शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

२३२ ग्रामपंचायतींना ‘थेट सरपंच’चा मान

By admin | Updated: July 5, 2017 00:19 IST

२३२ ग्रामपंचायतींना ‘थेट सरपंच’चा मान

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयावर पावसाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच थेट जनतेतून निवडले जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतींची मुदत आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतींची प्रभाग रचनाही तयार झाली आहे. ३१ जुलै रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची अंतिम मान्यता मिळणार आहे, तर ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली जाणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट लोकांमधून होण्याची शक्यता आहे. नव्या कायद्यानुसार सरपंच पदाच्या अधिकारांमध्येही वाढ होणार असून, गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरंपचाकडे राहणार आहे. जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुकांचे पडघम सध्या वाजू लागले असून याठिकाणी थेट सरपंच निवड घेतली जाणार आहे.जिल्हा : थेट सरपंच निवड होणाऱ्या ग्रामपंचायतीमंडणगड (१७) अडखळ, पिंपळोली, दहागाव, तिडे - तळघर, मुरादपूर, कुंबळे, दुधेरे, बामणघर, वेसवी, लोकरवण, देव्हाळे, शिगवण, बाणकोट, विन्हे, सडे, तोंडली, उन्हवरे, वाल्मिकीनगर.दापोली (३३) बोंडिवली, देहेणे, उंबरशेत, कडावळे, सातेरेतर्फ नातू, टाळसुरे, आगरवायंगणी, मुर्डी, जालगाव, वेळवी, दमामे, करंजाणी, विरसई, शिर्दे, सारंग, पाचवली, वांझकोळी, हातीप, शिरसाडी, सोवेली, देगाव, उंबर्ले, कादिवली, कोळबांद्रे, आपटी, कळंबट, करंजगाव, सडवे, भडवळे, उसगाव, डौली, मांदिवली, कवडोली.खेड (१०) कळंबणी बुद्रुक, चिंचवली, संगलट, भोस्ते, अलसुरे, निळीक,तिसंगी, कोंडवली, घाणेखुंट, भेलसई. गुहागर (२१) आरे, अवारे असोरे, आबलोली, कोतळूक, कौंढरकाळसुरे, खोडदे, चिखली, जानवळे, जांभारी, झोंबडी, धोपावे, पाली, पाटपन्हाळे, पालकोट त्रिशूळ, पांगारीतर्फे हवेली, पोमेंडी, मढाळ, वरवेली, वडद, साखरीत्रिशूळ, हेदवी.चिपळूण (३४) मालदोली, नादरखेरकी, ओमळी, परशुराम, पेढे, शिरगाव, शिरवली, उमरोली, वहाळ, आंबतखोल, आंबिटगाव, असुर्डे, बामणोली, भिले, बिवली, ढाकमोळी, देवखेरकी, डुगवे, धामेलीकोंड, गुढे, गुळवणे, गाने, गोंधळे, कळकवणे, खांदाटपाली, कामथे, कामथे खुर्द, कापरे, करंबवणे, केतकी, खांडोत्री, नवीन कोळकेवाडी, कालुस्ते बुद्रुक, कालुस्ते खुर्द.संगमेश्वर (३७) तांबेडी, शेंबवणे, तुरळ, फणसवणे, गुरववाडी, शृंगारपूर, निवळी, माभळे, ओझरखोल, वांद्री, फुणगूस, पोचरी, कोंडगाव, साखरपा, मेघी, माखजन, मावळंगे, आंबव, सरंद, कासे, पेढांबे, कळंबुशी, शिरंबे, कुंडी, पाटगाव, आंबवली, सांगवे, फणसट, किरडुवे, वाशीतर्फ संगमेश्वर, कुळे, बोरसूत, मुचरी, शिवणे, राजिवली, तुळसणी, ओझरे बुद्रुक.रत्नागिरी (२९) वेळवंड, मावळंगे, टिके, वेतोशी, वळके, तरवळ, बोंड्ये, टेंभ्ये, निवळी, सत्कोंडी, भगवतीनगर, गावडेआंबेरे, साठरे, मालगुंड, जांभारी, करबुडे, चाफेरी, गणेशगुळे, धामणसे, पूर्णगड, कासारवेली, केळ्ये, चांदोर, निवेंडी, निरूळ, फणसवळे, सड्ये पिरंदवणे, विल्ये, तोणदे.लांजा (१९) बेनी बुद्रुक सालपे, रूण, कुर्णे, भडे, खानवली, खावडी, तळवडे, कोंडगे, कोट, आरगाव, वाकेड, वाघ्रट, आगवे, करचुंब, वेरळ, वेरवली खुर्द, निवसर, पूनस. राजापूर (३२) तळवडे, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातीवले, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, खरवते, मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, नाटे, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली, साखर, वडवली, वाटूळ, प्रिंदावण, पाचल, माडबन, विल्ये, जुवे जैतापूर.