शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२३२ ग्रामपंचायतींना ‘थेट सरपंच’चा मान

By admin | Updated: July 5, 2017 00:19 IST

२३२ ग्रामपंचायतींना ‘थेट सरपंच’चा मान

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयावर पावसाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच थेट जनतेतून निवडले जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतींची मुदत आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतींची प्रभाग रचनाही तयार झाली आहे. ३१ जुलै रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची अंतिम मान्यता मिळणार आहे, तर ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली जाणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट लोकांमधून होण्याची शक्यता आहे. नव्या कायद्यानुसार सरपंच पदाच्या अधिकारांमध्येही वाढ होणार असून, गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरंपचाकडे राहणार आहे. जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुकांचे पडघम सध्या वाजू लागले असून याठिकाणी थेट सरपंच निवड घेतली जाणार आहे.जिल्हा : थेट सरपंच निवड होणाऱ्या ग्रामपंचायतीमंडणगड (१७) अडखळ, पिंपळोली, दहागाव, तिडे - तळघर, मुरादपूर, कुंबळे, दुधेरे, बामणघर, वेसवी, लोकरवण, देव्हाळे, शिगवण, बाणकोट, विन्हे, सडे, तोंडली, उन्हवरे, वाल्मिकीनगर.दापोली (३३) बोंडिवली, देहेणे, उंबरशेत, कडावळे, सातेरेतर्फ नातू, टाळसुरे, आगरवायंगणी, मुर्डी, जालगाव, वेळवी, दमामे, करंजाणी, विरसई, शिर्दे, सारंग, पाचवली, वांझकोळी, हातीप, शिरसाडी, सोवेली, देगाव, उंबर्ले, कादिवली, कोळबांद्रे, आपटी, कळंबट, करंजगाव, सडवे, भडवळे, उसगाव, डौली, मांदिवली, कवडोली.खेड (१०) कळंबणी बुद्रुक, चिंचवली, संगलट, भोस्ते, अलसुरे, निळीक,तिसंगी, कोंडवली, घाणेखुंट, भेलसई. गुहागर (२१) आरे, अवारे असोरे, आबलोली, कोतळूक, कौंढरकाळसुरे, खोडदे, चिखली, जानवळे, जांभारी, झोंबडी, धोपावे, पाली, पाटपन्हाळे, पालकोट त्रिशूळ, पांगारीतर्फे हवेली, पोमेंडी, मढाळ, वरवेली, वडद, साखरीत्रिशूळ, हेदवी.चिपळूण (३४) मालदोली, नादरखेरकी, ओमळी, परशुराम, पेढे, शिरगाव, शिरवली, उमरोली, वहाळ, आंबतखोल, आंबिटगाव, असुर्डे, बामणोली, भिले, बिवली, ढाकमोळी, देवखेरकी, डुगवे, धामेलीकोंड, गुढे, गुळवणे, गाने, गोंधळे, कळकवणे, खांदाटपाली, कामथे, कामथे खुर्द, कापरे, करंबवणे, केतकी, खांडोत्री, नवीन कोळकेवाडी, कालुस्ते बुद्रुक, कालुस्ते खुर्द.संगमेश्वर (३७) तांबेडी, शेंबवणे, तुरळ, फणसवणे, गुरववाडी, शृंगारपूर, निवळी, माभळे, ओझरखोल, वांद्री, फुणगूस, पोचरी, कोंडगाव, साखरपा, मेघी, माखजन, मावळंगे, आंबव, सरंद, कासे, पेढांबे, कळंबुशी, शिरंबे, कुंडी, पाटगाव, आंबवली, सांगवे, फणसट, किरडुवे, वाशीतर्फ संगमेश्वर, कुळे, बोरसूत, मुचरी, शिवणे, राजिवली, तुळसणी, ओझरे बुद्रुक.रत्नागिरी (२९) वेळवंड, मावळंगे, टिके, वेतोशी, वळके, तरवळ, बोंड्ये, टेंभ्ये, निवळी, सत्कोंडी, भगवतीनगर, गावडेआंबेरे, साठरे, मालगुंड, जांभारी, करबुडे, चाफेरी, गणेशगुळे, धामणसे, पूर्णगड, कासारवेली, केळ्ये, चांदोर, निवेंडी, निरूळ, फणसवळे, सड्ये पिरंदवणे, विल्ये, तोणदे.लांजा (१९) बेनी बुद्रुक सालपे, रूण, कुर्णे, भडे, खानवली, खावडी, तळवडे, कोंडगे, कोट, आरगाव, वाकेड, वाघ्रट, आगवे, करचुंब, वेरळ, वेरवली खुर्द, निवसर, पूनस. राजापूर (३२) तळवडे, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातीवले, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, खरवते, मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, नाटे, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली, साखर, वडवली, वाटूळ, प्रिंदावण, पाचल, माडबन, विल्ये, जुवे जैतापूर.