शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो उद्योजक होण्याचा निर्धार करा, केंद्र सरकार पाठीशी; नारायण राणेंची नवउद्योजकांना साद 

By दीपक देशमुख | Updated: May 12, 2023 16:39 IST

'राजकारणाऐवजी उद्याेगात बुद्धी वापरा'

सातारा : आपले जीवनमान उंचावयाचे असेल तर उद्योग हाच सर्वात चांगला मार्ग आहे. छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी निर्धार केला आणि मराठा साम्राज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व युवकांनी उद्योजक होण्याचा निर्धार करावा, केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही केंद्रीय लघु उद्योजक मंत्री नारायण राणे यांनी दिली. दरम्यान यावेळी सातारा जिल्ह्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचे उद्योजक प्रशिक्षण केंद्र देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषद पार पडली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपिठावर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, आमदार जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, खा. संजयकाका पाटील, मावळ मतदार संघाचे आ. संजय भेगडे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आनंदराव पाटील, मदन भोसले, धैर्यशील कदम, भरत पाटील, पुरुषोत्तम जाधव, मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते आदी उपस्थित हाेते.यावेळी राणे म्हणाले, धीरुबाई अंबानींनी शुन्यातून मोठा उद्योग उभा केला. मराठी माणसानेही असे मोठे उद्योजक व्हावे. मराठा माणूस थोडे पैसे यायला आले की त्याच्यात लगेच बदलतो. कितीही पैसे आले तरी पाय जमीनीवर हवेत. एकाच व्यवसायावर न विसंबता अनेक उद्योग सुरू करावेत. कल्पकतेतून वेगळे काय देवू शकतो, याचा विचार करून मार्केटिंग करावे.३० लाख वस्ती असलेल्या सातारा जिल्ह्यात फक्त ६८ हजार उद्योजक आहेत. जिल्ह्याचे दरडोई, साक्षरता वाढली पाहिजे. येथील साधनसामुग्रीचा विचार करून उद्योग वाढायला हवा. केंद्र शासन लघू ५० ते १०० मध्यम २५० कोटीपर्यंत कर्ज देेते. तुमच्याकडे जागाहवी, बाकी आधुनिक तंत्रज्ञान, मार्गदर्शन, प्रशिक्षण असे सर्व केंद्रशासन उपलब्ध करते. युवकांनी पुढे यावे, अशी साद राणे यांनी घातली.यावेळी भागवत कराड म्हणाले, सातारा सारख्या शहरात उद्योग वाढतील, यासाठी उद्योग परिषदा होण्याची गरज आहे. जिल्ह्यात ७८ बँकेच्या ब्रँच वाढण्याच्या सुचना केल्या आहेत. बँकेतून उद्योजकांना कर्ज वितरणाबत असणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. महाराष्ट्रात चार डीजिटल बँका उघडायच्या आहेत. त्यापैकी एक बँक सातारा येथे असून त्याचे कामकाज सुरू आहे.

राजकारणाऐवजी उद्याेगात बुद्धी वापरासातारची लोक हुशार आहेत. राजकारणात जी बुद्धीमत्ता आपण वापरतो, तेवढी त्यातील चारआणे उद्योगात वापरली रिझल्ट एक रुपाया मिळेल. सातारा जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री दिले आहेत, असेही राणे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarayan Raneनारायण राणे