शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

मालवणातील १२ किनाऱ्यांची स्वच्छता

By admin | Updated: May 27, 2016 22:19 IST

जिल्हा प्रशासनाची स्वच्छता मोहीम : चार भागांत कचऱ्याचे वर्गीकरण

मालवण : किनारा स्वच्छता अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मालवण तालुक्यातील बारा किनाऱ्यांवर ही मोहीम राबविण्यात आली. यात आचरा, पारवाडी, हिर्लेवाडी, तोंडवळी, सर्जेकोट, देवबाग, तारकर्ली, मालवण चिवला बीच, मालवण बंदर जेटी, वायंगणी, कोळंब, रेवंडी, वायरी भूतनाथ येथील १२ बीच कचरामुक्त करण्यात आले. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसहभागाच्या सहकार्याने गुरुवारी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ वाजता या किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ मालवण चिवला बीच येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मुख्याधिकारी शेखर सिंह, तहसीलदार वनिता पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ, मुख्याधिकारी अरविंद माळी, सहायक गटविकास अधिकारी विजय परीट, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, महेश जावकर, मोहन वराडकर, विजय परीट, यासह अन्य उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल्स, तुटलेली जाळी, मासेमारीतील निकामी साहित्य, अशा विविध प्रकारचा कचरा विविध रंगांच्या पिशव्यांमध्ये एकत्र करत ओला कचरा, प्लास्टिक कचरा, सुका कचरा काचेच्या वस्तू अशा चार भागात गोळा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.नगरपालिका, ग्रामपंचायतींचाही सहभागयात शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, जिल्हा परिषद महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, आदी शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. तर या मोहिमेत लोकप्रतिनिधी, नागरिकांसह मालवण पत्रकार समिती, तालुका फोटोग्राफर असोसिएशन स्वयंसेवी संघटना व अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. समुद्र किनाऱ्यावरील मोठ्या प्रमाणात कचरा स्वच्छ केल्याने समुद्र किनारे लखलखीत बनले आहेत. आचरा आचरा किनारी स्वच्छता मोहीम: आचरा किनारऱ्यावर गुरूवारी सकाळी ७ वाजता आचरा किनारा साफ करण्याची मोहीम राबवली. यामध्ये १४0 जणांनी सहभाग घेतला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विभागाच्या पद्मजा चव्हाण, मालवणचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, आचरा पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे, उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, सरपंच साक्षी ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, पोलिसपाटील, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका, आचरा ग्रामस्थ, आचरा यशराज संघटना ग्रुप व मान्यवर सामिल झाले होते.