शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पाणीटंचाईवरून जोरदार खडाजंगी, सावंतवाडीला ४६ कोटींची पाणी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:30 IST

Sawantwadi Sindhdurgnews- सावंतवाडी शहरात ऐन मार्च महिन्यात होणाऱ्या पाणीटंचाईवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र नगराध्यक्ष संजू परब यांनी वेळीच यात हस्तक्षेप करत सावंतवाडी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून, त्यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र शिवसेना सदस्यांनी नियमबाहय नळ कनेक्शन्स दिली आहेत का, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमा अशी मागणी केली. त्याला नगराध्यक्षांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्देपाणीटंचाईवरून जोरदार खडाजंगी, सावंतवाडीला ४६ कोटींची पाणी योजना चौकशी समिती नेमण्याची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात ऐन मार्च महिन्यात होणाऱ्या पाणीटंचाईवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र नगराध्यक्ष संजू परब यांनी वेळीच यात हस्तक्षेप करत सावंतवाडी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून, त्यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र शिवसेना सदस्यांनी नियमबाहय नळ कनेक्शन्स दिली आहेत का, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमा अशी मागणी केली. त्याला नगराध्यक्षांनी मंजुरी दिली.सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, राजू बेग, नासिर शेख, सुरेंद्र बांदेकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी उपस्थित होते.नगरपालिकेची मासिक बैठक सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

मात्र आयत्या वेळच्या विषयात नगरसेविका लोबो यांनी सावंतवाडीत जुनाबाजार, सालईवाडा, समाजमंदिर परिसरात ऐन मार्च महिन्यात पाणीटंचाई कशी भासते, असा सवाल करत या पाणीटंचाईमागे कोण आहे? तुम्हाला बदनाम करण्यासाठी ही पाणीटंचाई करण्यात आली आहे का? असा सवाल केला.तसेच या पाणी टंचाईची चौकशी करण्याची मागणी केली. यावरून नगरसेवक नासिर शेख व सुधीर आडिवरेकर यांनी, तुमच्या काळापासून ही पाणीटंचाई आहे, मग तेव्हा गप्प का होता? असा सवाल करत, प्रत्येकवेळी चौकशीची मागणी करता, मग तुमच्या काळात काय केले? असा सवाल केला. तसेच लोबो व बांदेकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर दिले. यावरून शिवसेना व भाजपच्या नगरसेवकामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.नगराध्यक्षांनी सदस्यांना केले शांतअखेर यामध्ये नगराध्यक्ष संजू परब यांनी सर्वच नगरसेवकांना शांत करत, मी स्वत: नगराध्यक्ष झाल्यापासून सावंतवाडीतील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून नव्या नळपाणी योजनेसाठी पाठपुरावा करत होतो. त्याला जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली असून, ४० कोटी खर्चाची योजना तयार करण्यात येणार आहे. त्यात ६ कोटी रुपये सावंतवाडी नगरपालिका देणार असून, एकूण ही ४६ कोटीची योजना असणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगत सर्व सदस्यांना शांत केले, तर चराठे माजगाव ग्रामपंचायतींना नगरपालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला आणखी ९० दिवसांची मुदत वाढवून दिल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग