शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

सहा वर्षात २६ पर्यटक बुडाले

By admin | Updated: November 7, 2014 23:30 IST

अतिउत्साहामुळे खोल पाण्यात गेल्याने आनंदावर पडते विरजण

दापोली : तालुक्यात विविध समुद्र किनाऱ्यावर सहा वर्षात २६ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने या भागातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दापोली तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मुरुड, केळशी, हर्णै, आंजर्ले, लाडघर, कोळथर, बुरोंडी, उटंबर, आडे येथील समुद्रकिनाऱ्यावर स्नानाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक दापोलीला भेट देत असतात. पर्यटकांच्या दापोली भेटीत एकीकडे वाढ होत असतानाच अतिउत्साहामुळे आनंदावर विरजण पडण्याचे प्रकार गेल्या सहा वर्षात प्रकर्षाने घडले आहेत. मात्र, तरीही पर्यटकांच्या जलसमाधीचे अनेक प्रकार होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना अथांग समुद्र किनारा पाहून मनमुराद पोहण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, त्यांना या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव नसल्याने पर्यटनासाठी आलेले पर्यटक सागरीकिनाऱ्याची भुरळ पडून स्नानासाठी समुद्रात उतरतात व कोणतीही कल्पना येण्याआधीच बुडतात. असे प्रकार वारंवार घडत असल्याने या किनाऱ्यावर धोकादायक ठिकाणांचा फलक लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लाईफ जॅकेट, समुद्ररक्षक व अन्य सुविधा या ठिकाणी द्याव्यात, अशी मागणी पर्यटक करीत आहेत. ओहोटीमुळे काही अपघात झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी याठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले किनारे अधिक सुरक्षित करावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)