शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उशिरा आलेल्या मोहोरामुळे २५ टक्के आंबा झाडांवरच!

By admin | Updated: May 19, 2017 00:39 IST

उशिरा आलेल्या मोहोरामुळे२५ टक्के आंबा झाडांवरच!

मेहरून नाकाडे। लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शेवटच्या मोहोराचा आंबा वाढत्या उष्म्यामुळे तयार झाला असून, झाडावरच पिकू लागला आहे. अवकाळी पावसाचा फटका या आंब्याला बसला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात येथून आंबापेट्या विक्रीला येत आहेत. महाराष्ट्रातून दररोज एक लाख, तर कर्नाटकमधून २५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. यावर्षी वाशी मार्केटमध्ये सहा राज्यातून हापूस विक्रीला येत आहे. आवक वाढल्यामुळे दर कोसळले असून, शेतकऱ्यांना दहा वर्षांपूर्वीचा दर आता मिळत आहे.कोकणातून आलेल्या हापूसची विक्री १०० ते २०० रूपये डझन दराने वाशी मार्केटमध्ये सुरू आहे. कर्नाटक हापूस ३० ते ३५ रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. विक्रेते किलोवर मिळणारा कर्नाटक, गुजरातसह अन्य राज्यातील आंबा रत्नागिरी, देवगड हापूस सांगून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. यावर्षी सरासरीपेक्षा अधिकतम पाऊस होऊनही आॅक्टोबरपासून थंडी सुरू झाली. जमिनीत ओलावा असताना मोहोर आला. परंतु पुनर्मोहोरामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणातून हापूस बाजारात जाऊ लागला. सुरूवातीला पेटीला २००० ते १०,००० रूपयांपर्यंत दर देण्यात आला. मात्र, नंतर तो हळूहळू खाली आला. कोकणातील हापूसबरोबरच कर्नाटकचा हापूस सुरू झाला. महाराष्ट्राबरोबर केरळ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात आदी सहा राज्यातून हापूस मुंबईत आला. रत्नागिरी हापूसला त्याचा चांगलाच फटका बसला. दिसायला बऱ्यापैकी सारखा असलेला परराज्यातील आंबा रत्नागिरी, देवगड हापूस म्हणून विकण्यास सुरूवात झाली. त्याचा मोठा फटका कोकणातील शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.एका बाजूला बाजारपेठेत हापूसला अनेक समस्या असताना दुसऱ्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणात आंबा झाडावरच आहे. थंडी उशिरापर्यंत पडली असल्यामुळे झाडांना पालवी येत राहिली. त्यामुळे उशिरापर्यंत मोहोर येत राहिला. उशिरा आलेला हा मोहोर अजूनही झाडावर आहे. जवळजवळ २५ टक्के पीक अजूनही झाडावर आहे. आता पाऊस पडत असल्यामुळे यातील कितीसे पीक हातात येईल याबाबत बागायतदारही साशंक आहेत. यातील बहुतांश आंबा कॅनिंगलाच टाकला जाण्याची शक्यता आहे.