शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

विद्यानगरमध्ये वाढली युवकांची दादागिरी

By admin | Updated: July 17, 2017 14:39 IST

रोजचाच राडा : पोलीस चौकीची गरज

आॅनलाईन लोकमतकऱ्हाड : विद्येचे माहेरघर असलेल्या विद्यानगरचे सामाजिक स्वास्थ्य सध्या बिघडले आहे. युवकांच्या गटात मारामारीच्या घटना घडत असल्याने येथे अनेकवेळा गोंधळ निर्माण होतो. ही गुंडगिरी रोखण्यासाठी विद्यानगरला पोलीस चौकी उभारणे गरजेचे बनले आहे.

विद्यानगर येथे रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने युवकांचा राडा सुरु असतो. अशा घटनांची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांना मिळून ते त्याठिकाणी पोहोचेपर्यंत युवक तेथून पसार होतात. साहजिकच त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. संबंधित युवकांवर कोणाचाच धाक नसल्याची परिस्थिती आहे. रस्ता रूंदीकरण होण्यापुर्वी गाडगे महाराज महाविद्यालयानजीक पोलीस चौकी होती. या चौकीमुळे युवकांवर पोलिसांचा वचक असायचा. मात्र, रस्ता रुंदीकरणात पोलीस चौकी पाडल्याने येथे पोलिसांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी, युवकांवरील वचकही कमी झाला आहे. किरकोळ कारणावरुन गटागटात वारंवार भांडणे होत आहेत. काही वाद तडजोडीने मिटतात. तर काही वारंवार धुमसत राहतात. या वादावादीचा त्रास महाविद्यालयीन युवती, व्यावसायीक व परिसरातील नागरीकांना सहन करावा लागतो.

परिसरात यापुर्वी चोरीच्याही गंभीर घटना घडल्या आहेत. पोलीस चौकी असताना महाविद्यालय परिसरात पोलिसांची वर्दळ असायची. तसेच चौकीत दिवसभर किमान एक कर्मचारी तरी उपस्थित असायचा. रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त हमखास व्हायची. मात्र, सध्या चौकीच नसल्याने पोलीस या परिसरात क्वचितच येतात. परिणामी, येथे गुन्हेगारी कारवाया वाढल्याचे दिसून येत आहे. वाहने बेदरकारपणे चालवण्याचे प्रमाणही वाढल्याने अपघात होत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी विद्यानगरला पोलीस चौकी होणे गरजेचे आहे.