शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

येळगावकरांनी काढली राष्ट्रवादीची लायकी!

By admin | Updated: August 8, 2014 00:41 IST

पाणीप्रश्न : केवळ टँकर लॉबी जपण्यासाठी दुष्काळग्रस्तांना झुलवल्याचा आरोप

सातारा : ‘राष्ट्रवादीला जिहे-कठापूर पाणी योजना पूर्ण करायचीच नव्हती. माण-खटाव मधला दुष्काळ कायम ठेवून त्यांना केवळ टँकर लॉबी जोपासायची होती. गेल्या १७ वर्षांत सत्ता असतानाही ही योजना पूर्णत्वास गेली नाही, त्यामुळे राष्ट्रवादीची लायकी काय?, हे चांगलेच कळाले,’ अशी खरमरीत टीका माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केली. डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुरुवारी (दि.७) प्रथमच साताऱ्यात जाहीरपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, जिल्हा परिषदेचे खटाव येथील माजी सदस्य महेश शिंदे, रवींद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘दुष्काळी भाग जलसिंचनाखाली आणू, असे आश्वासन देण्यात आल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अडीच वर्षे या पक्षात राहिलो; मात्र आपली पूर्ण निराशा झाली,’ असे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. डॉ. येळगावकर म्हणाले, ‘जिल्ह्याच्या वाट्याचं पाणी बाहेरील जिल्ह्यात पळवताना नियम बासनात गुंडाळले आहेत. माण, खटाव व कोरेगावला पाणी देताना जलसंपदा विभागाचे अधिकारी नियमावर बोट ठेवतात. मात्र, सांगोल्याला बिनदिक्कतपणे पाणी दिले जाते. १९९६ साली युती शासनाने जिहे-कठापूर योजनेला मंजुरी दिली. १९९७ नंतर आजअखेर तब्बल १७ वर्षे राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या आघाडीची सत्ता असून, देखील अवघ्या सहा किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्यासाठी भूसंपादन करता आलेले नाही. हे काम पूर्ण झाले असते तर नेर, येरळा, येरळवाडी धरण, आंधळी धरण व देवापूरचे धरण पाण्याने भरले गेले असते. यातून परिसरातील दुष्काळ मिटला असता, टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरजही लागली नसती. मात्र, राष्ट्रवादीला टँकर लॉबी जोपासायची आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय अनुशेष भरावा, असा माझा आग्रह होता. मात्र, शरद पवारांनी महामंडळाचं भूत दुष्काळग्रस्तांच्या मानगुटीवर बसवलं. दुष्काळग्रस्तांचं राष्ट्रवादीला काही देणं-घेणं नाही, हे लक्षात आल्यावर मी लाथ मारून बाहेर पडलो आहे. लुंग्या-सुंग्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत. कुठल्याही मंत्र्यानं पाणीप्रश्नावर बोलायला माझ्यासमोर स्टेजवर यावं, असेही जाहीर आव्हान डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना दिले. ११ रोजी येळगावकरांचे पक्षांतरडॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांच्यासह काँगे्रस व राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते दि. ११ रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी सातारा, खटाव व कोळे, ता. कऱ्हाड येथे मेळावे आयोजित केले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. भरत पाटील यांनी दिली. तालुकानिहाय अनुशेष भरावा, असा माझा आग्रह होता. मात्र, शरद पवारांनी महामंडळाचं भूत दुष्काळग्रस्तांच्या मानगुटीवर बसवलं. दुष्काळग्रस्तांचं राष्ट्रवादीला काही देणं-घेणं नाही, हे लक्षात आल्यावर मी लाथ मारून बाहेर पडलो आहे. लुंग्या-सुंग्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत. कुठल्याही मंत्र्यानं पाणीप्रश्नावर बोलायला माझ्यासमोर स्टेजवर यावं, असेही जाहीर आव्हान डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना दिले. ११ रोजी येळगावकरांचे पक्षांतरडॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांच्यासह काँगे्रस व राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते दि. ११ रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी सातारा, खटाव व कोळे, ता. कऱ्हाड येथे मेळावे आयोजित केले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. भरत पाटील यांनी दिली.