शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अवैध उत्खननप्रकरणी ३४ लाखांची दंड वसुली

By admin | Updated: July 9, 2015 23:49 IST

धडक कारवाई : उपविभागात चिपळूण तहसील कार्यालयात मंडणगड अव्वल

रत्नागिरी : गौण खनिजांच्या अवैध उत्खननप्रकरणी जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यात धडक कारवाई करून ३४ लाख ७ हजार १६८ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पाच उपविभागात चिपळूण (२ लाख ७८ हजार) अव्वल असून, तहसीलमध्ये मंडणगड (९ लाख ३३ हजार ९८५) अव्वल आहे.वाळू, चिरा, दगड, माती आदी गौण खनिजांच्या उत्खननावर गेली दीड वर्षे बंदी होती. त्यामुळे गौण खनिजांचा लिलाव राज्यभर थांबले होता. याचा फटका जिल्ह्यालाही बसत होता. खासगीबरोबरच सर्व शासकीय बांधकामेही मोठ्या प्रमाणावर रखडली होती. त्यामुळे बंदी उठण्याची मागणी होत होती.बंदी कालावधीत जिल्ह्यात एकूण १३१ प्रकरणांवर झालेल्या या कारवाईत सर्व तालुक्यांमधून एकूण वाळू, जांभा दगड आदी गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीवरील कारवाईपोटी गेल्या तीन महिन्यात ३४ लाख ७ हजार १६८ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. चिपळूण उपविभागाने यापैकी २ लाख ७८ हजाराच्या महसुलाची भर जिल्ह्याच्या तिजोरीत टाकली आहे. त्याखालोखाल खेडने २ लाख ३० हजार आणि रत्नागिरीने २ लाख २४ हजार रूपयांच्या दंडाची वसुली केली आहे.मंडणगड तहसील कार्यालयानेही दंडाच्या वसुलीत अव्वल स्थान राखले असून, या तीन महिन्याच्या कालावधीत ९ लाख ३३ हजार ९८५ रूपयांचा दंड वसूल केला आहे. त्याखालोखाल चिपळूण तहसील कार्यालयाने ७ लाख ३८ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतर कार्यालयांकडून दोन लाखांपर्यंत दंड वसुली झाली आहे. गौण खनिज बंदी उठविण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसुलातही वाढ झाली आहे. गतवर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननाच्या वसुलीपोटी २२ कोटी ७७ लाख २७ हजार ३३ इतका महसूल मिळवत इष्टांकापेक्षा अधिक वसुली केली होती. सर्वाधिक वसुली रत्नागिरी उपविभागाने २,६५,९८,८७८ (१७७ टक्के) केली होती, तर तहसीलस्तरावर खेडने १,५०,४३,५५८ (१५० टक्के) वसुली केली होती. जिल्ह्यात एप्रिल ते जून महिन्यात गौण खनिज अवैध उत्खननप्रकरणी जिल्ह्यात करण्यात आलेली कारवाई महत्वपूर्ण मानली जात आहे. वाळऊ, चिरा, दगड, माती आजी गौण खनिजांच्या उत्खननावर गेले दीड वर्षे बंदी होती. शासकीय बांधकामेही मोठ्या प्रमाणावर रखडली होती. त्यामुळे बंदी उठविण्याची मागणी करण्यात येत होती. उपविभागात करण्यात आलेल्या कारवाई बाबत मंडणगड तालुका अव्वल असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात १३१ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)तीन महिन्यात उपविभागीय कार्यालयानी केलेली वसुलीउपविभागप्रकरणेवसुली खेड०९२३०४५३रत्नागिरी०२२४०००चिपळूण०५२७८०००दापोली००राजापूर०४१५४१००एकूण१८८८६५५३