शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पावरील ४५ लाख खर्च निरूपयोगी ठरलाय

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

दापोली नगरपंचायत : निसर्गऋण प्रकल्प ‘कचऱ्यात’

दापोली : शहरातील ओल्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे तत्कालिन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी मिथेन वायूवर पथदीप प्रज्वलित करण्याचे स्वप्न दाखवले होते. प्रत्यक्षात हे स्वप्न दिवास्वप्नच ठरले असून, निसर्गऋण प्रकल्पाचा उद्देश फसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे निसर्गऋण प्रकल्पासाठी करण्यात आलेला आजपर्यंतचा ४५ लाख ५० हजारांचा खर्च कचऱ्यात गेल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या केंद्रीय कृषी व जैवतंत्रज्ञान विभागाने कचऱ्याची विल्हेवाट लावून आर्थिक नफा मिळवून देणारा निसर्गऋण प्रकल्प दापोलीत कार्यान्वित केला. खत निर्मिती करणे, मिथेन वायू निर्मिती करणे, दापोलीतील पथदीप प्रकाशित करणे अशी उद्दिष्टे समोर ठेवून आॅगस्ट २००६मध्ये या प्रकल्पाला सुरूवात झाली. नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष अविनाश केळसकर यांनी दापोलीकरांचा कचरा प्रश्न निकाल काढण्यासाठी हा प्रकल्प दापोलीत आणला. भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. शरद काळे यांनी प्रकल्पाचे महत्त्व पटवून देत २५ ते २८ लाखांत प्रकल्प होईल, असे संकेत दिले होते. तब्बल ४ वर्षांच्या कालावधीनंतर पूर्णत्त्वास गेलेल्या प्रकल्पाला सुमारे ३३ लाखांचा खर्च झाला. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या प्रकल्पाचा उद्देश लवकरच सफल होईल, असा विश्वास २०१० मध्ये देऊन प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ दापोली सुंदर दापोलीचे चित्र उभे केले होते.३० क्युबीक मीटर बायोगॅसचा वापर करून ४०० पथदीप पेटवण्याचा प्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले. गॅस साठविण्यासाठी बलून्स व २ फीडर्सची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले होते. सुमारे ३ ते ५ टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता असलेल्या निसर्गऋण प्रकल्पाचे उद्दिष्ट सफल झाले की नाही, याचा विचार केला तर या प्रकल्पावरील खर्च कचऱ्यातच गेल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.सद्यस्थितीचा विचार करता एकही पथदीप या प्रकल्पाच्या माध्यमातून उजळलेला नाही. मिथेन वायू तयार झाला तरीही तो वायू साठवून ठेवण्याची व्यवस्था नगरपंचायतीकडे नाही. लाखो रूपये खर्चून उभारलेल्या टाक्या, वायू साठवण्यासाठी घेतलेले बलून्स यांची अवस्था बिकट झाली आहे. बलूनमध्ये वायू साठविण्याची क्षमताच उरलेली नाही, तर वीजनिर्मिती कशी होणार, हे न उलगडणारे कोडे आहे. वीज तयार केली तर ती साठवणूक करण्याची काहीच यंत्रणा उपलब्ध नाही. २००६-२००७मध्ये ३३ लाख, २००९-२०१० मध्ये १२ लाख ५० हजार असे सुमारे ४५ लाख ५० हजार खर्चूनही दापोलीत एकही दिवा पेटलेला नाहीच, शिवाय कचरा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अजूनही डंपिंग ग्राऊंडचा उपयोग करावा लागत आहे.सध्याचा निसर्गऋण प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अजून सुमारे १५ लाखांचा निधी खर्ची टाकावा लागणार आहे. प्रीडायझेस्टरसाठी सुमारे २ लाख ९८ हजार, गॅस बलून्स नवीन खरेदी करण्याकरिता ६ लाख ८५ हजार, तर वीजनिर्मिती करून शहरातील गार्डनमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी ६ लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तशा निविदाही निघाल्या आहेत.प्रकल्पाचा खर्च दुप्पट झाला आहे. तरीही उद्दिष्टे सफल किती झाली, हे न उलगडणारे कोडेच आहे. कचरामुक्ती होऊन दापोली शहरात पथदीप निसर्गऋणमुळे केव्हा प्रकाशमान होतील, याकडे डोळे लागून राहिले आहेत.(प्रतिनिधी)प्रयत्न तोकडे पडले ...दापोली शहरातील कचऱ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे गाजत आहे. या ठिकाणी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करण्याचे प्रयत्न झाले आहेत. निसर्गऋण प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. ओल्या कचऱ्याची समस्या मिटविण्यासाठी तात्कालिन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न चालविले होते. यावर झालेला खर्च वाया गेल्याचे जनतेचे म्हणणे आहे. या साऱ्या प्रकाराबद्दल आता चर्चा सुरू आहे.