शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

तेरी भी चूप ... मेरी भी चूप !

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

‘सह्याद्री’ची छाननी : म्हणे... आमचे ‘नो आॅब्जेक्शन’ !

प्रमोद सुकरे -सुकरे -सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १७ मार्चला होत आहे. आज (बुधवारी) येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी होती. गेले दोन दिवस सर्वच नेत्यांनी छाननीची जोरदार तयारी चालवलेली. त्यामुळे बुधवारी कायद्याच्या पुस्तकांचा खिस निघणार अन् वकिलांच्यात खडाजंगी होणार, असे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात सर्वच नेत्यांनी ‘नो आॅब्जेक्शन’ म्हणत कानावर हात ठेवल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ची सध्या चर्चा सुरू आहे. सह्याद्री कारखान्याच्या इतिहासात प्रथमच २२४ उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक दुरंगी, तिरंगी की चौरंगी होणार, हे अद्याप समजेना झालंय. काही महिन्यांपूर्वी विधानसभेसाठी तापलेले राजकीय वातावरण अजून ‘थंड’ झालेलं नाही. त्यामुळेच कारखान्याच्या आखाड्यातही अनेकांनी ‘दंड’ थोपटल्याचे दिसते; पण यातील कोण-कोण निवडणुकीपूर्वीच ‘थंड’ होणार अन् कोण-कोण ‘बंड’ करणार, यासाठी थोडे थांबावेच लागेल. बुधवारी झालेली छाननी एकदम ‘छान’च झाली. कुणी कुणावर हरकतच घेतली नाही. फक्त तांत्रिक मुद्द्यावर दोन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच बाजूला काढले, एवढेच! पहिल्या गटाच्या छाननीवेळीच आमदार बाळासाहेब पाटील व धैर्यशील कदम यांनी आमच्या कोणावर हरकती नसल्याचे सांगून टाकले अन् अवघ्या काही मिनिटांतच छाननीचे सोपस्कार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूर्ण केले. मात्र, नेत्यांच्या या ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’च्या भूमिकेबद्दल सभासद कार्यकर्त्यांच्यात सध्या जोरदार उलट-सुलट चर्चा सुरू आहे.कारखान्याच्या गत दोन निवडणुका बिनविरोध करण्यात यशस्वी ठरलेल्या आमदार बाळासाहेब पाटलांना यंदा मात्र निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे; पण विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांनी त्याची तयारी चालवली आहे. तर दुसरीकडे त्यांचे प्रमुख विरोधक ‘मनोधैर्य’ एकवटून विधानसभेचा वचपा काढण्याची भाषा करत आहेत. दक्षिणेतील एका धुरंधर नेतृत्वाचीही त्यांना छुपी साथ मिळत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची अन् दोघांनाही सोपी वाटत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यापेक्षा एकमेकांच्या कामावरच प्रचारात हरकती घ्याव्यात, असे त्यांनी निश्चित केले असावे. परिणामी प्रचारादरम्यान यापुढील काळात आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. आता निर्णय मतदारांच्या हातातउमेदवारी अर्जाची छाननी हा निवडणुकीतील महत्त्वाचा भाग मानला जातो. आपला उमेदवारी अर्ज बाद तर होणार नाही ना? त्याच्यावर कोणी हरकत तर घेणार नाही ना, याची धकधक प्रत्येक उमेदवाराच्या मनात असतेच; पण ‘सह्याद्री’ची छाननी चांगली झाल्याने आता एक टप्पा पूर्ण झाला असून, अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच उमदेवारांचे भविष्य मतदारांच्या हातातच उरणार आहे. ‘नो आॅब्जेक्शन’ की ‘नो प्रॉब्लेम’ ! उमेदवारी अर्जाबाबत छाननीत नेत्यांनी ‘नो आॅबजेक्शन’चा सिग्नल दिला. त्यामुळे त्यांना निवडणुकीतही ‘नो प्रॉब्लेम’ असेच सांगायचे असावे. सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक सोपी वाटत असावी तर विरोधकांच्या डोक्यातही काही राजकीय खेळी असावी. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून कोणीही रिंगणात आले तरी त्यांना ‘प्रॉब्लेम’ वाटत नसावा, असेच आजचे चित्र दिसत आहे.