शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षात २६ पर्यटक बुडाले

By admin | Updated: November 7, 2014 23:30 IST

अतिउत्साहामुळे खोल पाण्यात गेल्याने आनंदावर पडते विरजण

दापोली : तालुक्यात विविध समुद्र किनाऱ्यावर सहा वर्षात २६ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने या भागातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दापोली तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मुरुड, केळशी, हर्णै, आंजर्ले, लाडघर, कोळथर, बुरोंडी, उटंबर, आडे येथील समुद्रकिनाऱ्यावर स्नानाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक दापोलीला भेट देत असतात. पर्यटकांच्या दापोली भेटीत एकीकडे वाढ होत असतानाच अतिउत्साहामुळे आनंदावर विरजण पडण्याचे प्रकार गेल्या सहा वर्षात प्रकर्षाने घडले आहेत. मात्र, तरीही पर्यटकांच्या जलसमाधीचे अनेक प्रकार होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना अथांग समुद्र किनारा पाहून मनमुराद पोहण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, त्यांना या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव नसल्याने पर्यटनासाठी आलेले पर्यटक सागरीकिनाऱ्याची भुरळ पडून स्नानासाठी समुद्रात उतरतात व कोणतीही कल्पना येण्याआधीच बुडतात. असे प्रकार वारंवार घडत असल्याने या किनाऱ्यावर धोकादायक ठिकाणांचा फलक लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लाईफ जॅकेट, समुद्ररक्षक व अन्य सुविधा या ठिकाणी द्याव्यात, अशी मागणी पर्यटक करीत आहेत. ओहोटीमुळे काही अपघात झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी याठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले किनारे अधिक सुरक्षित करावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)