन दोस्त केली. सत्यवान बेर्डे व चंद्रकांत बेर्डे यांच्या देखील सुपारी व माड उद्ध्वस्त केल्या.

कष्टाने फुलविलेली फळबागायती डोळ्यादेखत नष्टयात चारही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या फळबागायती डोळ्यादेखत नष्ट झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. वनविभागाने या हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली.

वाढीव नुकसान भरपाई द्यावी : संतोष मोर्येहत्ती प्रश्नासंदर्भात तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करण्याचे पाप सरकार करत आहे. शेतकऱ्यांना मुंबईत बोलावून हत्ती हटाव संदर्भात घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे. तिलारी खोऱ्यात सध्या सहा हत्तींचा वावर असून शेतकऱ्यांची मोठी हानी सुरू आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग