शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या आठवणी होणार जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:51 IST

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे ...

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे आले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळ तसेच कणकवलीवासीयांतर्फे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजनप्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षी अर्जुन तावडे बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजनप्रेमींना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला. त्यामुळे तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावास्येच्या काळरात्री भजनप्रेमींवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील कर्ती-सवरती माणसे मृत झाली होती. या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधीतच पोहोचली. या संकटसमयी अनेक व्यक्ती मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमींना सावंतवाडी व वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५० वर्षे त्यांचे कुटुंबीय तसेच कणकवलीवासीय सुदर्शन मित्रमंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत.आज डबलबारी भजनाचा कार्यक्रमसर्वपित्री अमावास्येच्या दिवशी तेलीआळी येथे कणकवलीवासीय एकत्र येतात. भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिंना आदरांजली वाहिली जाते. या अपघाताला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अपघाताच्या वेळी ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच भजनही होणार आहे. त्यानंतर आमने-सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पोखरण येथील बुवा समीर कदम व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.