शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यात १८ जणांची माघार

By admin | Updated: February 13, 2017 23:01 IST

फोंडाघाट मतदारसंघात पंचरंगी लढत : सहा ठिकाणी बंडखोरी, १८ मतदार संघात सेना-भाजपची छुपी युती

कणकवली : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी दाखल केलेल्या २९ उमेदवारी अर्जापैकी ८ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ४७ अर्जांपैकी १० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. सोमवारी तालुक्यात १८ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ६४ उमेदवार उरले आहेत. तर जानवली व बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांनी छाननी अर्जाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील केल्याने तेथील उमेदवाराना १५ फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर या दोन मतदार संघातील निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी २९ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ५३ असे एकूण ८२ अर्ज उमेदवारांनी दाखल केले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. या दिवशी १८ अर्ज मागे घेण्यात आले. येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत- शिंदे, तहसीलदार गणेश महाडिक, शिरस्तेदार पी.बी. पळसुले, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत आदी अधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज माघारी नंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये जिल्हा परिषद मतदार संघ फोंडामधून - राजेंद्र राधाकृष्ण पावसकर (राष्ट्रवादी), सुभाष मारुती सावंत (भाजप पर्यायी उमेदवार ).कळसुली - श्रध्दा विलास गावकर (राष्ट्रवादी). चंदना चंद्रहास राणे (अपक्ष). नाटळ - ज्योती किरण गावकर (भाजप), स्नेहल सतीश पाताडे (राष्ट्रवादी), श्रद्धा सुभाष सावंत (अपक्ष), रंजीता राजेश पाताडे (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. तर पंचायत समिती मतदार संघ तळेरे मधून सुनील कुलकर्णी (अपक्ष), प्रकाश बापू पाटणकर (अपक्ष). नांदगाव - वृषाली ऋषिकेश मोरजकर (अपक्ष). फोंडा-हर्षदा हेमंत रावराणे (भाजप पर्यायी उमेदवार). लोरे- कृष्णा महादेव एकावडे (अपक्ष ), प्रदीप बळीराम गुरव (अपक्ष). हरकुळ खुर्द - राकेश रविकांत रासम (अपक्ष). कळसुली - प्रिया मनोहर मालंडकर (राष्ट्रवादी). नरडवे - सुरेश शांताराम ढवळ (अपक्ष), गणेश सहदेव ढवळ (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.तालुक्यात पंचायत समितीच्या १ जागेवर मनसे, १० जागांवर शिवसेना, ६ जागांवर भाजप, १४ जागांवर काँग्रेस, १ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस तर ५ जागांवर अपक्ष निवडणूक लढवत आहेत. जानवली व बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील चित्र १५ फेब्रुवारीला स्पष्ट होईल. जिल्हा परिषदेच्या २ जागांवर मनसे, ५ जागांवर शिवसेना, ५ जागांवर भाजप, ८ जागांवर काँग्रेस तर १ जागेवर अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत. (प्रतिनिधी)