शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

येरळा नदीपात्र आजही पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

मायणी : जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, परिसरातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. संपूर्ण परिसर जलमय ...

मायणी : जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, परिसरातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. मात्र, खटाव तालुक्याची मुख्य जलवाहिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र येरळवाडी मध्यम प्रकल्पापासून दक्षिणेला कोरडे पडले आहे. त्यामुळे हा परिसर आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिसरातील सर्व ओढे-नाले, नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळत असल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे, अशी विधायक परिस्थिती एका बाजूला आहे.

जिल्ह्याचा पूर्व भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. खटाव तालुक्यातील अनेक गावे आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याची मुख्य जलवाहिनी म्हणून येरळा नदीला ओळखले जाते. या नदीवर असलेले येरळवाडी व नेर हे दोन मध्यम प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या (तलावाच्या) दक्षिण बाजूला अंबवडे, गोरेगाव, मोराळे, चितळी व सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत असलेले येरळा नदीपात्र आजही पूर्ण कोरडे आहे.

येरळा नदीच्या परिसरासह मायणी मंडलमधील मायणीसह, कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, विखळे, हिवरवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, पडळ, औतरवाडी, ढोकळवाडी, गारुडी, तरसवाडी, गारळेवाडी गावांच्या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्या आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

२४ मायणी

चितळी (ता. खटाव) येथील येरळा नदीपात्र आजही पूर्ण कोरडे आहे. ( छाया : संदीप कुंभार)