शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

झेडपीचा एल्गार, हर हर गंगे!

By admin | Updated: January 14, 2015 00:31 IST

शुध्दीकरण मोहीम : जिल्ह्यातील नद्यांमध्ये सांडपाणी योजनांसाठी पालिकांची बांधली मोट

जगदीश कोष्टी - सातारा  -‘हर हर गंगे’ म्हणत देशातील सर्वात मोठी नदी शुध्द करण्याचा नारा उत्तर भारतात लावला जात असतानाच सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या शुध्दीकरणासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी अडविण्यासाठी सर्व पालिकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने ‘गंगा शुद्धीकरण प्रकल्प’ हाती घेतला आहे. यासाठी देशभरातील नद्या स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे. केंद्र सरकारचा निधी जिल्ह्यात आणण्यासाठी सातारा जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी कऱ्हाड पालिकेने जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे, तर वाईमध्ये प्रकल्पाचे काम सुरू आहे. नागरी वस्तीतील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता पाणी ओढे, नाले किंवा नदीत सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण होत आहे. सातारा, देगाव, शिरवळ, खंडाळा, उंब्रज, कऱ्हाड या मोठ्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधील अशुद्ध पाणी मोठ्या प्रमाणावर जवळच्या नदीत सोडले जाते. त्यातील पाणीही जलचरांसाठी हानिकारक ठरत आहे. याचा विचार करुन सातारा जिल्हा परिषदेने केंद्र सरकारकडून निधी आणून जिल्ह्यातील नद्या शुद्ध करण्याचा निर्धार केला आहे.या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पालिकांचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, कऱ्हाड येथील जलव्यवस्थापन कार्यालयातील अधिकारी यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. त्यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक जानेवारी महिनाअखेरपर्यंत घेतली जाणार आहे. त्यामुळे कृष्णामाई स्वच्छ व सुंदर दिसणार आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे. मात्र, त्याठिकाणी प्रस्ताव पाठवून आणतील तेच यशस्वी होणार आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील पालिका हद्दीत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी सातारा जिल्हा परिषद पुढाकार घेणार आहे. - रवी साळुंखे,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा