शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

७९ गावांवर दरडीची टांगती तलवार

By admin | Updated: June 23, 2015 00:42 IST

यंत्रणा खडबडून जागी : बचावकार्यासाठी सक्षम यंत्रणाच नाही, आपत्कालीन यंत्रणेच्याही मर्यादा उघड...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील डोंगर पाण्याने फुगले असून शनिवारी रात्री रत्नागिरीतील शिरगाव बाणेवाडीतील घरावर दरड कोसळून घराच्या भिंतीखाली सापडून माय-लेकीचा अंत झाला. सोमवारी पहाटे दापोली तालुक्यातील दाभोळ येथे दरडीखाली तीन घरे गाडली गेली. या दोन घटनांमुळे जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात दरडी कोसळण्याची संभाव्यता असलेल्या ७९ गावांतील ग्रामस्थ या घटनांनी हादरले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे मात्र बचाव कार्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यात भूवैज्ञानिक स्तरावर सर्वेक्षण झालेली अशी १६ गावे असून दरड कोसळण्याची शक्यता असलेली आणखी ६३ गावे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ७९ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. भूवैज्ञानिक स्तरावर सर्वेक्षण झालेल्या गावांमधीलच दाभोळ या गावात सोमवारी पहाटे दरड कोसळली. भूवैज्ञानिक स्तरावर दरड कोसळण्याची संभाव्यता असलेल्या ज्या सोळा गावांची यादी करण्यात आली आहे त्यात आज दरड कोसळलेल्या दाभोळ गावाचाही समावेश आहे. तसेच या १६ गावांमध्ये दापोली तालुक्यातील उंबरशेत, कोंडगाव हवेली, कडुक खुर्द, कोळबांद्रे, खेड तालुक्यातील खोपी, रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे, चांदेराई, चिंद्रवली, लांजा तालुक्यातील निवसर, खोरनिनको, असोडे, राजापूर तालुक्यातील हसोळ गोपाळवाडी, शिवणे बुद्रुक, वडद हसोळ, संगमेश्वमधील रामपेठ या गावांचा समावेश आहे. ज्या गावांचे भूवैज्ञानिक स्तरावर सर्वेक्षण झालेले नाही, परंतु ज्या गावांत डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांना, घरांना धोका आहे, अशा ६३ गावांची यादी जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय धोकादायक गावे पुढीलप्रमाणे : दापोली-हर्णै, मुरूड, कर्दे, पाजपंढरी, बुरोंडी, करंजगाव, लाडघर, केळशी. खेड-खेड शहर, चिंचघर, प्रभूवाडी, सुसेरी, देवघर, वडगाव बुु., तळवट खेड, धामणंद, वेरळ, चोरवणे, निळवणे, शिरगाव. संगमेश्वर तालुका-कोळंबे, पांगेरी, कसबा, साखरपा आंबाघाट. चिपळुण-पोफळी, कोंडफणसवणे, अडरे, अनारी, वीर, काळुस्ते खुर्द, केतकी, करंबवणे, विवली, मालदोली, भिले, तिवरे, गोवळकोट, कोळकेवाडी, मुंडेतर्फ चिपळुण, पिंपरी बुद्रुक, कुंभार्ली, नागावे, शिरगाव.गुहागर-कातळे नवानगर, पडवे, तवसाळ खुर्द, घरटवाडी तर्फे वेरळ, धोपावे, नवानगर, पाचेरी सडा, पाचेरी आगर, भातगाव, असुरे, आंबेरे खुर्द. मंडणगड-गोवेळे, शेनाळे, चिंचाळी, कोंडगाव, देऊनगरी, वाल्मिकीनगर, नारायणनगर, बाणकोट, साखरी. (प्रतिनिधी)उपाययोजनाच नाहीत?बाणेवाडी, दाभोळ घटनांती प्रशासन खडबडून जागे.बचाव कार्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याची चर्चा.दरडी कोसळण्याची संभाव्यता असलेल्या ७९ गावांतील ग्रामस्थ या घटनांनी हादरले.भूवैज्ञानिक स्तरावर सर्वे झालेली १६ गावे.दरड कोसळण्याची शक्यता असलेली आणखी ६३ गावे.जिल्ह्यातील १६ गावांतील दरडी कोसळण्याची संभाव्यता असल्याबाबत भूवैज्ञानिक स्तरावर सर्वे झाला आहे. उर्वरित ६३ गावांनाही दरडी कोसळण्याचा धोका आहे. या गावांत अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या गेलेल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल होत आहे.दरडींमुळे धोका असलेल्या गावांची तालुकावार संख्यादापोली१३खेड१३रत्नागिरी३लांजा३राजापूर३संगमेश्वर५चिपळुण१९गुहागर११मंडणगड९जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी दरडींचा धोका आहे. मात्र प्रशासन नोटीस पाठवण्यापलिकडे काहीच करत नाही तर दुसरीकडे स्थानिक घर सोडण्यास तयार नसल्याने प्रश्न जैसे थे आहे.