शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

येरळेचा श्वास गुदमरतोय!

By admin | Updated: November 17, 2014 23:16 IST

अतिक्रमणे वाढली : चिंचोळी पात्रात घाणीचे साम्राज्य

वडूज : प्राचिन कालीन ‘वेदावती’ व सध्याची ‘येरळा’ नदी खटाव तालुक्याची वरदायिनी असल्याने ७० टक्के गावांची तहान ही नदी भागवते. सध्या वडूज परिसरातील येरळा नदी पात्रात अतिक्रमणे वाढून मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने येरळेचा श्वास गुदमरतोय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.पुरातन काळात या नदीला अनन्य साधारण महत्त्व होते. या नदी पात्रावर येरळवाडी येथे एक टीएमसीचा तलाव बांधला असून, या तलावातून खटाव तालुक्यात प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याच्या योजना आहेत. आजही या नदीच्या तीरावर शिवलिंग असलेली हेमाडपंथी महादेव मंदिर आहेत. नदीला अनेकवेळा महापूर येऊनही आज २१ व्या शतकात ही मंदिरे जशीच्या तशी तग धरून आहे. नदीच्या तीराकाठी आयुर्वेदिक झाडाझुडपांचा व वनस्पतींचा साठा उपलब्ध होता. याच नदीच्या काठावर बसून पूर्वी ऋषीमुनी ध्यानस्थ बसत असल्याचा उल्लेख बखरीमध्ये पाहावयास मिळतो. त्यामुळे येरळा नदीला इतिहास प्राप्त झाला असून, सद्य:स्थितीत हे महत्त्व कमी होताना दिसत आहे ते केवळ मानवनिर्मित प्रदूषणामुळे. नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकणे, हे नित्याचेच बनले आहे. नदीकाठी वीटभट्टीधारकांचे अतिक्रमण होऊन नदीचे पात्र चिंचोळे बनले आहे. वडूज शहरात काही जुनी घरे पाडून त्याची माती, दगड व कचरा या नदीपात्रात आणून टाकल्याने मूळ पात्र सापडणे महाकठीण बनले आहे. अवकाळी पावसामुळे नदीवरील बंधारे तुडुंब भरले आहेत. बंधाऱ्याच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याला योग्य दिशा न मिळाल्याने हे पाणी येरळा तलावात पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. तर तलावात गेलेले पाणी अशुद्ध असल्याने तलावातील मासे मृत्यू पावत आहेत. हेच पाणी वडूज, मायणी, खातवळ, औंध प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेद्वारे तालुक्यातील ७० टक्के गावांना सोडण्यात येत आहे. दूषित पाणी फिल्टर करण्याची क्षमता ठराविक गावात उपलब्ध असल्याने उर्वरित गावांना या दूषित पाण्याचा फटका बसत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)बोकाळलेले अतिक्रमण व नदीचे झालेले लहान पात्र यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देशात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात या नदीचा समावेश केला तर नदी मोकळा श्वास घेऊ शकेल.