शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

जिल्हा परिषदेचा डंका : सातारचे ‘मिशन धाराऊ’ महाराष्ट्रात पोहोचणार

By नितीन काळेल | Updated: February 8, 2024 21:21 IST

आदिती तटकरे यांच्याबरोबर बैठक; अधिकाऱ्यांना सूचना

सातारा: जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ माता दुग्धामृतम्’ अभियान सुरू केले होते. या अभियानाचे यश पाहून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे अभियान राज्यात राबविण्याबाबत सूचना केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा डंका वाजणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून ‘मिशन धाराऊ’ हे अभियान २०२१ मध्ये सुरू केले होते. यामधून जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता; कारण, बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान सुरू आहे. या अभियानाचा खूप चांगला फायदा झाला. तसेच उद्देशही सफल झाला आहे. त्यामुळे राज्यात हे अभियान राबविण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

मुंबईत मंत्रालयात याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे उपस्थित होत्या. यावेळी मंत्री तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ’ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर या अभियानाचा उद्देश पाहून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत त्यांनी संबंधितांना सूचनाही केली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने ‘मिशन धाराऊ’ अभियान राबविण्यात येत आहे. याचा फायदा गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना झालेला आहे. या अभियानाचा उद्देश सफल होऊन यशही मिळाले. त्यामुळे ही योजना आता राज्यात राबविली जाणार आहे, याचा आनंद होत आहे.- रोहिणी ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ’ हे अभियान सुरू केले आहे. यामधून जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची चळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता. या अभियानाचा खूप चांगला फायदा झाला. तसेच उद्देशही सफल झाला आहे. त्यामुळे राज्यात हे अभियान राबविण्याचे नियोजित करण्यात आल्याने सातारा जिल्ह्याचा नावलाैकिक आणखी वाढला आहे.- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :satara-pcसाताराAditi Tatkareअदिती तटकरे