शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

विद्यार्थ्यांकडून १३० किलोमीटरचा सायकल प्रवास

By admin | Updated: January 11, 2016 00:35 IST

विद्यार्थ्यांचे कौतुक : अ‍ॅड़ बाबासाहेब नानल गुरुकुलची रत्नागिरी - आंबोळगड यशस्वी सायकल सफर

रत्नागिरी : अ‍ॅड. बाबासाहेब नानल गुरुकुल म्हणजे उपक्रमातून शिक्षण देणारा रा. भा. शिर्के प्रशालेचा गुरुकुल प्रकल्प! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते. त्यापैकीच एक म्हणजे सायकल सहल होय. गुरुकुलमधील इयत्ता पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची रत्नागिरी ते पावस अशी सायकल सहल आयोजित करण्यात आली होती, तर सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची सायकल सहल रत्नागिरी ते आंबोळगड अशी आयोजित करण्यात आली होती.गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुवीर भिडे व गुरुकुलचे पालक यांच्या उपस्थितीत या सायकल सहलीचे उद्घाटन झाले. त्यानंतर रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलमधून सायकल सहलीला सुरुवात झाली. सायकल चालविण्यास मुले फारच उत्सुक होती. सकाळी ११ वाजता सर्व मुले पावस येथे पोहोचली. त्यातील इयत्ता पाचवी ते सहावीच्या मुलांनी स्वामी स्वरुपानंदांचे दर्शन घेऊन दुपारी २ वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. उर्वरित मुले आंबोळगडाच्या दिशेने रवाना झाली. सायंकाळी ६.३० वाजता ही सर्व मुले आंबोळगडावर पोहोचली. तेथे रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळी ९ वाजता परतीच्या प्रवासाला निघाली व रत्नागिरीत ५.३० वाजता या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आगमन झाले.ही महत्त्वाकांक्षी सायकल सहल यशस्वी करण्यासाठी गुरुकुल प्रमुख राजेश आयरे, शिक्षक किरण सनगरे, स्वप्नील कर्लेकर, पल्लवी घोसाळे, देवराम दळवी, सुशांत पवार व गुरुकुलचे पालक शिवाजी सरगर, संदीप पाटील यांची मदत झाली. या सायकल उपक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन गुरुकुलचे शिक्षक गौरव प्रकाश पिळणकर यांनी केले. (प्रतिनिधी)