शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘झेडपी’ अध्यक्षांचा दरारा टिकायला हवा

By admin | Updated: October 12, 2015 00:34 IST

वाईकरांसारखे ‘माणिक’ पाहिजे : लक्ष्मणराव पाटलांच्या कार्यकालाचा विसर--जिल्हा परिषदेतून...

सागर गुजर-- सातारा  जिल्हा परिषदेच्या १९६२ पासूनच्या इतिहासात वाईकरांचा दरारा जिल्हावासीयांनी जवळून पाहिला आहे. वाई मतदारसंघातील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, नारायणराव पवार, हेमलता ननावरे, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ यांनी जिल्हा परिषदेचे नेतृत्व केले. लक्ष्मणराव पाटील यांनी १९८० ते १९९० असे सलग दहा वर्षांच्या कालावधीत अध्यक्षपद भूषविले. वाईकरांसारखेच ‘माणिक’ जिल्हा परिषदेच्या कोंदणात असते, तर कुणीही येतंय अन् कालवा करून जातंय, असं म्हणण्याची वेळ आली नसती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. झेडपी अध्यक्षांचा दरारा टिकायलाच हवा, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.कोरेगाव ग्रामपंचायतीमधील गोंधळाच्या वातावरणावरुन जिल्हा परिषदेतील अध्यक्षांच्या दालनात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. या पार्श्वभूमीवर जुन्या अध्यक्षांच्या कार्यपध्दतीला उजाळा मिळाला आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असो अथवा विषय समित्यांच्या सभा असोत. यामध्ये सध्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ घालण्यासाठी चढाओढ सुरू असलेली पाहायला मिळते. सर्वसाधारण सभेत तर शर्टाच्या बाह्या मागे घेऊन आणि घशाच्या शिरा ताणून पदाधिकारी बोलत असतात. राष्ट्रवादीच्या पूर्ण बहुमताची सत्ता असूनही याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य चक्क विरोधकांचे काम बजावताना दिसतात. या सभांमध्ये अध्यक्ष माणिकराव सोनवलकर अनेकदा शांतीचे आवाहन करत असले तरी सभेत ‘बाजार’ सुरूच राहतो. हाच गोंधळ अनेकदा कमराबंद चर्चांच्या वेळीदेखील होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असते.माजी खासदार लक्ष्मणराव पाटलांचा सुवर्णकाळ यानिमित्ताने अनेकांना आठवतो. लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष असताना ते बोलायला लागले की, केवळ डोळ्यांच्या धाकावर ते सभागृहातला गोंधळ थांबवायचे. विरोधकांना शांत करण्याचे शास्त्र आणि धारदार शस्त्र लक्ष्मणतात्या आधीच परजून ठेवायचे. नारायणराव पवार, माजी आ. चिमणराव कदम, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, भाग्यश्री भाग्यवंत, इतकंच काय तर ज्योती जाधवांंच्या काळातदेखील ज्या-ज्यावेळी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी त्यांनी हे वार चातुर्याने परतवले. माणिकरावांच्या डोक्यावरही नाईक-निंंबाळकर घराण्याचा हात आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या तालमीत तयार झालेल्या माणिकरावांनाही आता त्यांचे गुण घ्यावे लागणार आहेत. माणिकराव सुमारे वर्षापूर्वी अध्यक्षपदी बसले. अडीच वर्षांचा कालावधी त्यांना मिळाला आहे. राज्यमंत्री दर्जाचे हे पद आहे, हे ओळखून त्यांनी आपल्या पदाला शोभेल, असा बाज कार्यकर्त्यांनीही राखावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, यासाठी माणिकरावांना खरंखुरं स्वातंत्र्य मिळतंय का?, हाही प्रश्न उपस्थित होतोय.१९६२ पासून हे झाले अध्यक्ष१९६२ पासून यशवंत पाटील (पार्लेकर), भागवतराव देसाई, बाबूराव घोरपडे, चिमणराव कदम, लक्ष्मणराव पाटील, सुभाषराव देशमुख, शिवाजीराव महाडिक, जयसिंगराव फरांदे, नारायणराव पवार, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हेमलता ननावरे, भाग्यश्री भाग्यवंत, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ, माणिकराव सोनवलकर.सुळावरची पोळीझेडपीचे अध्यक्षपद म्हणजे सुळावरची पोळी असते. नुसता कुणाचा तरी हात डोक्यावर असून चालत नाही, तर स्वतंत्र विचार आणि ध्येयाने काम करण्याची वृत्तीही हवी. हीच वृत्ती तत्कालीन अध्यक्षांनी दाखविली होती.