शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

तुझं माझं जमेना.. खुर्चीविना करमेना

By admin | Updated: March 13, 2017 22:52 IST

कारण राजकारण : कऱ्हाडला सभापतिपदाची आज निवड; दादा, बाबा, काका, नाना म्हणतायत...

कऱ्हाड : राजकारणात कोण कुणाचा मित्र अथवा शत्रू नसतो, हे आजवर अनेकदा पाहायला मिळाले आहे. राजकीय नेते बऱ्याचदा सोयीची मैत्री करतात. तर कधी गरजेने मैत्रीचा हात पुढे करतात. कऱ्हाड पंचायत समिती निवडणुकीतही कोणा एकाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने गळ्यात गळे तर घालावेच लागणार आहेत. त्यामुळे सध्या दादा, काका, बाबा, नाना ‘जाऊ द्या ना बाळासाहेब...’ असा सूर आळवताना दिसतायत.पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने कुणा एका पक्षाला किंवा नेत्याला सत्ता स्थापन करणे अशक्य झाले आहे. येथे राष्ट्रवादीला सात तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विकास आघाडीलाही सात जागा मिळाल्या आहेत. तर डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सभापती निवडीवेळी ‘हम सात सात है’चा नारा ऐकायला मिळणार की उंडाळे व रेठरेकरांच्या ‘मैत्रिपर्वाला’ उजाळा मिळणार, याची उत्सुकता आहे. पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले हे तिघेही उत्सुक आहेत. मात्र, सद्य:स्थितीत बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेभोवती गणिते फिरताना दिसत आहेत. उंडाळकर-रेठरेकरांचे मैत्रिपर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतच तुटले. त्यामुळे ते लगेचच जुळण्याची शक्यता किती, हा अभ्यासाचा भाग बनला आहे. त्यामुळे या दोन्ही गटांच्या मध्यस्थानी बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क वाढवून आपण सत्ता बनवूया, अशी चर्चा चालविली आहे; पण बाळासाहेब पाटील जुन्या आठवणींना उजाळा देत असल्यामुळे हे सगळेच लोक आता जाऊ द्या ना बाळासाहेब... राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, हे सांगून मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत उंडाळकरांनी उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांना रसद पुरविली होती. तर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही उंडाळकरांनी उत्तरेतील गावन्गाव पिंजून काढले. जाहीर सभांमधून आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर टिकांचे आसूड ओढले. शब्दरूपी अस्त्राने झालेल्या जखमा अजुनही ताज्या आहेत. या सर्व आठवणींना आ. बाळासाहेब पाटील उजाळा देत असल्याने दस्तुरखुद्द काका आणि त्यांच्या मध्यस्थांनाही काय बोलावे, हे कळेनासे झाले आहे. दुसरीकडे भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनाही सत्तेत जावे, असे मनोमन वाटत आहे. मैत्रिपर्व तुटल्याने उत्तरच्या आमदारांसोबत जुळवून घेणे, हा त्यांच्यासमोरचा मार्ग आहे. पण भोसलेंनी उत्तरेवर स्वारी करण्याचा केलेला प्रयत्न बाळासाहेब अजूनही विसरलेले दिसत नाहीत. त्यातच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही अतुल भोसलेंनी उत्तरेत बरेच लक्ष घातल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुतण्याच्या मदतीला काका मदनदादा धावून आलेले दिसतायत. त्यांनीही ‘जाऊ द्या ना बाळासाहेब...’ म्हणत जुन्या गोष्टी सोडून देऊ आणि नव्याने सुरुवात करू या, असा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचाही निरोप घेऊन एक मनोहारी नेता उत्तरच्या आमदारांना भेटल्याची चर्चा आहे; पण कऱ्हाड पालिका निवडणुकीत काँग्रेसने दाखविलेला हिसका बाळासाहेबांना चांगलाच ज्ञात आहे. त्यामुळे ते बाबांच्या निरोपाला किती दाद देतील, हा प्रश्नच आहे. सध्यातरी दादा, काका, नाना, बाबा हे सर्वजण ‘जाऊ द्या ना बाळासाहेब...’ चा सूर काढत असून, उद्या बाळासाहेब ‘चालतंय की’ असं कोणाला म्हणणार, हे पाहावे लागेल.(प्रतिनिधी) सभापतिपद कुणाला?पंचायत समिती सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. यासाठी राष्ट्रवादीकडे मसूरच्या शालन माळी, उंडाळकरांच्या विकास आघाडीकडे येळगावच्या फरीदा इनामदार तर भाजपकडे कार्वेतील अर्चना गायकवाड अशा तीन दावेदार आहेत; पण कुणाच्या पदरात सभापतिपदाचं दान पडणार, हे होणाऱ्या समीकरणावर अवलंबून असल्याने त्याबाबतही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेचराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीत काँग्रेसबरोबरच आघाडी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, कऱ्हाडला काँग्रेसला बरोबर घेऊनही राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा पाहिजे तेवढा पुढे सरकत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच वाढला आहे.