शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत अधिकाऱ्यांचा डोळा अजूनही लोण्याच्या गोळ्यावर

By admin | Updated: December 20, 2015 00:38 IST

प्रशासनातील खाबुगिरी उघडकीस : सामान्यांना नाडणाऱ्यांची ‘दुकाने’ बंद होतायत

सागर गुजर / सातारा प्रशासनात काम करताना वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तळातल्या शिपायापर्यंत पैसा खाणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, या वृत्तीने खाबुगिरी सुरू आहे. लोण्याचा गोळा चिखलात का पडलेला असेना, तो उचलायची स्वार्थी वृत्ती ज्याच्याकडे असते, तोच प्रशासकीय कर्मचारी सामान्यांना नाडून त्यांच्याकडून पैसे उकळत आहे. सातारा जिल्हा परिषदेतील यांत्रिक विभागाचा उपविभागाचा शाखा अभियंता सतीश नामदेव वरुडे याला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. वरुडे याने ६० वर्षांच्या वृद्धाकडून बोअरवेल नुकसानभरपाई प्रकरणाचा पाहणी अहवाल उपअभियंता, कण्हेर कालवा उपविभाग क्र. ११, नागठाणे येथे पाठविण्यासाठी संबंधितांकडे सात हजारांची मागणी केली होती. शेतकऱ्यांकडे झाडाला पैसे येतात, या अविर्भावात अशा प्रकारे पैशांची मागणी होते. अनेकदा शेतकरी हात दगडाखाली आहेत, म्हणून गप्प बसतो, अथवा अज्ञानामुळे या अधिकाऱ्यांच्या मागणीला बळी पडतो; मात्र या शेतकऱ्याने दिलेरपणा दाखवत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करून या उपअभियंत्याला गजाआड धाडले. वीज विभागातील अनेक तक्रारी कायम येत असतात. अनेक वर्षांपासून पैसे भरूनही शेतकऱ्यांना शेतीपंपाची वीज मिळत नाही. एक-दोन महिने नव्हे, तर दीड-दोन वर्षे शेतकऱ्यांना यासाठी रखडपट्टी करावी लागत आहे. याउलट नंतर आलेले प्रस्ताव मंजूर होऊन त्यांच्या शेतात पाणी खळाळते. यामागचे गौडबंगाल नेमके काय? हे पाहण्याचीही वेळ आली आहे. त्यातच विविध प्रकरणांमध्ये ‘ना हरकत’ दाखला मिळण्यासाठी नागरिकांची धावपळ होत असते. या ‘ना हरकत’चा प्रकार सामान्यांना नाडण्यासाठीच असतो काय?, असा सवालही उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून, कृषीविभाग, वीजविभाग, जिल्हा परिषद, आरोग्य खाते, पाटबंधारे खाते, पुनर्वसन खाते अशा अनेक खात्यांमध्ये खाबुगिरीसाठी ‘ना हरकत’ हा प्रकार एकदाचा हद्दपार करावा, अशी मागणी काकुळतीला आलेले तक्रारदार नेहमी करत असतात. नव्या सरकारने सामान्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतलेत, हेही पाहायला मिळत नाही. सरकार बदलले तरी प्रशासन तेच आहे, यावर अंकुश ठेवण्यासाठी पारदर्शकपणे आणि तळमळीने राजकीय मंडळींनी हालचाली करायला हव्यात, पाठीशी घातले गेल्यास संबंधित अधिकारी सामान्य मतदारालाच त्रासदायक ठरतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. वीज विभागातही अनेक तक्रारी शेतीपंपाचे कनेक्शन मिळावे, यासाठी वर्षाेन्वर्षे वाट पाहावी लागते. आपला नंबर कधी येईल, यासाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. मात्र, तरीही पदरी निराशाच पडते. याउलट नंतर आलेले अर्ज मंजूर होऊन त्यांच्या शेतात पाणी खळखळते, यामागचे गौडबंगाल नेमके काय, याचं कोडं मात्र शेतकऱ्यांना उलगडत नाही. पारदर्शकता गरजेची नव्या सरकारने काही ऐतिहासिक निर्णय घेतले असले तरी प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होतेय की नाही, याबाबत जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या समस्यांबाबत दुर्लक्ष होत असेल तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पारदर्शकता आणणे गरजेचे आहे.