शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

जवान दत्तात्रय सत्रे अनंतात विलीन

By admin | Updated: February 10, 2015 23:58 IST

सत्रेवाडी-मलवडी बंद : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मान्यवरांकडून अंत्यदर्शन

म्हसवड : अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवरील मॅनमाऊ गावात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात हुतात्मा झालेले जवान दत्तात्रय माधव सत्रे यांच्यावर आज (मंगळवार) सत्रेवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.सत्रेवाडीचे सुपुत्र दत्तात्रय सत्रे हे २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले. ते ‘नऊ आसाम रायफल्स’मध्ये कार्यरत होते. दत्तात्रय सत्रे हे शुक्रवार, दि. ६ रोजी दुपारी अकराच्या सुमारास वाहनातून चांगलांग जिल्ह्यातील मॅनमाऊ गावात गस्त घालण्यासाठी निघाले होते. त्यावेळी बोडो अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट होऊन दोन स्थानिक नागरिकांसह सर्व जवान गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दत्तात्रय सत्रे यांचे उपचारापूर्वीच निधन झाले.या स्फोटाची जबाबदारी नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड, नॅशनलिस्ट असोसिएशन कौन्सिल आॅफ नागालॅण्ड, मणिपूर पीपल्स लिबरेशन फ्रंट या चार संघटनांनी घेतली आहे, अशी माहिती आसाम रायफल्सचे लेफ्टनंट कर्नल एस. न्यूटन यांनी दिली आहे.हुतात्मा दत्तात्रय सत्रे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दहिवडी येथे आणण्यात आले. तेथून मलवडीच्या प्रवेशद्वारापासून फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. ठिकठिकाणी ग्रामस्थ अंत्यदर्शन घेत होते. अंत्ययात्रा दत्तात्रय सत्रे यांच्या घरासमोर आली असता पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवले. त्यानंतर घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात चौथऱ्यावर पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी १०९ मराठा लाईफ इलफन्ट्री बटालियन आणि सातारा पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, गटविकास अधिकारी सीमा जगताप, संजय भोसले, धीरज दवे, विजय साखरे, दादा काळे, अर्जुन काळे, तानाजी मगर, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, पोलीस उपनिरीक्षक पी. एन. इंगळे आदींनी पुष्पचक्र अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले. सत्रे यांच्या हौतात्म्याबद्दल गावात हळहळ व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)चार दिवसांनी अश्रूंचा बांध फुटलाअंत्ययात्रा दत्तात्रय सत्रे यांच्या घरासमोर आली असता हुतात्मा दत्तात्रय सत्रे यांची आई, पत्नी, भाऊ, बहीण व मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. चार दिवसांपासून रोखून धरलेल्या अश्रूंचा बांध अखेर फुटला.