शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’ अध्यक्षांचा दरारा टिकायला हवा

By admin | Updated: October 12, 2015 00:34 IST

वाईकरांसारखे ‘माणिक’ पाहिजे : लक्ष्मणराव पाटलांच्या कार्यकालाचा विसर--जिल्हा परिषदेतून...

सागर गुजर-- सातारा  जिल्हा परिषदेच्या १९६२ पासूनच्या इतिहासात वाईकरांचा दरारा जिल्हावासीयांनी जवळून पाहिला आहे. वाई मतदारसंघातील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, नारायणराव पवार, हेमलता ननावरे, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ यांनी जिल्हा परिषदेचे नेतृत्व केले. लक्ष्मणराव पाटील यांनी १९८० ते १९९० असे सलग दहा वर्षांच्या कालावधीत अध्यक्षपद भूषविले. वाईकरांसारखेच ‘माणिक’ जिल्हा परिषदेच्या कोंदणात असते, तर कुणीही येतंय अन् कालवा करून जातंय, असं म्हणण्याची वेळ आली नसती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. झेडपी अध्यक्षांचा दरारा टिकायलाच हवा, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.कोरेगाव ग्रामपंचायतीमधील गोंधळाच्या वातावरणावरुन जिल्हा परिषदेतील अध्यक्षांच्या दालनात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. या पार्श्वभूमीवर जुन्या अध्यक्षांच्या कार्यपध्दतीला उजाळा मिळाला आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असो अथवा विषय समित्यांच्या सभा असोत. यामध्ये सध्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ घालण्यासाठी चढाओढ सुरू असलेली पाहायला मिळते. सर्वसाधारण सभेत तर शर्टाच्या बाह्या मागे घेऊन आणि घशाच्या शिरा ताणून पदाधिकारी बोलत असतात. राष्ट्रवादीच्या पूर्ण बहुमताची सत्ता असूनही याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य चक्क विरोधकांचे काम बजावताना दिसतात. या सभांमध्ये अध्यक्ष माणिकराव सोनवलकर अनेकदा शांतीचे आवाहन करत असले तरी सभेत ‘बाजार’ सुरूच राहतो. हाच गोंधळ अनेकदा कमराबंद चर्चांच्या वेळीदेखील होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असते.माजी खासदार लक्ष्मणराव पाटलांचा सुवर्णकाळ यानिमित्ताने अनेकांना आठवतो. लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष असताना ते बोलायला लागले की, केवळ डोळ्यांच्या धाकावर ते सभागृहातला गोंधळ थांबवायचे. विरोधकांना शांत करण्याचे शास्त्र आणि धारदार शस्त्र लक्ष्मणतात्या आधीच परजून ठेवायचे. नारायणराव पवार, माजी आ. चिमणराव कदम, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, भाग्यश्री भाग्यवंत, इतकंच काय तर ज्योती जाधवांंच्या काळातदेखील ज्या-ज्यावेळी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी त्यांनी हे वार चातुर्याने परतवले. माणिकरावांच्या डोक्यावरही नाईक-निंंबाळकर घराण्याचा हात आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या तालमीत तयार झालेल्या माणिकरावांनाही आता त्यांचे गुण घ्यावे लागणार आहेत. माणिकराव सुमारे वर्षापूर्वी अध्यक्षपदी बसले. अडीच वर्षांचा कालावधी त्यांना मिळाला आहे. राज्यमंत्री दर्जाचे हे पद आहे, हे ओळखून त्यांनी आपल्या पदाला शोभेल, असा बाज कार्यकर्त्यांनीही राखावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, यासाठी माणिकरावांना खरंखुरं स्वातंत्र्य मिळतंय का?, हाही प्रश्न उपस्थित होतोय.१९६२ पासून हे झाले अध्यक्ष१९६२ पासून यशवंत पाटील (पार्लेकर), भागवतराव देसाई, बाबूराव घोरपडे, चिमणराव कदम, लक्ष्मणराव पाटील, सुभाषराव देशमुख, शिवाजीराव महाडिक, जयसिंगराव फरांदे, नारायणराव पवार, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हेमलता ननावरे, भाग्यश्री भाग्यवंत, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ, माणिकराव सोनवलकर.सुळावरची पोळीझेडपीचे अध्यक्षपद म्हणजे सुळावरची पोळी असते. नुसता कुणाचा तरी हात डोक्यावर असून चालत नाही, तर स्वतंत्र विचार आणि ध्येयाने काम करण्याची वृत्तीही हवी. हीच वृत्ती तत्कालीन अध्यक्षांनी दाखविली होती.