शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

४५ हजार ग्राहक थकबाकीदार!

By admin | Updated: February 13, 2015 00:53 IST

महावितरणपुढे आव्हान : वसुली मोहीमेकडे द्यावे लागणार लक्ष

रत्नागिरी : आॅनलाईन, एटीपी केंद्र किंवा अन्य वीजबिल भरणा केंद्रांवर दरमहा प्राधान्याने वीजबिल भरणारे प्रामाणिक ग्राहक असताना दुसरीकडे वीजबिले थकविणारे ग्राहकही आहेत. त्याचा भुर्दंड महावितरणला बसत आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ५४६ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ६६ हजार रूपये थकविले आहेत.महावितरण कंपनीकडून ग्राहकांना वीजबिल भरणे सुकर व्हावे, यासाठी बँका, पतसंस्था, महा-ई-सेवा केंद्रांबरोबरच आॅनलाईन तसेच एटीपी केंद्रांमधून वीजबिले स्वीकारण्यात येतात. तरीही जानेवारीअखेर जिल्ह्यातील ४५ हजार ५४६ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ६६ हजार रूपये थकविले आहेत. चिपळूण विभागातील ९ हजार ६०२ घरगुती ग्राहकांनी ६८ लाख ८० हजार, वाणिज्य विभागाच्या १२८३ ग्राहकांनी २९ लाख ४५ हजार, तर औद्योगिकच्या ३१७ ग्राहकांकडून १६ लाख ३ हजार, कृषिपंपाच्या ३४२ ग्राहकांनी २ लाख १२ हजार, सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या १८८ कार्यालयांकडून १७ लाख ४३ हजार, स्वराज्य संस्थांकडून ५३ हजार, अन्य १४५ ग्राहकांकडून २ लाख ५० हजार मिळून ११ हजार ८८४ ग्राहकांकडून १ कोटी ३६ लाख ८५ हजार रूपये थकविण्यात आले आहेत. खेड विभागातील १२ हजार १२९ घरगुती ग्राहकांकडून ९२ लाख ६७ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. वाणिज्य विभागाच्या १३०५ ग्राहकांकडून २३ लाख ४२ हजार, औद्योगिक विभागातील २९८ ग्राहकांकडून २८ लाख ३० हजार, कृषिपंपाच्या ६१० ग्राहकांकडून ४ लाख ६९ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागातील २१६ कार्यालयांकडून १४ लाख ५४ हजार, पथदिव्यांचे २५२, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १६ लाख ८८ हजार, अन्य २३२ ग्राहकांकडून ५ लाख ३२ हजार मिळून एकूण १५ हजार ४२ ग्राहकांनी १ कोटी ८५ लाख ८२ हजार रूपये थकविले आहेत. विभागातील १४ हजार ९२७ ग्राहकांनी ९८ लाख ७३ हजार रूपये थकविले आहेत. वाणिज्य विभागातील २ हजार ५७ ग्राहकांकडून ३६ लाख १० हजार, औद्योगिकच्या ३६४ ग्राहकांनी ८ लाख ९८ हजार, कृषिपंपाच्या ७१४ ग्राहकांनी ४ लाख १६ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठाच्या २६१ कार्यालयांकडून ८ लाख ७७ हजार, ३८ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १ कोटी ३९ लाख, अन्य २५९ ग्राहकांकडून ३ कोटी ८७ लाख मिळून १८ हजार ६२० ग्राहकांकडून १ कोटी ६१ लाख ९९ हजार रूपयांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील थकबाकी (लाखामध्ये)ग्राहक संख्याथकबाकीघरगुती३६६५८२६०.२१वाणिज्य४६४५८८.९७औद्योगिक९७९५३.३०कृषिपंप१६६६१०.९७पाणीपुरवठा ६६५४०.७३पथदीप२९७१८.७९अन्य६३६११.६८एकूण४५५४६४८४.६६महावितरण कंपनीने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीजगळती अधिक शिवाय वीजबिल वसुली कमी आहे, त्या फिडरवर भारनियमन करण्यात येते. महावितरणकडून वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.