शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कणकवलीत कचरा व्यवस्थापन, प्रक्रियेसाठी ९०० कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 18:27 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईलया प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ३ एकर जमिन ए. जी. डॉटर्स या कंपनीला देण्यात येणार आहे. शून्य कचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणारा हा प्रकल्प होण्यासाठी ९०० कोटीची गुंतवणूक या  कंपनीकडून करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी येथे केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईल. देशातील तिसरा अन महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प या निमित्ताने कणकवलीत होत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली नगरपंचायत सभागृहात ए. जी. डॉटर्स कंपनीकडून कचरा निर्मुलन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतर प्रक्रीयेचा प्रस्ताव नगरपंचायतकडे आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सादर केला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अ‍ॅड. विराज भोसले, अबिद नाईक, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, किशोर राणे, कविता राणे, उर्मी जाधव आदी नगरसेवक उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने आम्ही कणकवलीत आणत आहोत. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा प्रकल्प २४ तास सुरु राहील. याठिकाणी २५ वर्षे कामकाज सुरु राहणार आहे. पुढील आठ महिन्यात प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल. त्याचबरोबर शहरातील नागरिकांसाठी पाईपलाईनचा गॅस निर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. कचरा व्यवस्थापनातून विकासाचा राजमार्ग !सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात आजचा हा दिवस ऐतिहासीक नोंद करणारा आहे. जिल्ह्यातील कचºयाचा प्रश्न कणकवली नगरपंचायतच्या पुढाकारामुळे मार्गी लागत आहे. देशात स्वच्छ जिल्हा म्हणुन सातत्याने दोन वर्षे सिंधुुदुर्गाचा सन्मान झाला आहे. ए.जी.डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून शून्य कचरा व्यवस्थापनातून पुढील २५ वर्षे जिल्हा देशात अव्वल राहील. कणकवलीचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हाती घेतलेले हे शिवधनुष्य लवकरच यशस्वी होईल. या प्रकल्पातुन कचºयाच्या माध्यमातून एक विकासाचा राजमार्ग उभा राहतो, हे आमच्या विरोधकांना दिसेल.असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी  सांगितले. 

कणकवली नगरपंचायत येथे शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतराचा प्रस्ताव ए. जी. डॉटर्स कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी सादर केला . यावेळी आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (अनिकेत उचले)

 

Attachments area

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGovernmentसरकार