शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

येरळेचा श्वास गुदमरतोय!

By admin | Updated: November 17, 2014 23:16 IST

अतिक्रमणे वाढली : चिंचोळी पात्रात घाणीचे साम्राज्य

वडूज : प्राचिन कालीन ‘वेदावती’ व सध्याची ‘येरळा’ नदी खटाव तालुक्याची वरदायिनी असल्याने ७० टक्के गावांची तहान ही नदी भागवते. सध्या वडूज परिसरातील येरळा नदी पात्रात अतिक्रमणे वाढून मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने येरळेचा श्वास गुदमरतोय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.पुरातन काळात या नदीला अनन्य साधारण महत्त्व होते. या नदी पात्रावर येरळवाडी येथे एक टीएमसीचा तलाव बांधला असून, या तलावातून खटाव तालुक्यात प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याच्या योजना आहेत. आजही या नदीच्या तीरावर शिवलिंग असलेली हेमाडपंथी महादेव मंदिर आहेत. नदीला अनेकवेळा महापूर येऊनही आज २१ व्या शतकात ही मंदिरे जशीच्या तशी तग धरून आहे. नदीच्या तीराकाठी आयुर्वेदिक झाडाझुडपांचा व वनस्पतींचा साठा उपलब्ध होता. याच नदीच्या काठावर बसून पूर्वी ऋषीमुनी ध्यानस्थ बसत असल्याचा उल्लेख बखरीमध्ये पाहावयास मिळतो. त्यामुळे येरळा नदीला इतिहास प्राप्त झाला असून, सद्य:स्थितीत हे महत्त्व कमी होताना दिसत आहे ते केवळ मानवनिर्मित प्रदूषणामुळे. नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकणे, हे नित्याचेच बनले आहे. नदीकाठी वीटभट्टीधारकांचे अतिक्रमण होऊन नदीचे पात्र चिंचोळे बनले आहे. वडूज शहरात काही जुनी घरे पाडून त्याची माती, दगड व कचरा या नदीपात्रात आणून टाकल्याने मूळ पात्र सापडणे महाकठीण बनले आहे. अवकाळी पावसामुळे नदीवरील बंधारे तुडुंब भरले आहेत. बंधाऱ्याच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याला योग्य दिशा न मिळाल्याने हे पाणी येरळा तलावात पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. तर तलावात गेलेले पाणी अशुद्ध असल्याने तलावातील मासे मृत्यू पावत आहेत. हेच पाणी वडूज, मायणी, खातवळ, औंध प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेद्वारे तालुक्यातील ७० टक्के गावांना सोडण्यात येत आहे. दूषित पाणी फिल्टर करण्याची क्षमता ठराविक गावात उपलब्ध असल्याने उर्वरित गावांना या दूषित पाण्याचा फटका बसत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)बोकाळलेले अतिक्रमण व नदीचे झालेले लहान पात्र यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देशात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात या नदीचा समावेश केला तर नदी मोकळा श्वास घेऊ शकेल.