शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

जवान दत्तात्रय सत्रे अनंतात विलीन

By admin | Updated: February 10, 2015 23:58 IST

सत्रेवाडी-मलवडी बंद : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मान्यवरांकडून अंत्यदर्शन

म्हसवड : अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवरील मॅनमाऊ गावात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात हुतात्मा झालेले जवान दत्तात्रय माधव सत्रे यांच्यावर आज (मंगळवार) सत्रेवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.सत्रेवाडीचे सुपुत्र दत्तात्रय सत्रे हे २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले. ते ‘नऊ आसाम रायफल्स’मध्ये कार्यरत होते. दत्तात्रय सत्रे हे शुक्रवार, दि. ६ रोजी दुपारी अकराच्या सुमारास वाहनातून चांगलांग जिल्ह्यातील मॅनमाऊ गावात गस्त घालण्यासाठी निघाले होते. त्यावेळी बोडो अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट होऊन दोन स्थानिक नागरिकांसह सर्व जवान गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दत्तात्रय सत्रे यांचे उपचारापूर्वीच निधन झाले.या स्फोटाची जबाबदारी नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड, नॅशनलिस्ट असोसिएशन कौन्सिल आॅफ नागालॅण्ड, मणिपूर पीपल्स लिबरेशन फ्रंट या चार संघटनांनी घेतली आहे, अशी माहिती आसाम रायफल्सचे लेफ्टनंट कर्नल एस. न्यूटन यांनी दिली आहे.हुतात्मा दत्तात्रय सत्रे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दहिवडी येथे आणण्यात आले. तेथून मलवडीच्या प्रवेशद्वारापासून फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. ठिकठिकाणी ग्रामस्थ अंत्यदर्शन घेत होते. अंत्ययात्रा दत्तात्रय सत्रे यांच्या घरासमोर आली असता पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवले. त्यानंतर घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात चौथऱ्यावर पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी १०९ मराठा लाईफ इलफन्ट्री बटालियन आणि सातारा पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, गटविकास अधिकारी सीमा जगताप, संजय भोसले, धीरज दवे, विजय साखरे, दादा काळे, अर्जुन काळे, तानाजी मगर, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, पोलीस उपनिरीक्षक पी. एन. इंगळे आदींनी पुष्पचक्र अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले. सत्रे यांच्या हौतात्म्याबद्दल गावात हळहळ व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)चार दिवसांनी अश्रूंचा बांध फुटलाअंत्ययात्रा दत्तात्रय सत्रे यांच्या घरासमोर आली असता हुतात्मा दत्तात्रय सत्रे यांची आई, पत्नी, भाऊ, बहीण व मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. चार दिवसांपासून रोखून धरलेल्या अश्रूंचा बांध अखेर फुटला.