शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

कणकवलीत कचरा व्यवस्थापन, प्रक्रियेसाठी ९०० कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 18:27 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईलया प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ३ एकर जमिन ए. जी. डॉटर्स या कंपनीला देण्यात येणार आहे. शून्य कचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणारा हा प्रकल्प होण्यासाठी ९०० कोटीची गुंतवणूक या  कंपनीकडून करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी येथे केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईल. देशातील तिसरा अन महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प या निमित्ताने कणकवलीत होत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली नगरपंचायत सभागृहात ए. जी. डॉटर्स कंपनीकडून कचरा निर्मुलन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतर प्रक्रीयेचा प्रस्ताव नगरपंचायतकडे आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सादर केला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अ‍ॅड. विराज भोसले, अबिद नाईक, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, किशोर राणे, कविता राणे, उर्मी जाधव आदी नगरसेवक उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने आम्ही कणकवलीत आणत आहोत. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा प्रकल्प २४ तास सुरु राहील. याठिकाणी २५ वर्षे कामकाज सुरु राहणार आहे. पुढील आठ महिन्यात प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल. त्याचबरोबर शहरातील नागरिकांसाठी पाईपलाईनचा गॅस निर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. कचरा व्यवस्थापनातून विकासाचा राजमार्ग !सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात आजचा हा दिवस ऐतिहासीक नोंद करणारा आहे. जिल्ह्यातील कचºयाचा प्रश्न कणकवली नगरपंचायतच्या पुढाकारामुळे मार्गी लागत आहे. देशात स्वच्छ जिल्हा म्हणुन सातत्याने दोन वर्षे सिंधुुदुर्गाचा सन्मान झाला आहे. ए.जी.डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून शून्य कचरा व्यवस्थापनातून पुढील २५ वर्षे जिल्हा देशात अव्वल राहील. कणकवलीचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हाती घेतलेले हे शिवधनुष्य लवकरच यशस्वी होईल. या प्रकल्पातुन कचºयाच्या माध्यमातून एक विकासाचा राजमार्ग उभा राहतो, हे आमच्या विरोधकांना दिसेल.असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी  सांगितले. 

कणकवली नगरपंचायत येथे शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतराचा प्रस्ताव ए. जी. डॉटर्स कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी सादर केला . यावेळी आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (अनिकेत उचले)

 

Attachments area

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGovernmentसरकार