शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

उन्हाळी सुट्टीसाठी सिंधुदुर्ग विभागाकडून एसटीच्या ३१ जादा गाड्या सोडणार; अभिजित पाटील यांची माहिती

By सुधीर राणे | Updated: April 11, 2023 13:20 IST

आतापर्यंत ९० गाड्या फुल्ल!

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात उन्हाळी सुट्टीत अनेक नागरिक मुंबई तसेच अन्य भागातून दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत जादा ३१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून या जादा गाड्यांमुळे  एसटीच्या जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली. कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात प्रसिद्धिमाध्यमांशी मंगळवारी त्यांनी संवाद साधला. यावेळी गौतमी कुबडे, सुवर्णा दळवी, अक्षय केंकरे आदी अधिकारी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग विभागाकडून मालवण मुंबई, विजयदुर्ग मुंबई, देवगड नालासोपारा, देवगड बोरिवली या चार नियमित गाड्या सुरू आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार आणखीन ३१ गाड्या नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये बोरिवली, आंबेजोगाई, तुळजापूर, पुणे, रत्नागिरी आदी भागात जाणाऱ्या गाड्यांचा समावेश असेल.  त्यामुळे जादा व नियमित ३५ गाड्यांमधून प्रवाशांना वाहतुकीची सुविधा पुरविण्यात येणार आहे. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या गाड्याना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. एसटीकडून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला व समाजातील अन्य घटकांना प्रवासी भाड्यामध्ये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद एसटीच्या सेवेला चांगला मिळत आहे. कोविड काळात बंद झालेल्या ग्रामीण भागातील गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. रेल्वेस्टेशनवरून प्रवाशांना बसस्थानकात येण्यासाठी गाड्यांची सोय करण्यात येत आहे.त्याचबरोबर सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून प्रवाशांच्या मागणीनुसार पर्यटन पॅकेज टूर सुरू करण्यात येणार आहेत. पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना सांगण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिक पर्यटक गाईडची मदत घेण्यात येईल. मिडी बस दाखल होईपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून ही सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न राहील.  त्याचप्रमाणे पणजी -पुणे,पणजी-निगडी अशा थेट गाड्याही सुरू करण्यात येणार आहेत.त्याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा.असे आवाहनही अभिजित पाटील यांनी यावेळी केले.आतापर्यंत ९० गाड्या फुल्ल!२२ एप्रिल ते ९ मे या कालावधीत मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या नियमित व जादा ९० गाड्यांचे आरक्षण आतापर्यंत फुल्ल झाले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. तसेच मुंबई वरून येणाऱ्या या गाड्यांपैकी काही गाड्या परतीचा प्रवास करताना कोल्हापूर,पुणे मार्गे मुंबईला जातील. असेही अभिजित पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग