शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जखमा भरतायत पण नाती तुटतायत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST

प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : संसार जितका जुना संघर्ष तितका मोठा असं म्हणतात. परस्परांबरोबर प्रेमाने राहण्याचं ठरवून ...

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : संसार जितका जुना संघर्ष तितका मोठा असं म्हणतात. परस्परांबरोबर प्रेमाने राहण्याचं ठरवून विवाहबध्द झालेल्या जोडप्यांमध्ये होणारे वादंग पोलीस ठाण्यात जात असल्याने अवघ्या कुटुंबाचे आरोग्य बिघडत आहे. पुरुषांकडून शारीरिक मारहाण आणि महिलांचे शाब्दिक हल्ले परतवणं अनेक जोडप्यांना आता असहय्य होऊ लागलं आहे.

महाबळेश्वर येथील राजेंद्र उर्फ राजू जाधव याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. चारित्र्याच्या संशयावरून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पन्नाशी ओलांडलेल्या या संशयितावर मानसिक आजार असल्याने उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मानसिक स्थिती ठीक नसतानाही पत्नीला ठार करण्याची योजना आखण्यात, मुलं बाहेर येऊ नयेत म्हणून दाराला कुलूप लावणं, पत्नीच्या येण्याच्या मार्गावर दबा धरून उभं राहणं यासाठी मात्र त्याचा मेंदू शाबूतपणे काम करतोय हे अजब आहे.

पती-पत्नी एका कुटुंबाचे भाग असले तरीही ती दोन व्यक्तिमत्त्व आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानुसार दोघांनाही परस्परांचे सगळेच पटेल असं गृहित धरणं धोक्याचं आहे. मी सांगेल तसेच झाले पाहिजे ही अतिरेकी अपेक्षा या वादांच्या मुळाशी असल्याचं दिसते. एकमेकांच्या साथीने कुटुंबासह एकदाच मिळणारं आयुष्य आनंदाने जगण्याचं सोडून चारित्र्याचा संशय, व्यसनाची कटकट म्हणून परस्परांना हिनवणं अयोग्य आहे. त्यामुळे कलह आणि कायदेशीर लढाई हेच पदरी पडते.

कोणतीही हिंसा घातकच

शारीरिक असो वा शाब्दिक कोणत्याही प्रकारची हिंसा ही घातकच असते. राग आला म्हणून पत्नीला मारणारे महाभाग आणि त्यांचे समर्थन करणारे कुटुंबीय आजही अस्तित्वात आहेत. तर रागाच्या भरात अगदी खालच्या थराला जाऊन कुटुंबीयांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या महिलांचं वागणं योग्य असल्याचे सांगणारेही ढिगाने पहायला मिळतात. राग आला की मारहाण किंवा शिवीगाळ हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत हेच अनेकांच्या मनावर बिंबवले जाते. या दोन्हीपेक्षाही संवादाचा मार्ग सुखकर आणि कमी त्रासाचा आहे ही शिकवणच मिळत नाही हे दुर्दैवी आहे.

अशी होतेय कोंडी...!

लग्नाचे काही वर्ष परस्परांसह कुटुंबीयांना समजून घेण्यातच जातात. नवी नाती जोडताना महिलांसह पुरुषांचीही कोंडी होती. तुमच्यासाठी घरदार सोडून आले, असा पत्नीचा सूर असतो. कौटुंबिक कलह सोडविण्याचं काही सूत्र नसतं त्यामुळे घरचे वाद संपुष्टात आणायला पतीला हतबलता जाणवू लागली की तो आक्रमक होऊन मारहाण करतो. पती-पत्नी त्यांच्या जागेवर योग्य असले तरीही तडजोड करणं हे संसाराचं सूत्र मानलं तर आयुष्य अधिक सुखकर होईल.

कोट :

संवाद असेल दोघांत तर संसार होईल सुखात हा मंत्र सर्वांनी लक्षात ठेवायला हवा. आयुष्य क्षणभंगूर आहे हे समाजाला कोरोनाने शिकविले आहे. माणसं, नाती, भावना, प्रेम जपायलाच हवे. कोणाविषयी राग आलाच तर चांगले क्षणही आठवा. त्यामुळे टोकाची भूमिका घेण्याची मानसिकता नक्की बदलेल.

- ॲड. मनीषा बर्गे, जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग

पॉइंटर

राग व्यक्त करण्याचे प्रकार

मारहाण : ४३

शिवीगाळ : २७

घर सोडून जाणे : १९

कुटुंबीयांना वेठीस धरणे : ११