शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

येरळेचा श्वास गुदमरतोय!

By admin | Updated: November 17, 2014 23:16 IST

अतिक्रमणे वाढली : चिंचोळी पात्रात घाणीचे साम्राज्य

वडूज : प्राचिन कालीन ‘वेदावती’ व सध्याची ‘येरळा’ नदी खटाव तालुक्याची वरदायिनी असल्याने ७० टक्के गावांची तहान ही नदी भागवते. सध्या वडूज परिसरातील येरळा नदी पात्रात अतिक्रमणे वाढून मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने येरळेचा श्वास गुदमरतोय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.पुरातन काळात या नदीला अनन्य साधारण महत्त्व होते. या नदी पात्रावर येरळवाडी येथे एक टीएमसीचा तलाव बांधला असून, या तलावातून खटाव तालुक्यात प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याच्या योजना आहेत. आजही या नदीच्या तीरावर शिवलिंग असलेली हेमाडपंथी महादेव मंदिर आहेत. नदीला अनेकवेळा महापूर येऊनही आज २१ व्या शतकात ही मंदिरे जशीच्या तशी तग धरून आहे. नदीच्या तीराकाठी आयुर्वेदिक झाडाझुडपांचा व वनस्पतींचा साठा उपलब्ध होता. याच नदीच्या काठावर बसून पूर्वी ऋषीमुनी ध्यानस्थ बसत असल्याचा उल्लेख बखरीमध्ये पाहावयास मिळतो. त्यामुळे येरळा नदीला इतिहास प्राप्त झाला असून, सद्य:स्थितीत हे महत्त्व कमी होताना दिसत आहे ते केवळ मानवनिर्मित प्रदूषणामुळे. नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकणे, हे नित्याचेच बनले आहे. नदीकाठी वीटभट्टीधारकांचे अतिक्रमण होऊन नदीचे पात्र चिंचोळे बनले आहे. वडूज शहरात काही जुनी घरे पाडून त्याची माती, दगड व कचरा या नदीपात्रात आणून टाकल्याने मूळ पात्र सापडणे महाकठीण बनले आहे. अवकाळी पावसामुळे नदीवरील बंधारे तुडुंब भरले आहेत. बंधाऱ्याच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याला योग्य दिशा न मिळाल्याने हे पाणी येरळा तलावात पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. तर तलावात गेलेले पाणी अशुद्ध असल्याने तलावातील मासे मृत्यू पावत आहेत. हेच पाणी वडूज, मायणी, खातवळ, औंध प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेद्वारे तालुक्यातील ७० टक्के गावांना सोडण्यात येत आहे. दूषित पाणी फिल्टर करण्याची क्षमता ठराविक गावात उपलब्ध असल्याने उर्वरित गावांना या दूषित पाण्याचा फटका बसत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)बोकाळलेले अतिक्रमण व नदीचे झालेले लहान पात्र यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देशात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात या नदीचा समावेश केला तर नदी मोकळा श्वास घेऊ शकेल.