शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कल्याणकारी मंडळाच्या योजनांपासून ३२०० लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:39 IST

Labour, sindhudurg, Government घरेलु कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसाठी २०१५ पासून शासनाने निधीची तरतूद केली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२०० लाभार्थी कल्याणकारी मंडळाच्या योजनांपासून गेली ५ वर्षे वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देगेली पाच वर्षे कामगारांना बसतोय फटका२०१५ पासून निधीची तरतूदच नाही

सिंधुदुर्ग: घरेलु कामगारांना संघटित करण्यासाठी राज्य शासनाने २०११ मध्ये घरेलु कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ हजार २०० घरेलु कामगारांची नोंदणी झाली आहे. या मंडळामार्फत महिला घरेलु कामगारांना सन्मान धन आणि त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती आदी योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत २०१४ पर्यंत या कामगारांना शासनाकडून लाभ मिळाला होता. मात्र, या योजनेसाठी २०१५ पासून शासनाने निधीची तरतूद केली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२०० लाभार्थी कल्याणकारी मंडळाच्या योजनांपासून गेली ५ वर्षे वंचित राहिले आहेत.घरेलु कामगारांची शासन दरबारी नोंद नसल्याने त्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे या कामगारांना संघटित करण्यासाठी ६ नोव्हेंबर २०११ रोजी राज्य शासनाने घरेलु कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. संपूर्ण राज्यात मंडळ कार्यरत करण्यात आले. तसेच १४ नोव्हेंबर २०११ पासून घरेलु कामगारांच्या नोंदणीला प्रारंभ झाला.त्यानुसार देशात घरेलु कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले होते. १८ ते ६० वयोगटातील या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ते ज्या ठिकाणी घरकाम करीत आहेत त्या घर मालकाचा सलग नव्वद दिवस काम करीत असल्याबाबतचा दाखला आवश्यक आहे.

नोंदीत घरेलु कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ५५ ते ६० वर्षे या वयोगटातील घरेलु कामगारांना सन्मान धन योजना, त्यांच्या नववी ते बारावीपर्यंतच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना आणि मृताच्या वारसांना आर्थिक मदत योजना लागू केली होती.या कल्याणकारी मंडळामार्फत घरेलु कामगारांना सन्मान धन म्हणून १० हजार रुपये, शिष्यवृत्तीसाठी १२०० रुपये तर नोंदीत कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ३० हजार रुपये मदत केली जाते. मंडळाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२०० घरेलु कामगारांची नोंदणी झाली आहे.

३१ ऑक्टोबर २०१४ पर्यंत यातील ३८३ घरेलु कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपयेप्रमाणे मदत करण्यात आली आहे. मात्र, २०१५ पासून आतापर्यंत या मंडळासाठी शासनाने निधीची तरतूदच केली नाही. त्यामुळे या मंडळाकडे नोंदीत असलेले ३२०० घरेलु कामगार विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

घरेलु कामगारांसाठी शासनाने निधीची तरतूद केली नसली तरी हे मंडळ कार्यरत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही नवीन घरेलु कामगार नोंदणी सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांनी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा. तसेच शासनाने घरेलु कामगारांसाठी योजनांचा लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास त्यांना लाभ मिळू शकेल. त्यामुळे शासनाने या कामगारांचा विचार करून निधीची तरतूद करणे आवश्यक आहे.- किरण कुबल, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग

टॅग्स :Labourकामगारsindhudurgसिंधुदुर्गGovernmentसरकार