शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या आठवणी होणार जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:51 IST

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे ...

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे आले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळ तसेच कणकवलीवासीयांतर्फे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजनप्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षी अर्जुन तावडे बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजनप्रेमींना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला. त्यामुळे तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावास्येच्या काळरात्री भजनप्रेमींवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील कर्ती-सवरती माणसे मृत झाली होती. या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधीतच पोहोचली. या संकटसमयी अनेक व्यक्ती मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमींना सावंतवाडी व वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५० वर्षे त्यांचे कुटुंबीय तसेच कणकवलीवासीय सुदर्शन मित्रमंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत.आज डबलबारी भजनाचा कार्यक्रमसर्वपित्री अमावास्येच्या दिवशी तेलीआळी येथे कणकवलीवासीय एकत्र येतात. भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिंना आदरांजली वाहिली जाते. या अपघाताला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अपघाताच्या वेळी ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच भजनही होणार आहे. त्यानंतर आमने-सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पोखरण येथील बुवा समीर कदम व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.