शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाटीलकीविना ६८ गावे...

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

जिल्ह्यातील स्थिती : अतिरिक्त भार नजिकच्या गावातील पाटलांवर

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी --पोलिस पाटील भरती प्रक्रिया न राबविली गेल्याने सिंधुदुर्गातील तब्बल ६८ गावे पोलिस पाटील पदाविना शिल्लक राहिलेली आहेत. त्यामुळे या गावचा अतिरिक्त भार नजिकच्या गावातील पोलिस पाटलांवर पडलेला आहे. गावकीच्या राजकारणामध्ये पोलिस पाटलांना गावच्या पाटलाचा दर्जा असल्यामुळे या पदाला मोठा मान आहे. प्रशासन व गावकऱ्यांमधील दुवा म्हणून पोलिस पाटलांची ओळख आहे. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी पोलिस पाटलावर असते. पूर्वीपासून गावागावात ही पदे कार्यरत आहेत. विशेषकरून पोलिस खाते, तहसीलदार यांच्याशी या पदाचा जवळचा संबंध येतो. गावागावातील कायदा व सुव्यवस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरवणे, गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तींची माहिती तहसिलदारांना कळविणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे, अशी कामे पोलिस पाटलांवर सोपविण्यात आलेली आहेत. सिंधुदुर्गाचा विचार केला तर सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या तीन उपविभागामध्ये एकूण पोलिस पाटलांच्या ४६२ मंजूर पदांपैकी ३९४ पदेही भरण्यात आलेली आहेत. यातील काही पदांसाठी जाहिरनामा काढण्यात आला आहे. मात्र त्याची पुढील कार्यवाही होताना दिसून येत नाही. या रिक्त पदांमध्ये दोन ठिकाणच्या गावातील पोलिस पाटलांना बडतर्फ तर पोलिस पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर वैभववाडीमध्ये एक पद न्यायप्रविष्ठ राहिले आहे. आरक्षणानुसार उमेदवारच नाहीतजिल्ह्यातील रिक्त ६८ पदांपैकी ४१ रिक्त पदे भरतीचा जाहिरनामा होता. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सदयस्थितीत प्रशासनाच्या रेकॉर्डला ६८ गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया राबवूनही या पदांसाठी विशिष्ट आरक्षण पडल्याने व त्या ठिकाणी उमेदवार नसल्याने हे पद अखेर रिक्त राहिले आहे.दोन पोलिस पाटलांना केले बडतर्फसावंतवाडी उपविभागातील दोन गावामधील पोलिस पाटलांना प्रशासनाने बडतर्फ केले आहे. कामात अनियमितता असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तर ७ पोलिस पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १० पोलिस पाटील मयत झाल्यानने पदे रिक्त राहिली आहेत.