शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मालवणातील १२ किनाऱ्यांची स्वच्छता

By admin | Updated: May 27, 2016 22:19 IST

जिल्हा प्रशासनाची स्वच्छता मोहीम : चार भागांत कचऱ्याचे वर्गीकरण

मालवण : किनारा स्वच्छता अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मालवण तालुक्यातील बारा किनाऱ्यांवर ही मोहीम राबविण्यात आली. यात आचरा, पारवाडी, हिर्लेवाडी, तोंडवळी, सर्जेकोट, देवबाग, तारकर्ली, मालवण चिवला बीच, मालवण बंदर जेटी, वायंगणी, कोळंब, रेवंडी, वायरी भूतनाथ येथील १२ बीच कचरामुक्त करण्यात आले. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसहभागाच्या सहकार्याने गुरुवारी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ वाजता या किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ मालवण चिवला बीच येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मुख्याधिकारी शेखर सिंह, तहसीलदार वनिता पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ, मुख्याधिकारी अरविंद माळी, सहायक गटविकास अधिकारी विजय परीट, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, महेश जावकर, मोहन वराडकर, विजय परीट, यासह अन्य उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल्स, तुटलेली जाळी, मासेमारीतील निकामी साहित्य, अशा विविध प्रकारचा कचरा विविध रंगांच्या पिशव्यांमध्ये एकत्र करत ओला कचरा, प्लास्टिक कचरा, सुका कचरा काचेच्या वस्तू अशा चार भागात गोळा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.नगरपालिका, ग्रामपंचायतींचाही सहभागयात शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, जिल्हा परिषद महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, आदी शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. तर या मोहिमेत लोकप्रतिनिधी, नागरिकांसह मालवण पत्रकार समिती, तालुका फोटोग्राफर असोसिएशन स्वयंसेवी संघटना व अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. समुद्र किनाऱ्यावरील मोठ्या प्रमाणात कचरा स्वच्छ केल्याने समुद्र किनारे लखलखीत बनले आहेत. आचरा आचरा किनारी स्वच्छता मोहीम: आचरा किनारऱ्यावर गुरूवारी सकाळी ७ वाजता आचरा किनारा साफ करण्याची मोहीम राबवली. यामध्ये १४0 जणांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विभागाच्या पद्मजा चव्हाण, मालवणचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, आचरा पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे, उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, सरपंच साक्षी ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, पोलिसपाटील, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका, आचरा ग्रामस्थ, आचरा यशराज संघटना ग्रुप व मान्यवर सामिल झाले होते.