शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

रत्नागिरी विभागात ७३ लाखांची तिकिटे शिल्लक

By admin | Updated: July 24, 2015 00:40 IST

एस. टी. महामंडळ : मोठ्या रकमेच्या तिकिटांना वालीच नाही

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स मशिनव्दारे तिकिटे देण्यात येत असल्यामुळे रत्नागिरी विभागात ७२ लाख ८६ हजार ६८ रुपयांची छापिल तिकिटे शिल्लक राहिली आहेत. ईटीएम मशीन बंद पडल्यास पर्यायी जुन्या तिकीट ट्रेचा वापर करण्यात येतो. मात्र, संबंधित तिकिटे देत असताना मोठ्या रकमेच्या तिकिटांबरोबर छोट्या रकमेची तिकीटे जोडून दिली जातात. परंतु छोट्या रकमेची तिकिटे संपल्यामुळे मोठ्या रकमेची तिकिटे शिल्लक राहिली आहेत.रत्नागिरी विभागात दोन वर्षांपूर्वी ईटीएम मशिनव्दारे तिकीटे देण्यास प्रारंभ झाला. या मशिनवर संबंधित मार्गाची माहिती तसेच प्रत्येक किलोमीटरप्रमाणे तिकिटे व त्यांचे दर याची माहिती असते. त्यामुळे वाहकाला प्रवाशांनी थांब्याचे नाव सांगताच तिकीट देणे सोपे होते. शिवाय हिशेबही ठेवणे सोयीस्कर होत आहे. मात्र, तिकीट ट्रे मधील तिकिटे किती संपली, किती शिल्लक राहिली, याचा हिशेब लिहून त्याप्रमाणे हिशेब द्यावा लागतो. यामध्ये नजरचुकीने कमी अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिकीट ट्रे वाहकांना कटकटीचा ठरत होता. मात्र, ईटीएम हाताळणे सोपे व सोयीस्कर वाटू लागले आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तिकिटे संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाहकांना ईटीएमबरोबर अधूनमधून तिकिटे वापरण्यास सांगण्यात येते. मात्र, जोडून देण्यात येणारी कमी रकमेची तिकिटे शिल्लक नसल्यामुळे मोठ्या रकमेची लाखोच्या घरातील तिकिटे शिल्लक राहिली आहेत.एक रुपयाची सर्व तिकिटे संपली आहेत. २ रूपयांची केवळ ४००, ३ रूपयांची २००, ४ ते ९ रूपयांची शून्य, तर १० रूपयांची केवळ ९०० तिकीटे शिल्लक राहिली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी निम्या आकारात प्रवास सवलत देण्यात येतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकीटापैकी १ रूपयांची ३००, तर २ रूपयांची ५०० तिकीटे शिल्लक राहिली आहेत. या मार्गावरील ८ रुपयांची २८००, १० रुपयांची १६००, तर १२ रुपयांची ३९००, तर १३ रूपयांची ४०० तिकिटे शिल्लक राहिली आहेत.तिकीट ट्रे व त्याचा हिशेब सांभाळण्यापेक्षा ईटीएम मशीन वापरण्यास वाहक प्राधान्य देत आहेत. शहरी मार्ग असो वा ग्रामीण ईटीएम मशीनचा वापर सर्रास होत आहे. ईटीएम मशीन चार्जिंग करावे लागते. त्यामुळे अनेकवेळा मशीन बंद पडण्याचा प्रकार घडतो. परंतु त्यावेळी नाईलाजाने वाहकांना तिकीट ट्रेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, सध्या कमी रकमेची तिकिटे संपल्यामुळे वाहकांपुढे कोणती तिकिटे द्यावीत, असाही प्रश्न पडत आहे. (प्रतिनिधी)मंडणगड आगारात ३७ लाख १० हजार ४२१, दापोली येथे ४९ लाख ५० हजार, चिपळुणात १४ लाख २० हजार, गुहागर १ लाख ५२ हजार ७५ हजार, देवरूख ५४ लाख २६ हजार २००, रत्नागिरी १७ लाख ७१ हजार २०४, लांजा ७७ लाख २७ हजार ५००, राजापूर २५ लाख ३३ हजार ३०० मिळून एकूण ७२ लाख ८६ हजार ६८ रूपयांची तिकिटे शिल्लक राहिली आहेत.