शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

माण-खटावमधील वाऱ्याची दिशा तुम्हाला पंधरा वर्षांत समजली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

म्हसवड : ‘गेल्या पंधरा वर्षांत जंग जंग पछाडूनही तुम्हाला माण-खटावमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. तुम्ही माणमध्ये आला तेव्हा ...

म्हसवड : ‘गेल्या पंधरा वर्षांत जंग जंग पछाडूनही तुम्हाला माण-खटावमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. तुम्ही माणमध्ये आला तेव्हा तुमचा पक्ष आणि बगलबच्चे निवडणुका हरल्याचा इतिहास तुमच्या नावे झाला आहे. तुमचे अतिक्रमण येथील स्वाभिमानी जनतेने नेहमीच हाणून पाडले आहे. पालकमंत्री, विधान परिषदेच्या सभापतिपदाची आयुधे घेऊन आजपर्यंत माणमध्ये आलात. ही राजकीय आयुधे बाजूला ठेवून मैदानात यायचे धाडस दाखवा,’ असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी दिले.

माण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या उपस्थितीत नुकतीच संवादसभा झाली. त्या वेळी रामराजेंनी ‘माणमधील वाऱ्याचा अंदाज घ्यायला आलोय, कार्यकर्त्यांना मान खाली घालावी लागेल अशी तडजोड होणार नाही,’ अशी वक्तव्ये केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला.

आमदार गोरे म्हणाले, ‘मी राजकारणात आल्यापासून रामराजेंना माणमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. ते येथे आले तेव्हा राष्ट्रवादी निवडणुकांत पराभूत झाली. आपण माण-खटावमध्ये बिन बुलाये मेहमान असता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येण्याने नाखूष असतात. जबरदस्तीने त्यांच्यावर नेतृत्व लादायच्या भानगडीत पडू नका. रामराजे यांना निवडणुकीपुरताच माण-खटाव आठवतो. चौदा महिन्यांपासून येथील जनता कोरोना महामारीला धैर्याने तोंड देत आहे. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनेक संसार उघड्यावर पडले.’

आमदार गोरे म्हणाले, ‘लोकांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते, तेव्हा तुम्ही कोणते होकायंत्र शोधत होता. ‘आमचं ठरलंयवाले’ त्या काळात दडी मारून बसले होते. राष्ट्रवादीच्या आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांना गरज होती तेव्हा आम्हीच बेड उपलब्ध करून दिले आहेत. राजकीय कटकारस्थाने करायला तुम्ही माणमध्ये अवश्य या, त्यासाठी स्वागतच आहे, मात्र इथली जबाबदारी घ्यायचे पुण्यकर्म कधीच केले नाही. एकतर तुम्हाला कुणीही मनापासून विचारत नाही. येथे आग लावून कंड्या पिकवण्याचे उद्योग करता असे तुमचेच पदाधिकारी खासगीत बोलतात. तुम्ही पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापतिपद अशी आयुधे घेऊन इथे आलात आणि आमच्याशी लढलात. एकदा ही सगळी आयुधे बाजूला ठेवून मैदानात उतरावे.’