शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

दंडामुळे २२ कोटींची वसुली

By admin | Updated: April 17, 2015 00:04 IST

खनिकर्मची कामगिरी : सर्वांत अधिक वसुली रत्नागिरी विभागाची

रत्नागिरी : गौण खनिज बंदी उठविण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसुलातही वाढ झाली आहे. खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज वसुलीपोटी २२ कोटी ७७ लाख २७ हजार ३३ इतका महसूल मिळवत इष्टांकापेक्षा अधिक वसुली केली आहे. सर्वाधिक वसुली रत्नागिरी उपविभागाने (१७७ टक्के) केली आहे, तर तहसील स्तरावर खेड (१५० टक्के) अव्वल आहे. येथील जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननातून गतवर्षी ९ कोटी ७३ लाख २२ हजार ८२५ इतका महसूल मिळवला आहे. यावर्षी या विभागाचे ७४.८६ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण झाले. यात खेड तालुका आघाडीवर आहे.पर्यावरण मंत्रालयाने २०११ सालापासून गौण खनिजावर बंदी घातली होती. त्यामुळे सर्वत्र गौण खनिजांचे उत्खनन बंद होते. याचा परिणाम प्रशासनाच्या महसुलावरही झाला. लिलावच न झाल्याने त्यापोटी मिळणारे उत्पन्न ठप्प झाले होते. गतवर्षी केवळ ९ कोटी ७३ लाख २२ हजार ८२५ (७४ टक्के) इतकाच महसूल मिळाला होता. खनिकर्म विभागाला २० कोटींचे उद्दिष्ट कमी करून १३ कोटी इतके देण्यात आले होते. मात्र, तेही केवळ ७५ टक्केच झाले होते. या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी कार्यालयासह, पाच उपविभाग तसेच तहसील स्तरावरही उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाला सहा कोटींचे, उपविभागीय कार्यालयांना प्रत्येकी दीड कोटींचे, तर तहसील कार्यालयांना प्रत्येकी एक कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गौण खनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च २०१५ पर्यंत केलेल्या या वसुलीत खेड तालुक्याने अव्वल स्थान राखले आहे, तर सर्वांत कमी वसुली गुहागर तालुक्यातून (४७ टक्के) झाली आहे. तसेच खेडवगळता सर्वच उपविभागानी इष्टांकापेक्षाही अधिक उद्दिष्टपूर्ती केली आहे. यात रत्नागिरी उपविभाग अव्वल असून, १७७ टक्के वसुली झाली आहे. राजापूर उपविभागाची १७५ टक्के वसुली झाली आहे. गौण खनिजावरील बंदी उठल्यानंतर मात्र, सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येत आहे. मार्च महिन्यात मोहीम राबवल्याने या एकाच महिन्यात जिल्ह्यात ३ कोटी ३१ लाख ११ हजार ३३२ रुपये इतकी वसुली झाली आहे. वाळूवरील बंदी २०११ सालापासून कायम आहे. लिलावही थांबले आहेत. या साऱ्यात खनिकर्मची कामगिरी महत्वाची आहे. (प्रतिनिधी)मार्च २०१५ अखेर केलेली वसुलीउपविभागउद्दिष्टवसुली खेडएक कोटी८६,०७,३७५रत्नागिरीदीड कोटी२,६५,९८,८७८चिपळूणदीड कोटी१,७०,३३,२०७दापोलीदीड कोटी१,६१,९०,१४८राजापूरदीड कोटी२,६३,१४,५५६तहसील स्तरमंडणगड१ कोटी७६,६९,८२७ दापोली१ कोटी६५,०९,८४३ खेड१ कोटी१,५०,४३,५५८ चिपळूण१ कोटी८९,६०,९२६ संगमेश्वर१ कोटी१,०६,२३,५९२गुहागर१ कोटी४६,८०,७०७ रत्नागिरी१ कोटी७७,६२,७२३राजापूर१ कोटी१,०८,०३,१९९ लांजा१ कोटी१,०८,२८,१२९जिल्हाधिकारी कार्यालय६ कोटी५,०१,००,५६५ एकूण२२ कोटी २,७७,२७,०३३ गौणखनिजावरील बंदी उठवण्यात आल्याने जिल्ह्यातील महसुलात वाढ झाल्याचे स्पष्ट होत असताना महसूलकडे तालुकास्तरावर खेडमध्ये १५० टक्के वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे. मार्च २०१५पर्यंत झालेल्या उद्दिष्टपूर्तीत खनिकर्म विभागाने चांगली कामगिरी केली आहे. या वसुलीपोटी मोठा महसूल उपलब्ध झाला आहे.