शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

वाईचे विश्वकोश जगभरातील मराठी भाषिकांचा मानबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST

कोशीय लेखन हे भाषेच्या अस्तित्वाचा प्रधान आणि मूलभूत पाया असतो. भाषेला व्यवहार भाषा, मातृभाषा आणि लोकभाषा म्हणून जे एक ...

कोशीय लेखन हे भाषेच्या अस्तित्वाचा प्रधान आणि मूलभूत पाया असतो. भाषेला व्यवहार भाषा, मातृभाषा आणि लोकभाषा म्हणून जे एक अस्तित्व असते, ते ज्ञानभाषा म्हणून परिवर्तित व्हायला कोशीय लेखनाचीच जोड लागते. याच मुख्य प्रेरणेने यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची उभारणी केली. मराठी विश्वकोश हा त्यातील एक बृहद प्रकल्प होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या प्रकल्पाचे सारथ्य केले. मराठी माणसाला सर्वस्तरीय ज्ञान आणि माहिती मराठी भाषेतून मिळावी आणि त्यायोगे भाषा समृद्ध व्हावी हा त्यामागे महत्त्वाचा उद्देश होता. १९६० च्या दशकापासून सुरू असणाऱ्या या प्रकल्पाचे २० संहिता खंड प्रकाशित झाले आहेत.

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये ज्या २२ भाषांचा उल्लेख आहे, त्या भाषांत मराठी विश्वकोशासारखे सर्वसमावेशक, सर्वविषयक संग्राहक आणि परिभाषायुक्त कार्य झालेले नाही. तर्कतीर्थांनी वैश्विक स्तरावर मान्यताप्राप्त असणाऱ्या एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या कोशग्रंथाच्या धरतीवर मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आहे.

तर्कतीर्थांनंतर मे. पु. रेगे, रा. ग. जाधव, श्रीकांत जिचकार, विजया वाड यांनी मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये विशेष योगदान दिले. विजया वाड यांनी शेवटच्या ३ खंडांचे कार्य मोठ्या गतीने करवून घेतले. वाड यांच्याच प्रयत्नातून माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत विश्वकोश अधिक लोकाभिमुख झाला. १९६० च्या दशकापासून गेली सहा शतके विश्वकोश निर्मिती मंडळाचे हे कार्य सुरू आहे.

चौकट :

साताऱ्यातील शाहूपुरीमध्ये मराठी साहित्य परिषद शाखा सुरू झाल्यानंतर मराठी भाषा दिन, महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा, लेखक तुमच्या भेटीला, मराठी वाङ्मय मंडळ असे उपक्रम सुरू झाले. शाहूपुरी शाखेने साहित्याच्या व्यासपीठावरून सामाजिक कार्यास मदत देऊन नवीन पायंडा पाडला. आजच्या युवा पिढीपर्यंत साहित्य पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन साहित्यिक तयार होण्यास मदत होईल. या संकल्पनेतूनच शाखेने रयत शिक्षण संस्थेबरोबर तीन वर्षांचा सामंजस्य करार केला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मसाप, शाहूपुरी शाखेने पुढाकार घेतला. मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडहिकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा यासाठी मसापचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी लढा हाती घेतला. पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्रे पाठवण्यात आली.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना करून आंदोलकांद्वारे सातारकरांचा आवाज दिल्लीत घुमला. या प्रार्थना आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मराठीला अभिजात दर्जा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

-पी. एस. भिलारे (वाई)