शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत अधिकाऱ्यांचा डोळा अजूनही लोण्याच्या गोळ्यावर

By admin | Updated: December 20, 2015 00:38 IST

प्रशासनातील खाबुगिरी उघडकीस : सामान्यांना नाडणाऱ्यांची ‘दुकाने’ बंद होतायत

सागर गुजर / सातारा प्रशासनात काम करताना वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तळातल्या शिपायापर्यंत पैसा खाणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, या वृत्तीने खाबुगिरी सुरू आहे. लोण्याचा गोळा चिखलात का पडलेला असेना, तो उचलायची स्वार्थी वृत्ती ज्याच्याकडे असते, तोच प्रशासकीय कर्मचारी सामान्यांना नाडून त्यांच्याकडून पैसे उकळत आहे. सातारा जिल्हा परिषदेतील यांत्रिक विभागाचा उपविभागाचा शाखा अभियंता सतीश नामदेव वरुडे याला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. वरुडे याने ६० वर्षांच्या वृद्धाकडून बोअरवेल नुकसानभरपाई प्रकरणाचा पाहणी अहवाल उपअभियंता, कण्हेर कालवा उपविभाग क्र. ११, नागठाणे येथे पाठविण्यासाठी संबंधितांकडे सात हजारांची मागणी केली होती. शेतकऱ्यांकडे झाडाला पैसे येतात, या अविर्भावात अशा प्रकारे पैशांची मागणी होते. अनेकदा शेतकरी हात दगडाखाली आहेत, म्हणून गप्प बसतो, अथवा अज्ञानामुळे या अधिकाऱ्यांच्या मागणीला बळी पडतो; मात्र या शेतकऱ्याने दिलेरपणा दाखवत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करून या उपअभियंत्याला गजाआड धाडले. वीज विभागातील अनेक तक्रारी कायम येत असतात. अनेक वर्षांपासून पैसे भरूनही शेतकऱ्यांना शेतीपंपाची वीज मिळत नाही. एक-दोन महिने नव्हे, तर दीड-दोन वर्षे शेतकऱ्यांना यासाठी रखडपट्टी करावी लागत आहे. याउलट नंतर आलेले प्रस्ताव मंजूर होऊन त्यांच्या शेतात पाणी खळाळते. यामागचे गौडबंगाल नेमके काय? हे पाहण्याचीही वेळ आली आहे. त्यातच विविध प्रकरणांमध्ये ‘ना हरकत’ दाखला मिळण्यासाठी नागरिकांची धावपळ होत असते. या ‘ना हरकत’चा प्रकार सामान्यांना नाडण्यासाठीच असतो काय?, असा सवालही उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून, कृषीविभाग, वीजविभाग, जिल्हा परिषद, आरोग्य खाते, पाटबंधारे खाते, पुनर्वसन खाते अशा अनेक खात्यांमध्ये खाबुगिरीसाठी ‘ना हरकत’ हा प्रकार एकदाचा हद्दपार करावा, अशी मागणी काकुळतीला आलेले तक्रारदार नेहमी करत असतात. नव्या सरकारने सामान्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतलेत, हेही पाहायला मिळत नाही. सरकार बदलले तरी प्रशासन तेच आहे, यावर अंकुश ठेवण्यासाठी पारदर्शकपणे आणि तळमळीने राजकीय मंडळींनी हालचाली करायला हव्यात, पाठीशी घातले गेल्यास संबंधित अधिकारी सामान्य मतदारालाच त्रासदायक ठरतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. वीज विभागातही अनेक तक्रारी शेतीपंपाचे कनेक्शन मिळावे, यासाठी वर्षाेन्वर्षे वाट पाहावी लागते. आपला नंबर कधी येईल, यासाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. मात्र, तरीही पदरी निराशाच पडते. याउलट नंतर आलेले अर्ज मंजूर होऊन त्यांच्या शेतात पाणी खळखळते, यामागचे गौडबंगाल नेमके काय, याचं कोडं मात्र शेतकऱ्यांना उलगडत नाही. पारदर्शकता गरजेची नव्या सरकारने काही ऐतिहासिक निर्णय घेतले असले तरी प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होतेय की नाही, याबाबत जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या समस्यांबाबत दुर्लक्ष होत असेल तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पारदर्शकता आणणे गरजेचे आहे.