शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

मालवणातील १२ किनाऱ्यांची स्वच्छता

By admin | Updated: May 27, 2016 22:19 IST

जिल्हा प्रशासनाची स्वच्छता मोहीम : चार भागांत कचऱ्याचे वर्गीकरण

मालवण : किनारा स्वच्छता अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मालवण तालुक्यातील बारा किनाऱ्यांवर ही मोहीम राबविण्यात आली. यात आचरा, पारवाडी, हिर्लेवाडी, तोंडवळी, सर्जेकोट, देवबाग, तारकर्ली, मालवण चिवला बीच, मालवण बंदर जेटी, वायंगणी, कोळंब, रेवंडी, वायरी भूतनाथ येथील १२ बीच कचरामुक्त करण्यात आले. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसहभागाच्या सहकार्याने गुरुवारी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ वाजता या किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ मालवण चिवला बीच येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मुख्याधिकारी शेखर सिंह, तहसीलदार वनिता पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ, मुख्याधिकारी अरविंद माळी, सहायक गटविकास अधिकारी विजय परीट, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, महेश जावकर, मोहन वराडकर, विजय परीट, यासह अन्य उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल्स, तुटलेली जाळी, मासेमारीतील निकामी साहित्य, अशा विविध प्रकारचा कचरा विविध रंगांच्या पिशव्यांमध्ये एकत्र करत ओला कचरा, प्लास्टिक कचरा, सुका कचरा काचेच्या वस्तू अशा चार भागात गोळा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.नगरपालिका, ग्रामपंचायतींचाही सहभागयात शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, जिल्हा परिषद महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, आदी शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. तर या मोहिमेत लोकप्रतिनिधी, नागरिकांसह मालवण पत्रकार समिती, तालुका फोटोग्राफर असोसिएशन स्वयंसेवी संघटना व अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. समुद्र किनाऱ्यावरील मोठ्या प्रमाणात कचरा स्वच्छ केल्याने समुद्र किनारे लखलखीत बनले आहेत. आचरा आचरा किनारी स्वच्छता मोहीम: आचरा किनारऱ्यावर गुरूवारी सकाळी ७ वाजता आचरा किनारा साफ करण्याची मोहीम राबवली. यामध्ये १४0 जणांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विभागाच्या पद्मजा चव्हाण, मालवणचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, आचरा पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे, उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, सरपंच साक्षी ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, पोलिसपाटील, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका, आचरा ग्रामस्थ, आचरा यशराज संघटना ग्रुप व मान्यवर सामिल झाले होते.