शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जखमा भरतायत पण नाती तुटतायत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST

प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : संसार जितका जुना संघर्ष तितका मोठा असं म्हणतात. परस्परांबरोबर प्रेमाने राहण्याचं ठरवून ...

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : संसार जितका जुना संघर्ष तितका मोठा असं म्हणतात. परस्परांबरोबर प्रेमाने राहण्याचं ठरवून विवाहबध्द झालेल्या जोडप्यांमध्ये होणारे वादंग पोलीस ठाण्यात जात असल्याने अवघ्या कुटुंबाचे आरोग्य बिघडत आहे. पुरुषांकडून शारीरिक मारहाण आणि महिलांचे शाब्दिक हल्ले परतवणं अनेक जोडप्यांना आता असहय्य होऊ लागलं आहे.

महाबळेश्वर येथील राजेंद्र उर्फ राजू जाधव याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. चारित्र्याच्या संशयावरून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पन्नाशी ओलांडलेल्या या संशयितावर मानसिक आजार असल्याने उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मानसिक स्थिती ठीक नसतानाही पत्नीला ठार करण्याची योजना आखण्यात, मुलं बाहेर येऊ नयेत म्हणून दाराला कुलूप लावणं, पत्नीच्या येण्याच्या मार्गावर दबा धरून उभं राहणं यासाठी मात्र त्याचा मेंदू शाबूतपणे काम करतोय हे अजब आहे.

पती-पत्नी एका कुटुंबाचे भाग असले तरीही ती दोन व्यक्तिमत्त्व आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानुसार दोघांनाही परस्परांचे सगळेच पटेल असं गृहित धरणं धोक्याचं आहे. मी सांगेल तसेच झाले पाहिजे ही अतिरेकी अपेक्षा या वादांच्या मुळाशी असल्याचं दिसते. एकमेकांच्या साथीने कुटुंबासह एकदाच मिळणारं आयुष्य आनंदाने जगण्याचं सोडून चारित्र्याचा संशय, व्यसनाची कटकट म्हणून परस्परांना हिनवणं अयोग्य आहे. त्यामुळे कलह आणि कायदेशीर लढाई हेच पदरी पडते.

कोणतीही हिंसा घातकच

शारीरिक असो वा शाब्दिक कोणत्याही प्रकारची हिंसा ही घातकच असते. राग आला म्हणून पत्नीला मारणारे महाभाग आणि त्यांचे समर्थन करणारे कुटुंबीय आजही अस्तित्वात आहेत. तर रागाच्या भरात अगदी खालच्या थराला जाऊन कुटुंबीयांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या महिलांचं वागणं योग्य असल्याचे सांगणारेही ढिगाने पहायला मिळतात. राग आला की मारहाण किंवा शिवीगाळ हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत हेच अनेकांच्या मनावर बिंबवले जाते. या दोन्हीपेक्षाही संवादाचा मार्ग सुखकर आणि कमी त्रासाचा आहे ही शिकवणच मिळत नाही हे दुर्दैवी आहे.

अशी होतेय कोंडी...!

लग्नाचे काही वर्ष परस्परांसह कुटुंबीयांना समजून घेण्यातच जातात. नवी नाती जोडताना महिलांसह पुरुषांचीही कोंडी होती. तुमच्यासाठी घरदार सोडून आले, असा पत्नीचा सूर असतो. कौटुंबिक कलह सोडविण्याचं काही सूत्र नसतं त्यामुळे घरचे वाद संपुष्टात आणायला पतीला हतबलता जाणवू लागली की तो आक्रमक होऊन मारहाण करतो. पती-पत्नी त्यांच्या जागेवर योग्य असले तरीही तडजोड करणं हे संसाराचं सूत्र मानलं तर आयुष्य अधिक सुखकर होईल.

कोट :

संवाद असेल दोघांत तर संसार होईल सुखात हा मंत्र सर्वांनी लक्षात ठेवायला हवा. आयुष्य क्षणभंगूर आहे हे समाजाला कोरोनाने शिकविले आहे. माणसं, नाती, भावना, प्रेम जपायलाच हवे. कोणाविषयी राग आलाच तर चांगले क्षणही आठवा. त्यामुळे टोकाची भूमिका घेण्याची मानसिकता नक्की बदलेल.

- ॲड. मनीषा बर्गे, जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग

पॉइंटर

राग व्यक्त करण्याचे प्रकार

मारहाण : ४३

शिवीगाळ : २७

घर सोडून जाणे : १९

कुटुंबीयांना वेठीस धरणे : ११