शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

जिल्ह्यात १०७ जागांसाठी ४७३ उमेदवारी अर्ज

By admin | Updated: October 30, 2016 00:53 IST

नगरपालिका निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी २५ जणांचे अर्ज

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठीच्या १०७ जागांसाठी तब्बल विक्रमी ४७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची शनिवार ही शेवटची मुदत असल्याने सर्वच ठिकाणी उमेदवारांची तुडुंब गर्दी झाली होती. चार नगरपरिषदांमध्ये होणाऱ्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी २५ अर्ज दाखल झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदांची आणि दापोली नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच ठिकाणी उमेदवारांची रीघ लागली होती. रत्नागिरीमध्ये नगरसेवकांच्या ३0 जागांसाठी १२0 अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक जागा रत्नागिरी नगरपरिषदेतच असल्याने येथील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. शिवसेना, भाजप स्वबळावर लढत असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. अर्थात या आघाडीतील जागा वाटपावर अजून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. रत्नागिरीत जनजागृती संघाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून, काही अपक्ष उमेदवार या संघाकडून उभे केले आहेत. (प्रतिनिधी)चिपळूणमध्ये सर्व पक्षांची स्वबळावर लढतचिपळूणमध्ये २६ जागांसाठी ११३ अर्ज दाखल झाले आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची जास्त गर्दी झाल्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते. येथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चार पक्ष स्वबळावर लढत आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे यावेळी राष्ट्रवादीतील काही मंडळी शिवसेनेला सहकार्य करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.नगरसेवकपदासाठी विक्रमी अर्जनगर परिषदजागाअर्जरत्नागिरी३0१२0चिपळूण२६११३खेड१७६३राजापूर१७६९दापोली१७१0८खेडमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवारांनी आणि नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे मनसे आणि राष्ट्रवादीने शहर विकास आघाडी केल्यामुळे शिवसेनेला कडवे आव्हान उभे झाले आहे. भाजप येथेही स्वबळावर लढत आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये १७ जागांसाठी १0८ अर्ज दाखल झाले आहेत. खेड अणि राजापूरमध्ये अर्जांची संख्या कमी असली तरी दापोलीमध्ये मात्र ही संख्या मोठी आहे.२ नोव्हेंबरला या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ११ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.