शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कणकवलीत कचरा व्यवस्थापन, प्रक्रियेसाठी ९०० कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 6:25 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईलया प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ३ एकर जमिन ए. जी. डॉटर्स या कंपनीला देण्यात येणार आहे. शून्य कचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणारा हा प्रकल्प होण्यासाठी ९०० कोटीची गुंतवणूक या  कंपनीकडून करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी येथे केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईल. देशातील तिसरा अन महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प या निमित्ताने कणकवलीत होत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली नगरपंचायत सभागृहात ए. जी. डॉटर्स कंपनीकडून कचरा निर्मुलन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतर प्रक्रीयेचा प्रस्ताव नगरपंचायतकडे आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सादर केला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अ‍ॅड. विराज भोसले, अबिद नाईक, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, किशोर राणे, कविता राणे, उर्मी जाधव आदी नगरसेवक उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने आम्ही कणकवलीत आणत आहोत. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा प्रकल्प २४ तास सुरु राहील. याठिकाणी २५ वर्षे कामकाज सुरु राहणार आहे. पुढील आठ महिन्यात प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल. त्याचबरोबर शहरातील नागरिकांसाठी पाईपलाईनचा गॅस निर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. कचरा व्यवस्थापनातून विकासाचा राजमार्ग !सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात आजचा हा दिवस ऐतिहासीक नोंद करणारा आहे. जिल्ह्यातील कचºयाचा प्रश्न कणकवली नगरपंचायतच्या पुढाकारामुळे मार्गी लागत आहे. देशात स्वच्छ जिल्हा म्हणुन सातत्याने दोन वर्षे सिंधुुदुर्गाचा सन्मान झाला आहे. ए.जी.डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून शून्य कचरा व्यवस्थापनातून पुढील २५ वर्षे जिल्हा देशात अव्वल राहील. कणकवलीचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हाती घेतलेले हे शिवधनुष्य लवकरच यशस्वी होईल. या प्रकल्पातुन कचºयाच्या माध्यमातून एक विकासाचा राजमार्ग उभा राहतो, हे आमच्या विरोधकांना दिसेल.असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी  सांगितले. 

कणकवली नगरपंचायत येथे शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतराचा प्रस्ताव ए. जी. डॉटर्स कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी सादर केला . यावेळी आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (अनिकेत उचले)

 

Attachments area

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGovernmentसरकार